शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

कर्जमाफी मिळालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:03 AM

राज्य शासनाने शेतकऱ्यांची बँकेतील पत निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. जिल्ह्यातील ८० हजार २९० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून सर्व बँकांनी पात्र आणि अर्ज करणाऱ्या सर्व गरजू शेतकऱ्यांना या खरीप हंगामात कर्ज वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिलेत.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : विविध योजनांची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाने शेतकऱ्यांची बँकेतील पत निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. जिल्ह्यातील ८० हजार २९० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून सर्व बँकांनी पात्र आणि अर्ज करणाऱ्या सर्व गरजू शेतकऱ्यांना या खरीप हंगामात कर्ज वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिलेत.पीक कर्ज वाटप, कर्जमाफी, पीएम किसान आदी योजनांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. सर्व बँकांनी त्यांच्या शाखानिहाय पीक कर्ज वाटपाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावी. तसेच एखाद्या शेतकऱ्यांचा पीक कर्ज नाकारण्याचे कारण द्यावे. रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही परिपत्रकामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करताना अडचणी येत असतील तर त्याची माहिती तात्काळ शासनाला कळविण्यात यावी. शेतकऱ्यांना वेळीच कर्ज पुरवठा होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ हे अभियान राबविण्यात येत आहे. शेतकºयांना बँकेमध्ये येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे आणि अभियानाच्या योग्य अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व बँकेच्या १३९ शाखांसाठी प्रत्येक शाखानिहाय संपर्क अधिकऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील प्रत्येक बँक मॅनेजर आणि संपर्क अधिकारी यांची आठवड्यातून एकदा बैठक घेऊन कर्ज वाटपाचा आढावा घ्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सागितले. आजपर्यंत केवळ ६.८ टक्केच पीक कर्ज वाटप झाले असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून बँकांनी शाखानिहाय मेळावे घेण्याचे निर्देश दिलेत. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, लीड बँक मॅनेजर बिरेंद्रकुमार, जिल्हा उपनिबंधक वालदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज