ग्रामीण सेवा सहकारी संस्था मोजताहेत अखेरच्या घटका

By Admin | Updated: May 24, 2014 00:05 IST2014-05-24T00:05:27+5:302014-05-24T00:05:27+5:30

सहकारी बँक व शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करीत शेतकर्‍यांना अर्थसहाय्य करण्याकरिता ग्रामीण सेवा सहकारी संस्था दोहोमधील दुवा होती. मात्र सहकारी बँकेच्या धोरणामुळे

The last element counting the rural service co-operative organization | ग्रामीण सेवा सहकारी संस्था मोजताहेत अखेरच्या घटका

ग्रामीण सेवा सहकारी संस्था मोजताहेत अखेरच्या घटका

 पिंपळखुटा : सहकारी बँक व शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण करीत शेतकर्‍यांना अर्थसहाय्य करण्याकरिता ग्रामीण सेवा सहकारी संस्था दोहोमधील दुवा होती. मात्र सहकारी बँकेच्या धोरणामुळे ग्रामीण सहकारी संस्था आता नामशेष होण्याच्या मार्गावर आल्याने अखेरच्या घटका मोजत आहेत. आर्वी ततालुक्यात एकूण ५० सहकारी संस्था आहे. पैकी बैद्यनाथन समिती व ९७ व्या घटनादुरूस्तीनुसार १३ संस्थांचे इतर संस्थेत विलिनीकरण करण्यात आल्याने ३७ संस्था कार्र्यरत असून २० गटसचिव या संस्थेचा कारभार पाहत आहेत. सध्या सहकारी संस्थेचे तालुक्यात ४ हजार ९५६ शेतकरी थकीत कर्जदार आहे. त्यांच्याकडून २७ कोटी ५३ लाख ६१ हजार रुपये वसूल करण्यात येणार आहे. बर्‍याच शेतकर्‍यांनी कर्जाची परतफेड करून राष्ट्रीयकृत बँकेचा रस्ता धरला आहे; परंतु सर्व शेतकरी सभासदाकडून ठेव म्हणून घेतलेली एकूण रक्कम ३ कोटी ७४ लाख रुपये आहे. जे शेतकरी इतर बँकेकडून कर्ज घेतात त्यांचेही शेअर्स या संस्थेत जमा आहे. ही ठेव परत मिळावी या आशेवर शेतकरी आहेत. याकडे संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: The last element counting the rural service co-operative organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.