शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

बसफेऱ्यांअभावी नागरिकांसह विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2021 5:00 AM

कोरोना काळात शाळा, विद्यालये पूर्णतः बंद होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिकवणी वर्ग देखील सुरू झाले आहे.  परंतु, गेल्या महिनाभरापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट होत आहे. आष्टी तालुक्यातील गाव खेड्यांतील अनेक विद्यार्थी आष्टी येथे शिक्षणासाठी बंद बसफेऱ्या अभावी ऑटोरिक्षा, टॅक्सीच्या साह्याने ये-जा करतात.

लोकमत न्यूज नेटवर्कतारासावंगा : परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे अनेकांना पर्याय नसल्याने खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. यामुळे खासगी वाहनाचे मालक अव्वाच्या सव्वा दर आकारून नागरिक व विद्यार्थ्यांची सर्रास लूट करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेच्या दिवसात आर्थिक भुर्दंड सोसण्याची वेळ आली आहे.कोरोना काळात शाळा, विद्यालये पूर्णतः बंद होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिकवणी वर्ग देखील सुरू झाले आहे. परंतु, गेल्या महिनाभरापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पायपीट होत आहे. आष्टी तालुक्यातील गाव खेड्यांतील अनेक विद्यार्थी आष्टी येथे शिक्षणासाठी बंद बसफेऱ्या अभावी ऑटोरिक्षा, टॅक्सीच्या साह्याने ये-जा करतात. खासगी वाहनाव्यतिरिक्त पर्याय नसल्याने नागरिकांना क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना गाडीत डांबून बसविले जाते. यामुळे अपघाताचा धोकाही बळावला आहे. दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने अनेक नागरिकांना ये-जा करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत आहे. या बंदचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे दिसून येते.  काही विद्यार्थी तर चक्क पायदळ किंवा सायकलने शाळेपर्यंत अंतर गाठताना दिसतात. हिवाळ्याचे दिवस असल्याने थंडीत विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाण्यासाठी सकाळपासूनच खासगी वाहनाच्या प्रतीक्षेत बसावे लागते. प्रवासाचे दरही दीड-दोन पट वाढल्याने हातमजुरी, शेती करणाऱ्या पालकांच्या विद्यार्थ्यांना परवडण्याजोग्या नाही. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांवर एवढा मोठा संघर्ष करण्याची दुर्दैवी वेळ आली असल्याने आता तरी आमची लालपरी सुरू व्हायला हवी अशी मागणी सर्व स्तरातून होत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

बसफेरी बंद असल्याने दररोज खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. वेळेवर शाळेत देखील पोहोचता येत नाही.  खासगी वाहनात एक प्रकारचे मोठे संकट डोक्यावर घेऊनच प्रवास करावा लागतो. प्रवासाचे भाडेही ठरले नाही. त्यामुळे आमची लूट चालवली जात आहे.- भावना गावंडे, विद्यार्थिनी.

बंद बसफेऱ्या अभावी दररोज मुलांना शाळेत खासगी वाहनाने पाठवावे लागते. त्यामुळे मुले शाळेतून परत घरी येईपर्यंत मनात एक प्रकारची भीती असते.- अरुण वंजारी, पालक.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप