शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

हे रस्त्यावरील गतिरोधक नव्हे, तर तुम्हाला पाडण्याचे ठिकाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

शहरात  अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याने रबलिंग पद्धतीचे गतिरोधक उभारण्यात यावेत, असा नियम आहे.  यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, सूचनांना तिलांजली देण्यात आल्याने उंच गतिरोधकामुळे वाहने घसरून वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहे. गतिरोधक उभारण्यासाठी इंडियन रोड सायन्स निकषांची अंमलबजावणी आवश्यक आहे.

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा (आर्वी) : वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलेले जाणारे गतिरोधक नियमबाह्य उंचीमुळे अनेकदा वाहन चालकांच्या जीवावर उठत आहेत. शहरात गतिरोधक बसविताना ना उंचीचा नियम पाळला ना अंतराचा. यामुळे दुचाकीस्वारांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. पद्मावती चौक ते अप्पर वर्ध्यापर्यंत, तसेच शहरातील इतर भागांतही रस्त्यावर असलेल्या गतिरोधकांवरून दुचाकी उसळून पडल्याची घटना घडत आहेत.  शहरात  अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याने रबलिंग पद्धतीचे गतिरोधक उभारण्यात यावेत, असा नियम आहे.  यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, सूचनांना तिलांजली देण्यात आल्याने उंच गतिरोधकामुळे वाहने घसरून वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहे. गतिरोधक उभारण्यासाठी इंडियन रोड सायन्स निकषांची अंमलबजावणी आवश्यक आहे. गतिरोधक कसा उभारावा, एकाच रस्त्यावर दोन गतिरोधक उभारताना त्यात किती अंतर असले पाहिजे, त्यांची उंची किती असावी याबाबत निकष ठरवले गेले आहेत; पण गतिरोधक उभारताना आवश्यक सूचनांकडे दुर्लक्ष केले आहे. 

गतिरोधकाची उंची किती हवी-   गतिरोधक उभारताना गतिरोधकांची उंची अडीच ते १० सेंटिमीटर आणि लांबी ३.५ सेंटीमीटर, मीटर वर्तुळकार क्षेत्र १७ मीटर असते. -   इंडियन रोड सायन्स निकषाची अंमलबजावणी केल्यास त्यामुळे वाहनचालकांना त्रास कमी होतो. मात्र, याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.

रोज किमान एक जण तरी पडतो-   गतिरोधक उभारल्यावर त्यावर थर्मी प्लास्टिक पेंट, पट्ट्या काढणे आवश्यक आहे. शिवाय वाहन चालकांना सूचना मिळण्यासाठी गतिरोधक येण्याआधी ४० मीटर अंतरावर सूचनाफलक हे रस्त्यावर असणे अपेक्षित आहे.-  मात्र, मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांना तिलांजली देण्यात आली आहे. पंचायत समिती ते अप्पर वर्धा वसाहतीपर्यंत गतिरोधकवर पांढरे पट्टे  नसल्याने दररोज किमान एक तरी अपघात होतो, आता हे नित्याचेच झाले आहे.

गतिरोधक कोणत्या नियमात बसतात-  गांधी चौक ते गुरुनानक धर्मशाळा या रस्त्यावर किमान १५ गतिरोधक आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या अनेकांना मान, पाठ व कमरेचा त्रास होत आहे. -   पद्मावती चौक ते तिरुपती टॉकीजपर्यंत स्पीड ब्रेकरमुळे अनेक दुचाकी, चारचाकी वाहनधारकांच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोणत्या निकषाप्रमाणे हे गतिरोधक लावले हे कळायलाच मार्ग नाही.

शरीराची हाडे खिळखिळी झाली

रस्त्यावर गतिरोधक असणे आवश्यक आहे. त्यामुळे भरधाव चालणाऱ्या वाहनांना अटकाव होतो. मात्र,  गतिरोधकाची उंची, अंतर याचे काही निकष आहे. त्याचा वापरच केला जात नाही. या गतिरोधकांमुळे अनेकांच्या शरीराची हाडे खिळखिळी झाली आहेत. याचाही विचार करणे गरजेचे आहे.- नारायण घोडे, वाहन चालक.

गतिरोधक हे वाहनाची स्पीड कमी करण्यासाठी आहे. मात्र, त्यापेक्षा अपघाताचे कारण बनलेले चित्र दिसत आहे. शहरात असलेल्या अनेक गतिरोधक बनविताना नियमच धाब्यावर बसविले आहेत. त्यामुळे सर्व गतिरोधक निकषाप्रमाणे नवीन करावे, अशी मागणी आहे.- सुरेश मोटवाणी, सामाजिक कार्यकर्ते. 

 

टॅग्स :highwayमहामार्ग