शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
2
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
3
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
4
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
6
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
7
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
8
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
9
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
10
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
11
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
12
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
13
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
14
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
15
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
16
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
17
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
18
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
20
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
Daily Top 2Weekly Top 5

हे रस्त्यावरील गतिरोधक नव्हे, तर तुम्हाला पाडण्याचे ठिकाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 05:00 IST

शहरात  अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याने रबलिंग पद्धतीचे गतिरोधक उभारण्यात यावेत, असा नियम आहे.  यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, सूचनांना तिलांजली देण्यात आल्याने उंच गतिरोधकामुळे वाहने घसरून वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहे. गतिरोधक उभारण्यासाठी इंडियन रोड सायन्स निकषांची अंमलबजावणी आवश्यक आहे.

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा (आर्वी) : वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार केलेले जाणारे गतिरोधक नियमबाह्य उंचीमुळे अनेकदा वाहन चालकांच्या जीवावर उठत आहेत. शहरात गतिरोधक बसविताना ना उंचीचा नियम पाळला ना अंतराचा. यामुळे दुचाकीस्वारांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. पद्मावती चौक ते अप्पर वर्ध्यापर्यंत, तसेच शहरातील इतर भागांतही रस्त्यावर असलेल्या गतिरोधकांवरून दुचाकी उसळून पडल्याची घटना घडत आहेत.  शहरात  अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी गतिरोधक आवश्यक असल्याने रबलिंग पद्धतीचे गतिरोधक उभारण्यात यावेत, असा नियम आहे.  यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, सूचनांना तिलांजली देण्यात आल्याने उंच गतिरोधकामुळे वाहने घसरून वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहे. गतिरोधक उभारण्यासाठी इंडियन रोड सायन्स निकषांची अंमलबजावणी आवश्यक आहे. गतिरोधक कसा उभारावा, एकाच रस्त्यावर दोन गतिरोधक उभारताना त्यात किती अंतर असले पाहिजे, त्यांची उंची किती असावी याबाबत निकष ठरवले गेले आहेत; पण गतिरोधक उभारताना आवश्यक सूचनांकडे दुर्लक्ष केले आहे. 

गतिरोधकाची उंची किती हवी-   गतिरोधक उभारताना गतिरोधकांची उंची अडीच ते १० सेंटिमीटर आणि लांबी ३.५ सेंटीमीटर, मीटर वर्तुळकार क्षेत्र १७ मीटर असते. -   इंडियन रोड सायन्स निकषाची अंमलबजावणी केल्यास त्यामुळे वाहनचालकांना त्रास कमी होतो. मात्र, याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.

रोज किमान एक जण तरी पडतो-   गतिरोधक उभारल्यावर त्यावर थर्मी प्लास्टिक पेंट, पट्ट्या काढणे आवश्यक आहे. शिवाय वाहन चालकांना सूचना मिळण्यासाठी गतिरोधक येण्याआधी ४० मीटर अंतरावर सूचनाफलक हे रस्त्यावर असणे अपेक्षित आहे.-  मात्र, मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचनांना तिलांजली देण्यात आली आहे. पंचायत समिती ते अप्पर वर्धा वसाहतीपर्यंत गतिरोधकवर पांढरे पट्टे  नसल्याने दररोज किमान एक तरी अपघात होतो, आता हे नित्याचेच झाले आहे.

गतिरोधक कोणत्या नियमात बसतात-  गांधी चौक ते गुरुनानक धर्मशाळा या रस्त्यावर किमान १५ गतिरोधक आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांच्या अनेकांना मान, पाठ व कमरेचा त्रास होत आहे. -   पद्मावती चौक ते तिरुपती टॉकीजपर्यंत स्पीड ब्रेकरमुळे अनेक दुचाकी, चारचाकी वाहनधारकांच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोणत्या निकषाप्रमाणे हे गतिरोधक लावले हे कळायलाच मार्ग नाही.

शरीराची हाडे खिळखिळी झाली

रस्त्यावर गतिरोधक असणे आवश्यक आहे. त्यामुळे भरधाव चालणाऱ्या वाहनांना अटकाव होतो. मात्र,  गतिरोधकाची उंची, अंतर याचे काही निकष आहे. त्याचा वापरच केला जात नाही. या गतिरोधकांमुळे अनेकांच्या शरीराची हाडे खिळखिळी झाली आहेत. याचाही विचार करणे गरजेचे आहे.- नारायण घोडे, वाहन चालक.

गतिरोधक हे वाहनाची स्पीड कमी करण्यासाठी आहे. मात्र, त्यापेक्षा अपघाताचे कारण बनलेले चित्र दिसत आहे. शहरात असलेल्या अनेक गतिरोधक बनविताना नियमच धाब्यावर बसविले आहेत. त्यामुळे सर्व गतिरोधक निकषाप्रमाणे नवीन करावे, अशी मागणी आहे.- सुरेश मोटवाणी, सामाजिक कार्यकर्ते. 

 

टॅग्स :highwayमहामार्ग