शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: इतिहास गवाह है... कोरोनाच्या संकटात भारतीयांची भीती कमी करणारी बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 18:30 IST

भारतात व्हायरसच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत नेहमीच कमी राहिले आहे, असा अभ्यासपूर्ण दावा महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक शाखेचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देइंद्रजित खांडेकरांचा दावा रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख मृत्युमुखी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या जगाला कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराने त्रस्त केले आहे. जगभरात या आजाराने २६ हजार ५२९ लोकांचा मृत्यू झाला. भारतात व्हायरसच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत नेहमीच कमी राहिले आहे, असा अभ्यासपूर्ण दावा महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक शाखेचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केला आहे.डॉ. खांडेकर यांनी कोरोना व इतर साथीच्या आजारावर अभ्यास करून काही निष्कर्ष पुढे आणले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भारतात २०१५ मध्ये स्वाईन फ्ल्यूची साथ आली होती. त्यात जवळपास २ हजार मृत्यू झालेत. मात्र, २०१४, २०१५, २०१६ व २०१७ चा वार्षिक मृत्यू दर बघितला तर वार्षिक सरासरी मृत्यूमध्ये फरक नव्हता. २०१४ मध्ये मृत्यूदर प्रतिहजार लोकसंख्येमागे ७.२० होता. २०१५ मध्ये ७.१९ तर २०१६ मध्ये ७.२०, २०१७ मध्ये ७.२१ असा राहिला आहे. यावरून हे स्पष्ट होते, की ज्यावेळी साथ येते त्यावेळी साथीमुळे मृत्यू जरी वाढले तरीही मृत्यूदर वाढत नाही, उलट कमी झालेला दिसतो. भारतात जवळपास २४ ते २५ हजार मृत्यू दर दिवशी होतात. वार्षिक जवळपास ८७ लाख मृत्यू होतात. मागील साथीच्या मृत्यूचा अभ्यास केला तर हे निदर्शनास येईल की, यात कोरोनाच्या केसेस जरी त्यात समाविष्ट केल्या तरी हा आकडा (म्हणजे वार्षिक मृत्यूसंख्या) २०२० च्या अखेरीस पाहिला तर त्यात वाढ झालेली दिसणार नाही. उलट पाश्चिमात्य देशाशी तुलना केली तर भारतात साथरोगाच्या आजाराने मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी आहे. युनायटेड स्टेटमध्ये २००९ च्या स्वाईन फ्ल्यूच्या साथीमध्ये ६०.८ मिलियन लोक बाधित झाले होते. त्यापैकी १२ हजार ४६९ लोक एका वर्षात मृत्युमुखी पडले. भारतात ही साथ त्यावेळी आली होती. मात्र, मृत्यू १ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू कमी होण्याचे कारण भारतीयांची रोग प्रतिकारकशक्ती, वातावरण, तापमान आदी बाबी कारणीभूत आहेत. भारतात दररोज ४०८ मृत्यू व वार्षिक १.५ लाख मृत्यू केवळ रस्ते अपघातामुळे होतात. एक लॉकडाऊन ठेवला तर हमखास १.५ लाख लोकांचा जीव भारतात वाचविला जाऊ शकतो, असा दावा डॉ. खांडेकर यांनी केला आहे.

जगाच्या तुलनेत भारतात साथीच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. भारतात २००९ मध्ये साथ आली होती. त्याचा अभ्यास केला तर आजही आलेल्या कोरोनाच्या आजारात भारतीय लोकांवर आरोग्यदृष्ट्या दूरगामी परिणाम होतील, असे म्हणता येणार नाही.. - डॉ. इंद्रजित खांडेकर,न्यायवैद्यक शाखाप्रमुख, महात्मा गांधी आर्युर्विज्ञान संस्था, सेवाग्राम. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या