शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: इतिहास गवाह है... कोरोनाच्या संकटात भारतीयांची भीती कमी करणारी बातमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 18:30 IST

भारतात व्हायरसच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत नेहमीच कमी राहिले आहे, असा अभ्यासपूर्ण दावा महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक शाखेचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देइंद्रजित खांडेकरांचा दावा रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख मृत्युमुखी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या जगाला कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराने त्रस्त केले आहे. जगभरात या आजाराने २६ हजार ५२९ लोकांचा मृत्यू झाला. भारतात व्हायरसच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण जगाच्या तुलनेत नेहमीच कमी राहिले आहे, असा अभ्यासपूर्ण दावा महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक शाखेचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी केला आहे.डॉ. खांडेकर यांनी कोरोना व इतर साथीच्या आजारावर अभ्यास करून काही निष्कर्ष पुढे आणले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भारतात २०१५ मध्ये स्वाईन फ्ल्यूची साथ आली होती. त्यात जवळपास २ हजार मृत्यू झालेत. मात्र, २०१४, २०१५, २०१६ व २०१७ चा वार्षिक मृत्यू दर बघितला तर वार्षिक सरासरी मृत्यूमध्ये फरक नव्हता. २०१४ मध्ये मृत्यूदर प्रतिहजार लोकसंख्येमागे ७.२० होता. २०१५ मध्ये ७.१९ तर २०१६ मध्ये ७.२०, २०१७ मध्ये ७.२१ असा राहिला आहे. यावरून हे स्पष्ट होते, की ज्यावेळी साथ येते त्यावेळी साथीमुळे मृत्यू जरी वाढले तरीही मृत्यूदर वाढत नाही, उलट कमी झालेला दिसतो. भारतात जवळपास २४ ते २५ हजार मृत्यू दर दिवशी होतात. वार्षिक जवळपास ८७ लाख मृत्यू होतात. मागील साथीच्या मृत्यूचा अभ्यास केला तर हे निदर्शनास येईल की, यात कोरोनाच्या केसेस जरी त्यात समाविष्ट केल्या तरी हा आकडा (म्हणजे वार्षिक मृत्यूसंख्या) २०२० च्या अखेरीस पाहिला तर त्यात वाढ झालेली दिसणार नाही. उलट पाश्चिमात्य देशाशी तुलना केली तर भारतात साथरोगाच्या आजाराने मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी आहे. युनायटेड स्टेटमध्ये २००९ च्या स्वाईन फ्ल्यूच्या साथीमध्ये ६०.८ मिलियन लोक बाधित झाले होते. त्यापैकी १२ हजार ४६९ लोक एका वर्षात मृत्युमुखी पडले. भारतात ही साथ त्यावेळी आली होती. मात्र, मृत्यू १ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू कमी होण्याचे कारण भारतीयांची रोग प्रतिकारकशक्ती, वातावरण, तापमान आदी बाबी कारणीभूत आहेत. भारतात दररोज ४०८ मृत्यू व वार्षिक १.५ लाख मृत्यू केवळ रस्ते अपघातामुळे होतात. एक लॉकडाऊन ठेवला तर हमखास १.५ लाख लोकांचा जीव भारतात वाचविला जाऊ शकतो, असा दावा डॉ. खांडेकर यांनी केला आहे.

जगाच्या तुलनेत भारतात साथीच्या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. भारतात २००९ मध्ये साथ आली होती. त्याचा अभ्यास केला तर आजही आलेल्या कोरोनाच्या आजारात भारतीय लोकांवर आरोग्यदृष्ट्या दूरगामी परिणाम होतील, असे म्हणता येणार नाही.. - डॉ. इंद्रजित खांडेकर,न्यायवैद्यक शाखाप्रमुख, महात्मा गांधी आर्युर्विज्ञान संस्था, सेवाग्राम. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या