शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

हिंगणघाट जळीत प्रकरण: नकार पचविणे अवघड गेल्याने नराधमाने केले अमानुष कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:26 IST

भर रस्त्यात प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देणारा आरोपी विक्की नगराळेने पीडितेला लग्नाची गळ घातली होती.

वर्धा : भर रस्त्यात प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला पेटवून देणारा आरोपी विक्की नगराळेने पीडितेला लग्नाची गळ घातली होती. परंतु उच्च शिक्षीत पीडितेचा नकार पचविणे नराधमाला कठीण गेल्याने त्याने हे अमानुष कृत्य केल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. याप्रकरणात पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी ६ साक्षदारांची जबाब नोंदविले आहेत.

आरोपी विकेश नगराळे याने लग्नापूर्वी पीडितेला लग्नाची गळ घातली होती. त्याचा विवाह होऊन त्याला एक मुलगी झाली आहे. असे असतानाही तो वारंवार फोन करुन पीडितेला त्रास देत होता. २४ जानेवारी रोजी दोघांनी भेटण्याचे ठरविले. भेटल्यानंतर पीडितेने विकेशला वारंवार फोन का करतो, माझा पाठलाग का करतो, यानंतर मला फोन करायचा नाही, अशा शब्दात सुनावले होते. त्यामुळे अपमानित झालेल्या विकेशने पीडितेला संपविण्याचाच कट रचला.

आरोपी विक्कीने रविवारी रात्रीच हल्ल्याची तयारी केली होती. सोमवार उजाडताच त्याने पहाटे गाव सोडून हिंगणघाट येथील नंदोरी चौक गाठला. तेथून महाविद्यालयाकडे पायी जात असलेल्या प्राध्यापिकेला गाठून तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

आरोपीची पत्नी म्हणाली...

विकेशने आपल्या लहान मुलीचा विचार करायला हवा होता. तो असे काही करेल, असे वाटले नव्हते. घटनेच्या आदल्या दिवशी ते प्रचंड अस्वस्थ होते. फोनवर कुणाशी तरी बोलत होते. दुसऱ्या दिवशी ते पहाटेच घराबाहेर पडले आणि काही वेळातच या भयावह घटनेची माहिती पोलिसांकडूनच आम्हा परिवारातील सदस्यांना मिळाली, असे आरोपीच्या पत्नीने सांगितले.

ही घटना अत्यंत खेदजनक आहे,भर रस्त्यावर ही घटना झाली, प्रथमदर्शीच आरोपीला लोकांनी बघितले आहे आणि असे आरोपी मानवाधिकार कक्षेतून बाहेर असायला पाहिजे. अशी प्रकरणे एक महिन्यात निकाली काढून आरोपीस सार्वजनिक स्थळी फाशी व्हावी जेणेकरून असे गुन्हे करताना लोकांना जबर बसेल.- डॉ. अंजली साळवे, माजी समुपदेशक, तक्रार व तपास विभाग, राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली.

धाकच राहिला नाही

निर्भया हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यानंतरही वारंवार तारीख बदलविली जात आहे. त्यामुळे देशात कायद्याचा धाक राहिला नसल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होतो. इतकेच नव्हे, तर पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी आमदार विद्या चव्हाण यांनी वर्धा येथे पत्रपरिषदेत व्यक्त केले.

हैदराबादसारखं करा

हिंगणघाटच्या नराधमाला हैदराबादसारखी शिक्षा द्या, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी येथे केली.

टॅग्स :HinganghatहिंगणघाटPoliceपोलिसfireआगArrestअटकMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार