शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पदयात्रा

By admin | Updated: December 13, 2014 02:09 IST

विदर्भातील शेतकरी हा निसर्ग आणि शासनाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. शासनाने मदतीचे आश्वासने दिली मात्र पूर्ण केली नाही.

सेवाग्राम : विदर्भातील शेतकरी हा निसर्ग आणि शासनाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. शासनाने मदतीचे आश्वासने दिली मात्र पूर्ण केली नाही. राज्य शासनाचे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी किसान अधिकार अभियानने मुख्यमंत्र्यांच्या घरी पाहुणचार आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारला सेवाग्राम, बापू कुटीपासून पदयात्रा काढून आंदोलनला प्रारंभ करण्यात आले.या आंदोलनात वर्धा, चंद्रपूर, वाशिम, वणी, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले आहे. ही पदयात्रा १५ डिसेंबरला दुपारला नागपूर येथे पोहचणार आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर मागण्या पूर्ण होईपर्यंत मुक्काम करणार आहे.सेवाग्राम महात्मा गांधी आश्रमात सर्व शेतकरी एकत्रित झाल्यानंतर किसान अधिकार अभियानचे प्रवक्ते अविनाश काकडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. शेतकरी दुष्काळाच्या वेढ्यात सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांना या स्थितीत भरीव मदत करावी, अशी अपेक्षा आहे. सोयाबीन व कापसाला जो हमी भाव जाहीर झाला होता. त्यापेक्षा जास्त भावात खरेदी करावा, तसेच सोयाबीन पूर्णत: बुडाल्याने २५ हजार रूपये हेक्टरी मदत करावी. कृषी संजीवनी योजनेचा लाभ, सातबारा कोरा करणे तसेच वर्धा, नागपूर व बुलढाणा या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या रकमा परतीसाठी मदत करावी, या मागण्याच्या समावेश आहे. यासह प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी या पायदळ आंदोलनातून करण्यात येणार आहे. यावेळी चंद्रकांत वानखेडे यांनी शासनाने सतत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. आता मात्र या आंदोलनातून सरकारला जागविण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व आंदोलकांनी बापू कुटीत महात्मा गांधी यांना आदरांजली वाहून पदयात्रेला प्रारंभ केला. यानंतर मेडिकल चौकात सेवाग्राम ग्रामपंचायतच्यावतीने पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व चंद्रकांत वानखेडे, गजानन अहमदाबादकर, अविनाश काकडे, सुदाम पवार करणार आहे. यात प्रमोद ठाकरे, मंदा ठाकरे, हरिभाऊ डुकरे, विठ्ठल झाडे, भाऊराव काकडे, विनायक गोमासे, संतोष सावकर, माधुरी भोगे, सुनिता अडतकर, बेबी हिवरे, सुजाता उमरे, दिवाकर होणाडे, शेखर गुजरकर, प्रफुल कुकडे, गजानन वाकुडकर, आदी शेतकरी मोठ्या संख्येनी सहभागी आहेत.(वार्ताहर)