शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पदयात्रा

By admin | Updated: December 13, 2014 02:09 IST

विदर्भातील शेतकरी हा निसर्ग आणि शासनाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. शासनाने मदतीचे आश्वासने दिली मात्र पूर्ण केली नाही.

सेवाग्राम : विदर्भातील शेतकरी हा निसर्ग आणि शासनाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. शासनाने मदतीचे आश्वासने दिली मात्र पूर्ण केली नाही. राज्य शासनाचे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी किसान अधिकार अभियानने मुख्यमंत्र्यांच्या घरी पाहुणचार आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारला सेवाग्राम, बापू कुटीपासून पदयात्रा काढून आंदोलनला प्रारंभ करण्यात आले.या आंदोलनात वर्धा, चंद्रपूर, वाशिम, वणी, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले आहे. ही पदयात्रा १५ डिसेंबरला दुपारला नागपूर येथे पोहचणार आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर मागण्या पूर्ण होईपर्यंत मुक्काम करणार आहे.सेवाग्राम महात्मा गांधी आश्रमात सर्व शेतकरी एकत्रित झाल्यानंतर किसान अधिकार अभियानचे प्रवक्ते अविनाश काकडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. शेतकरी दुष्काळाच्या वेढ्यात सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांना या स्थितीत भरीव मदत करावी, अशी अपेक्षा आहे. सोयाबीन व कापसाला जो हमी भाव जाहीर झाला होता. त्यापेक्षा जास्त भावात खरेदी करावा, तसेच सोयाबीन पूर्णत: बुडाल्याने २५ हजार रूपये हेक्टरी मदत करावी. कृषी संजीवनी योजनेचा लाभ, सातबारा कोरा करणे तसेच वर्धा, नागपूर व बुलढाणा या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या रकमा परतीसाठी मदत करावी, या मागण्याच्या समावेश आहे. यासह प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावे, अशी मागणी या पायदळ आंदोलनातून करण्यात येणार आहे. यावेळी चंद्रकांत वानखेडे यांनी शासनाने सतत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे. आता मात्र या आंदोलनातून सरकारला जागविण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व आंदोलकांनी बापू कुटीत महात्मा गांधी यांना आदरांजली वाहून पदयात्रेला प्रारंभ केला. यानंतर मेडिकल चौकात सेवाग्राम ग्रामपंचायतच्यावतीने पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व चंद्रकांत वानखेडे, गजानन अहमदाबादकर, अविनाश काकडे, सुदाम पवार करणार आहे. यात प्रमोद ठाकरे, मंदा ठाकरे, हरिभाऊ डुकरे, विठ्ठल झाडे, भाऊराव काकडे, विनायक गोमासे, संतोष सावकर, माधुरी भोगे, सुनिता अडतकर, बेबी हिवरे, सुजाता उमरे, दिवाकर होणाडे, शेखर गुजरकर, प्रफुल कुकडे, गजानन वाकुडकर, आदी शेतकरी मोठ्या संख्येनी सहभागी आहेत.(वार्ताहर)