शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बिजिंगमधून वर्धेत आलेल्या १३ विद्यार्थिनींवर ठेवली पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 5:00 AM

महात्मा गांधी आंतराष्ट्रीय विद्यापीठात २ फेबु्रवारीला १३ विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीन येथील बिजिंग येथून आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना तातडीने आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. शिवाय त्यांच्या रक्ताचे आणि घशातील द्रवाचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.

ठळक मुद्दे१४ दिवस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष ठेऊन ‘कोरोना निगेटिव्ह’ची केली पुष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग धास्तावले आहे. इतकेच नव्हे तर आतापर्यंत जगात तब्बल ७१ हजार ३३० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे तर १ हजार ७७५ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमीवर चीन येथील बिजिंग येथून वर्धा येथील हिंदी विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या १३ विद्यार्थिनींवर सलग १४ दिवस लक्ष ठेऊन त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याची पुष्टी आरोग्य विभागातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली आहे.महात्मा गांधी आंतराष्ट्रीय विद्यापीठात २ फेबु्रवारीला १३ विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीन येथील बिजिंग येथून आल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानंतर या विद्यार्थ्यांना तातडीने आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. शिवाय त्यांच्या रक्ताचे आणि घशातील द्रवाचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यासह चीन मधून आलेल्या या विद्यार्थिनींना कोरोनाची लागन तर झालेली नाही तसेच लागन झाली असेल्यास हा आजार पसरू नये म्हणून दक्षता घेण्यात आली. तब्बल १४ दिवस या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकाºयांच्या निघरानीत आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले होते. सर्वबाजू तपासल्यानंतर या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागन नसल्याचे पुढे आले असल्याचे सांगण्यात आले.बिजिंग येथील काही विद्यार्थिनी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिक्षणासाठी आल्याची माहिती मिळताच त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. शिवाय त्यांना सलग १४ दिवस वैद्यकीय अधिकाºयांच्या निघरानीत ठेऊन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. शिवाय त्यांच्या रक्तासह घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. सध्या त्यांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून नागरिकांनीही घाबरू नये.- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.ताप, खोकला, श्वासोश्वासास अडथळा निर्माण होणे ही कोरोना विषाणू संसर्गाची प्राथमिक लक्षणे आहेत. असे असले तरी वर्धा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटीव्ह आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.कोरोना संसर्गाची लक्षणेताप, खोकला, श्वासोश्वासास अडथळा निर्माण होणे ही कोरोना विषाणू संसर्गाची प्राथमिक लक्षणे आहेत. चीन मध्ये या संसर्ग जन्य आजारामुळे हाहाकार माजला असला तरी भारतात अद्यापही त्याचा अतिरेक झालेला नाही. शिवाय राज्यात एकही रुग्ण पॉझिटीव्ह आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनीही घाबरण्याचे कारण नसल्याचे म्हणने आरोग्य विभागाचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना