शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

निम्मे पाणी वाहते नाल्यांत

By admin | Published: January 25, 2015 11:19 PM

शहराला पाणीपुरवठा करणारी योजना सदोष असल्याने निम्मे पाणी वाया जात आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असतानाही सुमारे आठ लाख लिटर पाणी शहरातील नाल्यांतून वाहत आहे.

वर्धा : शहराला पाणीपुरवठा करणारी योजना सदोष असल्याने निम्मे पाणी वाया जात आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असतानाही सुमारे आठ लाख लिटर पाणी शहरातील नाल्यांतून वाहत आहे. याचा फटका पालिकेला बसत असल्याने पाणीपुरवठा योजना पालिकेकरिता नुकसानीची ठरत आहे.वर्धेला पाणी पुरवठा करण्याकरिता पवनार व येळाकेळी येथून पाणी घेतल्या जाते. येळाकेळी येथे १७ तर पवनार येथून १२ एमएलडी (मिलियन लिटर पर डे) पाणी पुरविण्याची ताकद आहे. शहराला दिवसाआड १६ एमएलडी पाण्याची गरज भासते. तेवढे पाणी या दोनही केंद्रातून घेतले जात असून यातील निम्मे पाणी वाया जात आहे. याला केवळ पालिकेची सदोष पाणीपुरवठा योजना कारण असल्याचे समोर आले आहे.शहरात पालिकेच्या एकूण १४ हजार नळ जोडण्या असल्याची नोंद आहे. ३७० सार्वजनिक नळ आहेत. या नळांना पाणी पुरविण्याकरिता असलेली नळ योजना कुचकामी ठरत आहे. पाणी मुबलक असताना केवळ नळाला दाब येत नसल्याने वेळेपेक्षा अधिक काळ नळ सुरू असतात. यामुळे पाण्याचा अपव्य होत आहे. एकाच लाईनमध्ये असलेले नळ सुमारे तीन ते चार तास सुरू ठेवावे लागतात. एका घरी पाणी भरण्याकरिता साधारणत: अर्धा तासाचा कालावधी पुरेसा आहे; मात्र या अर्ध्या तासाकरिता नळ तीन ते चार तास सुरू राहत असल्याने पाण्याचा अपव्यय आहे. पालिकेच्यावतीने एका अर्धा इंची नळाकरिता वर्षाकाठी सरासरी १ हजार ५०० रुपयांचे देयक आकारण्यात येत आहे. पाण्याच्या अपव्ययामुळे पालिकेला अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत आहे.(प्रतिनिधी)