शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

कारंजा तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 22:46 IST

तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोटी रुपयांची सर्वाधिक कामे मागील चार वर्षांत करण्यात आली. असे असताना तालुका तहानलेला भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवारअंतर्गत सर्वाधिक कामे : कोटी रुपयांवर निधी खर्च

विजय चौधरी।लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोटी रुपयांची सर्वाधिक कामे मागील चार वर्षांत करण्यात आली. असे असताना तालुका तहानलेला भीषण पाणी समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती पाहायला मिळत आहे.तालुक्यात २०१५-१६ या वर्षांत जलयुक्त शिवारअंतर्गत ५२ गावांमध्ये कामांना प्रारंभ झाला. या गावांमध्ये नाला खोलीकरण, ढाळीचे काम, धुऱ्यावर बंधारा, शेततळे, सिमेंट नालाबांध अशी ४५० कामे करण्यात आलीत.२०१६-१७ या वर्षांत १८ गावांत जलयुक्त शिवार योजनेची ११० कामे मंजूर होती. त्यापैकी १०६ कामे झाली. उर्वरित ४ कामांपैकी नागाझरी येथील नाला खोलीकरण रद्द करण्यात आले तर ३ कामे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आलीत. या वर्षात नाला खोलीकरणाची ८६ कामे, ढाळीचे काम १९ तर १ सिमेंट नाला बांधकाम करण्यात आले. २०१७-१८ या वर्षात १८ गावांत ६७ कामे करण्यात आलीत. यात ६ ढाळीचे बांध, ५४ नाला खोलीकरण व ७ जुने सिमेंट नाला बांध ही कामे करण्यात आली. या सर्व कामांवर १ कोटी २३ लाख ३ हजार ४७ रुपये खर्च करण्यात आला. २०१८-१९ या चालू वर्षात २१ गावांमध्ये एकूण ७३ कामे मंजूर असून यापैकी ६ कामे रद्द करण्यात आली आहेत. उर्वरित कामे पूर्ण झाली असून काही ठिकाणची कामे अंतिम टप्प्यात आहेत. यावर्षीच्या कामात ६२ कामे नाला खोलीकरण ११ ढाळीचे बांध आहेत. रद्द झालेल्या ६ कामांपैकी ३ शेतकऱ्यांनी नकार दिला असून ३ ठिकाणी भूजल सर्वेक्षणाची कामे सुरू असल्यामुळे कृषी विभागाला ती कामे करता आली नाहीत. या वर्षीच्या कामावर एकूण खर्च १ कोटी २१ लाख ४४ हजार ६६८ मंजूर आहेत.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक कामे या तालुक्यात करण्यात आली. काही शेतकºयांनी कामाविषयी तक्रारीसुद्धा केल्या असल्याचे समजते. कारण फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होईल, अशी भिती शेतकऱ्यांना होती. कृषी विभागाद्वारे तक्रारीची चौकशी सुद्धा करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवालही सादर करण्यात आला.मागील चार वर्षांपासून ही कामे सुरू असून एकच गाव पुन्हा या योजनेमध्ये पुन्हा समाविष्ट करण्यात आले नाही. बऱ्याच ठिकाणी नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध ही कामे पाण्याच्या प्रवाहाने फुटली. काही ठिकाणी गाळदेखील साचलेला आहे. त्यामुळे शासनाच्या या योजनेचा जो चांगला उद्देश होता तोच मुळात साध्य झाला नाही. पावसाळ्यात काही दिवस पाणी असते, नंतर हे बांध कोरडे पडलेले असतात.जलयुक्तच्या कामांमुळे अनेक शेतकºयांना झाला फायदायाबाबत तालुका कृषी अधिकारी विजय महंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे. याशिवाय मागील ३ वर्षांत ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेद्वारे ११४ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर झालेत. या योजनेत १७ हजारांपासून ५० हजारापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात निधी मंजूर झाला. मागील वर्षी ७० टक्के पाऊस पडला. १४ सप्टेंबर २०१८ पासून पाऊस बंद झाला. तरीही आलेल्या पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने मार्च, एप्रिलपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरींना व बोअरवेलला फायदा झाला.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार