शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

अनुवाद आणि भाषा प्रशिक्षणासाठी मोठा वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

अनुवाद आणि भाषा प्रशिक्षणाकरिता येथे मोठा वाव असून यासाठी प्रशिक्षण योजना तयार केली तर देशभरातील शिक्षक, अनुवादक आणि विद्यार्थी येथे येतील. राजभाषा हिंदी करिता केंद्रीय प्रशिक्षण संस्था म्हणून विश्व विद्यालयाला मान्यता देण्याच्या दिशेने योग्य पाऊले उचलण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रपतीचे सचिव संजय कोठारी यांनी केले.

ठळक मुद्देसंजय कोठारी : विद्यार्थी, शिक्षकांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विश्वविद्यालयात गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर विदेशी आणि भारतातील अधिकाऱ्यांकरिता अभ्यासक्रम तयार केला पाहिजे, जेणेकरून गांधीजींचे ग्राम स्वावलंबन आणि स्वयंपूर्ण खेडी असे विचार प्रसारित केले जातील. अनुवाद आणि भाषा प्रशिक्षणाकरिता येथे मोठा वाव असून यासाठी प्रशिक्षण योजना तयार केली तर देशभरातील शिक्षक, अनुवादक आणि विद्यार्थी येथे येतील. राजभाषा हिंदी करिता केंद्रीय प्रशिक्षण संस्था म्हणून विश्व विद्यालयाला मान्यता देण्याच्या दिशेने योग्य पाऊले उचलण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रपतीचे सचिव संजय कोठारी यांनी केले.महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाला त्यांनी रविवारी भेट दिली. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधताना ते बोलत होते.प्रो. रजनीशकुमार शुक्ल यांनी कोठारी यांचे चरखा, पुष्पगुच्छ, विश्वविद्यालयाची पुस्तके, सूतमाळा प्रदान करुन स्वागत केले. विश्वविद्यालयात त्यांनी गांधी हिलवर गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी विद्याथ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि सुविधांवर प्रश्न विचारले. कोठारीे म्हणाले, राष्ट्रपतीजींच्या अधीन देशभरातील १५० केंद्रीय विद्यापीठे आणि संस्था येतात. त्यांचे सामान्य अवलोकन करण्यासाठी वर्धा विश्वविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठांमध्ये नावीन्यपूर्ण काय करता येईल हे पाहण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांची स्पष्ट केले. हिंदी विश्व विद्यालयापासून त्याचा प्रारंभ होत आहे असेही ते म्हणाले. १९७८ बॅचचे व हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले कोठारी यांनी विविध सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम याविषयी विस्ताराने चर्चा केली. विश्वविद्यालयांनी माजी विद्यार्थी संघ बळकट करून त्यांचा लाभ करून घ्यावा व त्यांना आपणही काही देणे लागतो याविषयी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी समस्या व सुविधा याविषयी विचारलेल्या प्रश्नांविषयी थेट संवाद साधला. कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल, प्र-कुलगुरू प्रो. चंद्र्रकांत रागीट, प्रो. हनुमान प्रसाद शुक्ल, प्रो. मनोज कुमार, कुलसचिव कादर नवाज खान यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्रो. अवधेशकुमार यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन प्रकुलगुरु प्रो. हनुमानप्रसाद शुक्ल यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यांनी उन्नत भारत अभियाना अंतर्गत नांदोरा, गणेशपूर, सोनेगाव बाई, तळेगाव टालाटुले आणि तामसवाडा येथील नागरिक आणि शेतकरी यांच्याशीही चर्चा केली. स्वच्छ भारत अभियान, महिला सक्षमीकरण, ग्राम स्वावलंबन, आरोग्य सोयी, महिला बचत समूह याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. उन्नत भारत अभियानाअंतर्गत या गावांमध्ये विश्वविद्यालय काम करीत आहे. त्यांनी स्वामी सहजानंद सरस्वती संग्रहालयाचेही निरीक्षण केले. त्यांनी सेवाग्राम आणि पवनार आश्रमाला भेट देऊन तेथील महात्म्य जाणून घेतले. बापू कुटीमध्ये सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू आणि पवनार आश्रमात गौतम बजाज यांनी त्यांना आश्रमांविषयी माहिती दिली. कोठारी यांच्यासमवेत त्यांची पत्नी व मुलगीही होत्या.

टॅग्स :Socialसामाजिक