शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीला पडला स्वच्छतेचा विसर

By admin | Updated: December 13, 2014 02:13 IST

देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे; पण तीर्थक्षेत्र टाकरखेड यास अपवाद ठरत आहे़

टाकरखेड : देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे; पण तीर्थक्षेत्र टाकरखेड यास अपवाद ठरत आहे़ ग्रा़पं़ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गावात स्वच्छतेचा बोजवारा वाजला आहे़ ग्रा़पं़ प्रशासनाला स्वच्छतेचा विसरच पडल्याचे गावातील एकूण चित्रावरून दिसते़ यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे़ गावात ऐन रस्त्यावर शेणाचे उकिरडे साचले आहे़ गावाचा दर्शनी भाग हागणदारीयुक्त असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे़ या अस्वच्छतेचा परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे़ संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी तीर्थक्षेत्राच्या अस्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ श्री संत लहानुजी महाराजांच्या पावनभूमीत दर्शनास राज्याच्या कानाकोपऱ्यातून दैनंदिन भाविकांची ये-जा सुरू असते; पण येथे येताना गावाच्या दर्शनी भागात नाकावर हात वा रूमाल ठेवून प्रवेश करावा लागतो, ही या गोदरीयुक्त गावाची शोकांतिका आहे़आदर्श व नावलौकिक असलेल्या गावात तीर्थक्षेत्र विकास निधीतून आमदार, माजी आमदार, माजी जि़प़ सदस्य, माजी पं़स़ उपसभापती यांच्या प्रयत्नाने सुुंदर व चांगल्या दर्जाचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविण्यात आले आहेत; पण आता याच रस्त्यावर ऐन रहदारीच्या ठिकाणी वस्तीमध्ये अनेकांनी शेणाचे उकिरडे तयार केले आहेत़ शिवाय जनावरांचे गोठेही रस्त्यावरच उभारले आहेत़ यामुळे सर्वत्र घाण निर्माण झाली आहे़ या प्रकारामुळे शाळेचा परिसरही घाणीच्या साम्राज्यात हरवला आहे़ ग्रामपंचायत प्रशासनाने गावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने काही नागरिकांचा मनमानी कारभार सुरू आहे़ दिवसेंदिवस रस्त्यावर घाण वाढत आहे़ सोबतच पऱ्हाट्याचे ढिगारे आणि घराचे ओटे समोर करून अतिक्रमणही करण्यात आले आहे़ यामुळे हे गाव आहे की गोठाण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ गत अनेक वर्षांपासून या गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले नाही़ गावातील विविध समित्या केवळ कागदोपत्रीच दाखविण्यात येत असल्याचे दिसते़ देशात सर्वत्र स्वच्छेतेची शपथ घेऊन अभियान राबविले जात आहे; पण येथील ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छतेचा विसर पडल्याचेच दिसून येत आहे़ गावातील घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ चिमुकल्यांसह वृद्धांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे़ गावातील घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)