शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचे वावडेच

By admin | Updated: August 20, 2016 01:59 IST

पदवीधर अंशकालीन कर्मचारी वर्गाला विनाअट आणि बिना विलंब शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भात लढा सुरू आहे;

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास उपोषण वर्धा : पदवीधर अंशकालीन कर्मचारी वर्गाला विनाअट आणि बिना विलंब शासकीय सेवेत सामावून घेण्यासंदर्भात लढा सुरू आहे; मात्र त्यांना यात अपयशच येत आहे. याच संदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पदवीधर अंशकालीन कर्मचारी संषर्घ संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवदेन सादर करण्यात आले. राज्य शासनाच्या उद्योजकता विभाग व कौशल्य विकास मंत्रालय मुंबई अंतर्गत ७ एप्रिल २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत पदवीधर अशंकालीन कर्मचाऱ्याना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. सदर निर्देशानुसार विविध विभागांनी कार्यवाही सुरू केली असून ती प्रक्रीया पूर्ण झाली पण त्याची अंमलबजावणी नसल्याचा आरोप संघटनेच्यावतीने केला आहे. गत १७ वर्षांत महाराष्ट्रात अनेक पक्षाचे सरकार अस्तित्वात आले. सत्तेचा उपभोग घेवून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले; पण त्याची पुर्तता नसल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी ९ जून २०१४ ला आझाद मैदान मुंबई येथे साखळी उपोषण सुरू असताना पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे अश्रू पुसण्याचे आश्वासन सध्या सत्तेत असलेल्यांनी दिले होते. यामुळे अंशकालीन कर्मचारी नौकरीची आशा निर्माण झाली. या मागणीकरिता अनेकवार निवेदन दिली, त्याचा कुठलाही उपयोग नाही. यामुळे विदर्भातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास २७ आॅगस्ट २०१६ पासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.(प्रतिनिधी)