शासनाने गवंडी कामगारांच्या हिताचे धोरण निश्चित करावे
By Admin | Updated: June 24, 2015 02:24 IST2015-06-24T02:24:25+5:302015-06-24T02:24:25+5:30
गवंडी कामगारांचे सद्यस्थितीत अनेक प्रश्न आहेत. मिस्त्री, मजूर व ठेकेदार यांना पुरेसे काम मिळत नसल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाने गवंडी कामगारांच्या हिताचे धोरण निश्चित करावे
समुद्रपूर : गवंडी कामगारांचे सद्यस्थितीत अनेक प्रश्न आहेत. मिस्त्री, मजूर व ठेकेदार यांना पुरेसे काम मिळत नसल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने गवंडी कामगारांच्या हिताचे धोरण निश्चित करून त्यांना दिलासा द्यावा असे प्रतिपादन कृ.उ.बा.स. समुद्रपूरचे सभापती हिंमत चतुर यांनी केले.
समुद्रपूर येथे गवंडी मजूर युनियनच्यावतीने जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला. यावेळी कामगारांच्या हक्कांवर चर्चा करण्यात आली. यानंतर बोलताना रिपाइं नेते विजय आगलावे यांनी समायोचित मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. मेघश्याम ढाकरे, निरंजन मेढे, प्रशांत रामटेके यांची उपस्थिती होती.
गवंडी कामगारांच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाने मदतीचा हात देवून शासनाच्या प्रत्येक कामात स्थानिक कामगारांना सहभागी करून घ्यावे, त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे मत निरंजन मेंढे यांनी मांडले. शासनाच्या कामगार कल्याण धोरणांतर्गत विविध योजनांचा लाभ गवंडी कामगारांना मिळावा, प्रशासनाने गवंडी कामगारांसाठी जिल्हावार आराखडा तयार करून बांधकामांची संधी स्थानिकांना प्राधान्याने देण्याची योजना राबवावी, असे विचार मान्यवरांनी मांडले. संचालन आशिष अंड्रसकर यांनी केले तर आभार संजय गिरोले यांनी मानले. यानंतर समुद्रपूर शाखेची कार्यकारिणी गठित केली. यात तालुकाध्यक्ष संजय गिरोले, उपाध्यक्ष अरुण सुरपाम, सचिव नंदू दारुनकर यांच्यासह सदस्यपदी मनोज मून, राजू भगत, अशोक उईके, रतन शेंडे, मारोती बावणे, गुलाब रोकडे, शरद नवघरे, रमेश चावरे, दशरथ ठोंबरे, प्रवीण वाघमारे, मारोती गुंडे यांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी शरद रामटेके, नत्थुजी दरोडे, गजानन मारबते, रामभाऊ गणवीर आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)