शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत द्या

By admin | Updated: December 13, 2014 02:06 IST

यंदा खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिली़ यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले़ बी-बियाण्यांच्या खर्चाने ...

हिंगणघाट : यंदा खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिली़ यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले़ बी-बियाण्यांच्या खर्चाने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. या संकटाचा सामना करण्याकरिता शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू तिमांडे व शिष्टमंडळाने केली़ याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले़नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. या स्थितीत सरकारने मदत करणे अत्यंत आवश्यक आहे़ पावसाच्या लपंडावामुळे सोयाबीन, कापुस, तूर आदी पिकांची पेरणी दीड महिना उशिराने करण्यात आली़ त्यामुळे उत्पन्न प्रभावित झाले. मध्यंतरीच्या कालावधीत पावसाच्या गैरहजेरीने कापुस, सोयाबीन, तुर पिके गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे एकरी उत्पादन ५० किलोपासून मिळत आहे. अशी अल्प उतारी आल्यामुळे यंदाचा खर्च निघण्याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. काही शेतकऱ्यांना शेतात गुरे सोडून सोयाबीनचे पीक सवंगणाचे कामच राहीले नाही़ यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली़ खरीप हंगामात कापसाच्या पिकाला पुरेसे पाणी मिळू शकले नाही़ त्यामुळे कपाशीची वाढ खुंटली आहे. जमिनीला भेगा गेल्या असून किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यंतरी धुक्यांमुळे कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव जाणवत आहे. तुरीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव असल्याने उत्पनाची हमी नाहीच. पावसामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका सहन करावा लागला. फळांची काही झाडे सुकली आहे़ अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे़ भारनियमनाने पाणी असताना ओलित होऊ शकत नाही़ पिकांना पाणी न मिळाल्याने पिके सुकत आहे. भारनियमन तातडीने बंद करण्यात यावे़, अशी मागणी करण्यात आली.सरकारच्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीपंपाचे वीज बील १०० टक्के माफ करण्यात यावे़ तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने एकरी २५ हजार रूपयाची मदत देऊन दिलासा द्यावा, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १ लाख रूपयाची मदत जाहीर करावी़, अशी मागणी केली. यावेळी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, शशांक घोडमारे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)