शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत द्या

By admin | Updated: December 13, 2014 02:06 IST

यंदा खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिली़ यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले़ बी-बियाण्यांच्या खर्चाने ...

हिंगणघाट : यंदा खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिली़ यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले़ बी-बियाण्यांच्या खर्चाने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. या संकटाचा सामना करण्याकरिता शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू तिमांडे व शिष्टमंडळाने केली़ याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले़नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. या स्थितीत सरकारने मदत करणे अत्यंत आवश्यक आहे़ पावसाच्या लपंडावामुळे सोयाबीन, कापुस, तूर आदी पिकांची पेरणी दीड महिना उशिराने करण्यात आली़ त्यामुळे उत्पन्न प्रभावित झाले. मध्यंतरीच्या कालावधीत पावसाच्या गैरहजेरीने कापुस, सोयाबीन, तुर पिके गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे एकरी उत्पादन ५० किलोपासून मिळत आहे. अशी अल्प उतारी आल्यामुळे यंदाचा खर्च निघण्याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. काही शेतकऱ्यांना शेतात गुरे सोडून सोयाबीनचे पीक सवंगणाचे कामच राहीले नाही़ यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली़ खरीप हंगामात कापसाच्या पिकाला पुरेसे पाणी मिळू शकले नाही़ त्यामुळे कपाशीची वाढ खुंटली आहे. जमिनीला भेगा गेल्या असून किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यंतरी धुक्यांमुळे कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव जाणवत आहे. तुरीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव असल्याने उत्पनाची हमी नाहीच. पावसामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका सहन करावा लागला. फळांची काही झाडे सुकली आहे़ अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे़ भारनियमनाने पाणी असताना ओलित होऊ शकत नाही़ पिकांना पाणी न मिळाल्याने पिके सुकत आहे. भारनियमन तातडीने बंद करण्यात यावे़, अशी मागणी करण्यात आली.सरकारच्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीपंपाचे वीज बील १०० टक्के माफ करण्यात यावे़ तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने एकरी २५ हजार रूपयाची मदत देऊन दिलासा द्यावा, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १ लाख रूपयाची मदत जाहीर करावी़, अशी मागणी केली. यावेळी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, शशांक घोडमारे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)