शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

गॅस सिलिंडरचा भडका उडून ५ झोपड्या बेचिराख; संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 13:44 IST

अन्न धान्यासह जीवनावश्यक  साहित्य जळाल्याने पाचही कुटुंब उघड्यावर आले आहेत.

ठळक मुद्देसावली वाघ येथील घटना अंदाजे ५ लाखांचे नुकसान

हिंगणघाट (वर्धा) : तालुक्यातील सावली वाघ येथे सिलिंडरचा भडका उडून आग लागल्याने ५ झोपड्या जळून बेचिराख झाल्या. हिंगणघाट अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेत अंदाजे ५ लाखांचे नुकसान झाल्याच्या अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

आज (दि. २७) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सावली वाघ येथील झोपडपट्टीतील तुकाराम नांदे यांच्या झोपडीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. काही वेळातच आगीने मोठे रुप धारण केले व लगतच्या ४ झोपड्यांना कवेत घेतले. दरम्यान, माहिती मिळताच हिंगणघाटच्या अग्निशमन दलाच्या चमू घटनास्थळ गाठले व आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. 

या आगीत तुकाराम नांदे, माँझिपुडा समर, ऋषी मगरे, मधुकर बोडखे, आशाबाई दोडके यांच्या झोपड्या जळून राख झाल्या. यात घरातील अन्न धान्यासह जीवनावश्यक  साहित्य जळाल्याने पाचही कुटुंब उघड्यावर आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार समसेरखान पठाण, मंडळ अधिकारी प्रशांत निनावे, तलाठी प्रसाद पाचखेडे, पोलीस पाटील विशाल ढेंगळे, कोतवाल प्रकाश निमसरकर, ग्रामसेवक पोहणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ठाकुर घटनास्थळी पोहचून परिस्थिती हाताळली.

टॅग्स :AccidentअपघातfireआगCylinderगॅस सिलेंडरHinganghatहिंगणघाट