शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

कचरा जमा करणारी बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:40 IST

कचऱ्यापासून उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या पारधी व इतर कचरा वेचक लोकांना हक्काचा रोजगार मिळवून देत, कचरा टाकाऊ नसून मौल्यवान आहे, अशी मानसिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कारंजा नगरपंचायतीच्या कल्पक मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी ..........

ठळक मुद्देकारंजा नगरपंचायतीचा उपक्रम : कचऱ्याचे मूल्यांकन करून खात्यात जमा होणार पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कचऱ्यापासून उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या पारधी व इतर कचरा वेचक लोकांना हक्काचा रोजगार मिळवून देत, कचरा टाकाऊ नसून मौल्यवान आहे, अशी मानसिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कारंजा नगरपंचायतीच्या कल्पक मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी २ आॅक्टोबरला स्वच्छ बँक आॅफ कारंजा या नावाने कचरा जमा करणारी बँक निर्माण केली आहे. सुरूवातीला अशक्य आणि नवखी वाटणारी ही कल्पना आता जोर धरू लागली आहे. दररोज अनेक गावकरी इंदिरानगर रोडवर असलेल्या या बँकेत आपला कचरा आणून, कचऱ्याचे मूल्य रक्कम आपल्या स्वच्छ बँक खात्यात जमा करून, उदरनिर्वाहाला हातभार लावत आहे.या बँकेकरिता एका खासगी व्यक्तीने, नगरपंचायतच्या सहकार्याने सुरक्षित शेड बांधले आहे. येथे पैशाऐवजी सुका कचरा मोजमाप करून वेचकांच्या खात्यात डिपॉझिट केला जातो. त्या कचºयाचे मूल्यांकन करून कचरा आणणाऱ्याला पैसे दिले जातात. रिकाम्या दारूच्या बाटल्या थर्मोकॉल, लोह, लोखंड, पत्रे, तार फुटकी भांडी स्वीकारून वर्गीकरण केले जाते. बँकेच्या पासबुकप्रमाणे येथे कचरा मिळकत पासबुक देण्यात येते. तसेच एटीएम कार्डऐवजी आपल्याला ‘स्वच्छता कार्ड’ देण्यात येते. स्वच्छता कार्ड कारंजा क्षेत्रातील काही निवडक दुकानात वापरल्यास आपल्याला खरेदीवर सूट मिळते. या बँकेत बँक मॅनेजरचे काम पुनर्वापर योग्य कचरा खरेदी करणारा व्यक्ती तर बँक करस्पॉडंस्चे काम कचरावेचक करतात.कचरा वेचकांना पुनर्वापर योग्य, सुका कचरा जमा करण्यासाठी नगरपंचायतीने छोटी कचरा गाडी, आणि वजन काटासुद्धा उपलब्ध करून दिला आहे. तसेच वेचकांना ओळख म्हणून नगरपंचायतीतर्फे जॅकेट, हातमोजे, मास्क, ओळखपत्रसुद्धा देण्यात आले आहे.या बँकेचा फायदा म्हणून सध्या रस्त्यावर छोटे भंगार साहित्य दिसून येत नाही. वेचकांधमील न्यूनगंड कमी झाला आहे. त्याच्या कामाला सामाजिक प्रतिष्ठा मिळत आहे. न.पं.च्या कचरा प्रक्रिया केंद्रावर पुनर्वापर योग्य कचऱ्याचे प्रमाण काही अंशी कमी झाल्यामुळे कचरा प्रक्रियेवरील खर्चसुद्धा कमी होत आहे. नागरिकांनी हा प्रयोग पूर्णपणे स्वीकारल्यास, कारंजा शहर या नावीन्यपूर्ण कल्पनेचे जनक होऊ शकते. कचऱ्याप्रती मानसिकता बदलून शहर स्वच्छ निरोगी शहर बनू शकते. कचरा लाखमोलाचा ही संकल्पना नागरिकांच्या मनात रूजविण्याचा मुख्याधिकारी राऊत यांनी अध्यक्षासह सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने सुरू केलेल्या स्वच्छ बँक आॅफ कारंजा या प्रयोगाला साथ द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान