शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कचरा जमा करणारी बँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:40 IST

कचऱ्यापासून उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या पारधी व इतर कचरा वेचक लोकांना हक्काचा रोजगार मिळवून देत, कचरा टाकाऊ नसून मौल्यवान आहे, अशी मानसिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कारंजा नगरपंचायतीच्या कल्पक मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी ..........

ठळक मुद्देकारंजा नगरपंचायतीचा उपक्रम : कचऱ्याचे मूल्यांकन करून खात्यात जमा होणार पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कचऱ्यापासून उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असणाऱ्या पारधी व इतर कचरा वेचक लोकांना हक्काचा रोजगार मिळवून देत, कचरा टाकाऊ नसून मौल्यवान आहे, अशी मानसिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कारंजा नगरपंचायतीच्या कल्पक मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी २ आॅक्टोबरला स्वच्छ बँक आॅफ कारंजा या नावाने कचरा जमा करणारी बँक निर्माण केली आहे. सुरूवातीला अशक्य आणि नवखी वाटणारी ही कल्पना आता जोर धरू लागली आहे. दररोज अनेक गावकरी इंदिरानगर रोडवर असलेल्या या बँकेत आपला कचरा आणून, कचऱ्याचे मूल्य रक्कम आपल्या स्वच्छ बँक खात्यात जमा करून, उदरनिर्वाहाला हातभार लावत आहे.या बँकेकरिता एका खासगी व्यक्तीने, नगरपंचायतच्या सहकार्याने सुरक्षित शेड बांधले आहे. येथे पैशाऐवजी सुका कचरा मोजमाप करून वेचकांच्या खात्यात डिपॉझिट केला जातो. त्या कचºयाचे मूल्यांकन करून कचरा आणणाऱ्याला पैसे दिले जातात. रिकाम्या दारूच्या बाटल्या थर्मोकॉल, लोह, लोखंड, पत्रे, तार फुटकी भांडी स्वीकारून वर्गीकरण केले जाते. बँकेच्या पासबुकप्रमाणे येथे कचरा मिळकत पासबुक देण्यात येते. तसेच एटीएम कार्डऐवजी आपल्याला ‘स्वच्छता कार्ड’ देण्यात येते. स्वच्छता कार्ड कारंजा क्षेत्रातील काही निवडक दुकानात वापरल्यास आपल्याला खरेदीवर सूट मिळते. या बँकेत बँक मॅनेजरचे काम पुनर्वापर योग्य कचरा खरेदी करणारा व्यक्ती तर बँक करस्पॉडंस्चे काम कचरावेचक करतात.कचरा वेचकांना पुनर्वापर योग्य, सुका कचरा जमा करण्यासाठी नगरपंचायतीने छोटी कचरा गाडी, आणि वजन काटासुद्धा उपलब्ध करून दिला आहे. तसेच वेचकांना ओळख म्हणून नगरपंचायतीतर्फे जॅकेट, हातमोजे, मास्क, ओळखपत्रसुद्धा देण्यात आले आहे.या बँकेचा फायदा म्हणून सध्या रस्त्यावर छोटे भंगार साहित्य दिसून येत नाही. वेचकांधमील न्यूनगंड कमी झाला आहे. त्याच्या कामाला सामाजिक प्रतिष्ठा मिळत आहे. न.पं.च्या कचरा प्रक्रिया केंद्रावर पुनर्वापर योग्य कचऱ्याचे प्रमाण काही अंशी कमी झाल्यामुळे कचरा प्रक्रियेवरील खर्चसुद्धा कमी होत आहे. नागरिकांनी हा प्रयोग पूर्णपणे स्वीकारल्यास, कारंजा शहर या नावीन्यपूर्ण कल्पनेचे जनक होऊ शकते. कचऱ्याप्रती मानसिकता बदलून शहर स्वच्छ निरोगी शहर बनू शकते. कचरा लाखमोलाचा ही संकल्पना नागरिकांच्या मनात रूजविण्याचा मुख्याधिकारी राऊत यांनी अध्यक्षासह सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने सुरू केलेल्या स्वच्छ बँक आॅफ कारंजा या प्रयोगाला साथ द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान