शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

गांधीवर तेव्हाही आरोप झाले अन् आताही होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:34 IST

गांधींनी यांनी जातीय समानता, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, हे मूल्य या राष्ट्रात रूजविण्यासाठी कार्य केले. कारण हा देश जेवढा हिंदूचा आहे, तेवढाच या देशावर मुस्लिमांचाही अधिकार आहे, असे ते लोकांना सांगत. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा विरोध पत्करण्याची वेळ बापूंवर आली होती.

ठळक मुद्देअपूर्वानंद झा : ‘गांधींचा मृत्यू’ विषयावर सेवाग्राम आश्रमात विशेष व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : गांधींनी यांनी जातीय समानता, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, हे मूल्य या राष्ट्रात रूजविण्यासाठी कार्य केले. कारण हा देश जेवढा हिंदूचा आहे, तेवढाच या देशावर मुस्लिमांचाही अधिकार आहे, असे ते लोकांना सांगत. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा विरोध पत्करण्याची वेळ बापूंवर आली होती. देशात अल्पसंख्यकांच्या नैतिक अधिकाराचे संरक्षण व्हायला पाहिजे, असाही प्रयत्न त्यांचा होता. गांधींवर खोटे आरोप सतत केल्या गेले; शिवाय ते आजही होत आहेत. त्यातील काही मंत्री तर काही प्रधानमंत्री झाले. गांधींना बदनाम करणे सुरूच असल्याने आज खऱ्या अर्थाने गांधीजींचे विचार व कार्य लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अपूर्वानंद झा यांनी केले.सेवाग्राम आश्रमात गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘गांधींचा मृत्यू’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू तर प्रमुख अतिथी म्हणून सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. अपूर्वानंद झा पुढे म्हणाले, गांधीजींनी प्रार्थनेला खुप महत्त्व दिले. जिथे गांधीजी जात त्या ठिकाणी प्रार्थना होत असे. कलकत्ता येथे प्रार्थनेत विरोध झाला त्यावेळी बापूंनी समजावून सांगितले. प्रार्थना व वचने कायम ठेवली. बदल हा हळुहळू होत असतो तसेच गांधीजी सुद्धा हळूहळू घडायला लागले. गांधीजींनी नेहमीच परिवर्तन स्विकारले होते. त्यांनी फक्त सत्याची पर्वा केली असेही झा यांनी सांगितले. देश स्वातंत्र्याच्या अंतिम टप्पात असताना दंगली शांत करणासाठी जाण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. त्यावेळीही मोठा विरोध झाला; पण काही निवडक कार्यकर्त्यांना घेत घाबरू नका, घर सोडू नका, हिंसा करू नका, असे आवाहन करू लागले. भेटी, आणि उपोषणामुळे तेथील हिंसा थांबविण्यात यश मिळाले. तर दुसरीकडे कलकत्ता, पंजाब, दिल्ली येथेही दंगली सुरू झाल्या होत्या. दिल्लीत १९४७ मध्ये धार्मिक दंगल भडकली असता गांधीजी दिल्लीत आले. दिल्लीत शरनार्थींची संख्या वाढली. बुढ्ढा मरता है तो मरने दो असे विरोधक म्हणायला लागले. मात्र बापू शांती, अमनसाठी प्रयत्नरत होते. १२५ वर्ष जगण्याची इच्छा ठेवणाºया बापूंना मात्र दंगलीने आता एक दिवस, पण जगायचे नाही असे म्हणायला लावले. उपोषणाचा निर्णय घेताला. तीन दिवसात हिंसाचार थांबला आणि शांती निर्माण झाली. गांधीजीवर सहा हल्ले झाले. त्यातील एक सेवाग्राम आश्रम पुढे झाला. हिंदूना नामर्द बणविले, पाकिस्तानला ५५ कोटी दिले, पाकिस्तानातील हिंदूवर अत्याचार झाला; पण गांधीजींनी काहीही केले नाही. ते देशातील मुस्लीमांची बाजू घेतात असा सनातन्यांनी वारंवार आरोप केला. शिवाय आजही तो केल्या जात आहे. वास्तवात गांधींमुळे खेड्यापासून तर शहरापर्यंत तसेच विदेशातील महिला प्रभावित होऊन गांधीजींच्या चळवळीत व स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या संख्येनी सहभागी झाल्या होत्या. देशात व पाकिस्तानात ज्या दगली भडकल्या त्या थांबविण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत होते. बँ.जीना सोबत चर्चा करीत होते. त्यांनी लाहोरला जाण्याचा निर्णय घेतला होता. जीनानी वचन पाळावे, असे गांधीजींनी सांगितले होते. मग गांधी काहीच करीत नाही हा आरोप मुळातच खोटा असून गांधींना बदनाम आणि मारण्यासाठी सतत प्रयत्न होत असल्याचे दिसून असल्याचे यावेळी प्रा. डॉ. झा यांनी स्पष्ट केले. संचालन जीवन अवथरे यांनी केले.बापूंची हत्याच झालीबापूंना इंग्रजांनी मारले नाही. लाँर्ड माऊंटबॅटन व विंस्टन चर्चिल यांनीही गांधीजींचे विचार व कार्य मानले होते. ब्रिटीश साम्राज्याला सर्वात जास्त धोका गांधींपासून असल्याचे ते मानत. गांधीजींची हत्या झाली तिही प्रार्थनेला जाताना. गोडसे बापूंच्या पाया पडले नंतरच त्यांनी गोळ्या झाडल्या. गांधीचा मृत्यू नाही तर हत्या झाली, असे डॉ. झा म्हणाले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम