शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
5
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
6
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
7
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
8
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
9
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
10
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
11
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
12
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
13
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
14
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
15
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
16
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
17
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
18
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
19
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
20
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!

गांधीवर तेव्हाही आरोप झाले अन् आताही होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:34 IST

गांधींनी यांनी जातीय समानता, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, हे मूल्य या राष्ट्रात रूजविण्यासाठी कार्य केले. कारण हा देश जेवढा हिंदूचा आहे, तेवढाच या देशावर मुस्लिमांचाही अधिकार आहे, असे ते लोकांना सांगत. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा विरोध पत्करण्याची वेळ बापूंवर आली होती.

ठळक मुद्देअपूर्वानंद झा : ‘गांधींचा मृत्यू’ विषयावर सेवाग्राम आश्रमात विशेष व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : गांधींनी यांनी जातीय समानता, अस्पृश्यता निवारण, सर्व धर्म समभाव, हे मूल्य या राष्ट्रात रूजविण्यासाठी कार्य केले. कारण हा देश जेवढा हिंदूचा आहे, तेवढाच या देशावर मुस्लिमांचाही अधिकार आहे, असे ते लोकांना सांगत. तर दुसरीकडे आपल्याच लोकांचा विरोध पत्करण्याची वेळ बापूंवर आली होती. देशात अल्पसंख्यकांच्या नैतिक अधिकाराचे संरक्षण व्हायला पाहिजे, असाही प्रयत्न त्यांचा होता. गांधींवर खोटे आरोप सतत केल्या गेले; शिवाय ते आजही होत आहेत. त्यातील काही मंत्री तर काही प्रधानमंत्री झाले. गांधींना बदनाम करणे सुरूच असल्याने आज खऱ्या अर्थाने गांधीजींचे विचार व कार्य लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अपूर्वानंद झा यांनी केले.सेवाग्राम आश्रमात गांधीजींच्या ७१ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘गांधींचा मृत्यू’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू तर प्रमुख अतिथी म्हणून सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. अपूर्वानंद झा पुढे म्हणाले, गांधीजींनी प्रार्थनेला खुप महत्त्व दिले. जिथे गांधीजी जात त्या ठिकाणी प्रार्थना होत असे. कलकत्ता येथे प्रार्थनेत विरोध झाला त्यावेळी बापूंनी समजावून सांगितले. प्रार्थना व वचने कायम ठेवली. बदल हा हळुहळू होत असतो तसेच गांधीजी सुद्धा हळूहळू घडायला लागले. गांधीजींनी नेहमीच परिवर्तन स्विकारले होते. त्यांनी फक्त सत्याची पर्वा केली असेही झा यांनी सांगितले. देश स्वातंत्र्याच्या अंतिम टप्पात असताना दंगली शांत करणासाठी जाण्याचा निर्णय गांधीजींनी घेतला. त्यावेळीही मोठा विरोध झाला; पण काही निवडक कार्यकर्त्यांना घेत घाबरू नका, घर सोडू नका, हिंसा करू नका, असे आवाहन करू लागले. भेटी, आणि उपोषणामुळे तेथील हिंसा थांबविण्यात यश मिळाले. तर दुसरीकडे कलकत्ता, पंजाब, दिल्ली येथेही दंगली सुरू झाल्या होत्या. दिल्लीत १९४७ मध्ये धार्मिक दंगल भडकली असता गांधीजी दिल्लीत आले. दिल्लीत शरनार्थींची संख्या वाढली. बुढ्ढा मरता है तो मरने दो असे विरोधक म्हणायला लागले. मात्र बापू शांती, अमनसाठी प्रयत्नरत होते. १२५ वर्ष जगण्याची इच्छा ठेवणाºया बापूंना मात्र दंगलीने आता एक दिवस, पण जगायचे नाही असे म्हणायला लावले. उपोषणाचा निर्णय घेताला. तीन दिवसात हिंसाचार थांबला आणि शांती निर्माण झाली. गांधीजीवर सहा हल्ले झाले. त्यातील एक सेवाग्राम आश्रम पुढे झाला. हिंदूना नामर्द बणविले, पाकिस्तानला ५५ कोटी दिले, पाकिस्तानातील हिंदूवर अत्याचार झाला; पण गांधीजींनी काहीही केले नाही. ते देशातील मुस्लीमांची बाजू घेतात असा सनातन्यांनी वारंवार आरोप केला. शिवाय आजही तो केल्या जात आहे. वास्तवात गांधींमुळे खेड्यापासून तर शहरापर्यंत तसेच विदेशातील महिला प्रभावित होऊन गांधीजींच्या चळवळीत व स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या संख्येनी सहभागी झाल्या होत्या. देशात व पाकिस्तानात ज्या दगली भडकल्या त्या थांबविण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत होते. बँ.जीना सोबत चर्चा करीत होते. त्यांनी लाहोरला जाण्याचा निर्णय घेतला होता. जीनानी वचन पाळावे, असे गांधीजींनी सांगितले होते. मग गांधी काहीच करीत नाही हा आरोप मुळातच खोटा असून गांधींना बदनाम आणि मारण्यासाठी सतत प्रयत्न होत असल्याचे दिसून असल्याचे यावेळी प्रा. डॉ. झा यांनी स्पष्ट केले. संचालन जीवन अवथरे यांनी केले.बापूंची हत्याच झालीबापूंना इंग्रजांनी मारले नाही. लाँर्ड माऊंटबॅटन व विंस्टन चर्चिल यांनीही गांधीजींचे विचार व कार्य मानले होते. ब्रिटीश साम्राज्याला सर्वात जास्त धोका गांधींपासून असल्याचे ते मानत. गांधीजींची हत्या झाली तिही प्रार्थनेला जाताना. गोडसे बापूंच्या पाया पडले नंतरच त्यांनी गोळ्या झाडल्या. गांधीचा मृत्यू नाही तर हत्या झाली, असे डॉ. झा म्हणाले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSewagramसेवाग्राम