शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

बँकॉकमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील चार विद्यार्थी स्वगृही परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 4:51 PM

शासनाने ‘वंदे भारत मोहिमेत’ थायलंडचा समावेश करून तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांना स्वगृही पोहोचविले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले आहे.

ठळक मुद्देवर्ध्यातील एकाचा समावेशमहाराष्ट्र मंडळाने दिला आधारविद्यार्थ्यांनी मानले लोकमतचे आभार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणारे विविध राज्यांतील १३ विद्यार्थी थायलंडमध्ये प्रशिक्षणाकरिता गेले असता लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. दरम्यान, शासनाने परदेशातील विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता ‘फ्लाईट प्लॅन’ तयार केला होता. पण, यात थायलंडचा समावेश नसल्याने याबाबत ‘विदेशातून परतीच्या फ्लाईट प्लॅनमधून थायलंड बाद’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. अखेर शासनाने ‘वंदे भारत मोहिमेत’ थायलंडचा समावेश करून तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांना स्वगृही पोहोचविले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी लोकमतचे आभार मानले आहे.महाराष्ट्रासह राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, केरळ व दिल्ली या राज्यातील १३ विद्यार्थी जानेवारी महिन्यात थायलंडला प्रशिक्षणाकरिता गेले होते. मात्र, कोविड-१९ च्या लॉकडाऊनमुळे या सर्व विद्यार्थ्यांनी भारतात परतण्यासाठी १६ एप्रिलला तिकीट काढले होते. त्यानंतर ते बँकॉकच्या विमानतळावर आल्यावर त्यांना भारतातही लॉकडाऊन असल्याने विमानसेवा बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची चांगलीच आबाळ झाली. विद्यार्थ्यांनी लगेच आपल्या नातेवाईकांसह लोकप्रतिनिधी व शासनाची संपर्क साधला. यातच त्यांना एक रात्र विमानतळावर काढावी लागली. त्यानंतर या विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांचा समोवश असून त्या चारही विद्यार्थ्यांना बँकॉकमधील महाराष्ट्र मंडळामध्ये आधार देण्यात आला. तब्बल दोन महिने महाराष्ट्र मंडळात काढल्यानंतर ५ जून रोजी महाराष्ट्रातील चारही विद्यार्थी विशेष विमानाने मुंबईत दाखल झाले व तेथून आपापल्या गावी पोहोचले. यामध्ये वर्ध्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

दोन महिने घरच्यासारखा केला सांभाळबँकॉकमध्ये अडकून पडल्यानंतर एक रात्र विमानतळावर काढावी लागली. त्यानंतर बँकॉकमधील महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष अर्पिता कुलकर्णी यांच्यासह मंदार पारसनीस व सुदेशकुमार यांनी भारतीय दूतावासाकडून महाराष्ट्रातील ऋषिकेश भरत बच्छाव रा. सोयगाव ता. मालेगाव, संदीप भिकनसिंग निकुंभ रा. रायतेल ता. साक्री दीपक रमेश अहिरे रा. हाताने ता. मालेगाव व कुणाल संजय मानकर रा. वर्धा या चारही विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली. दोन महिने विद्यार्थ्यांची जेवण व राहण्याची व्यवस्था केली तसेच शेवटच्या दिवसापर्यंत सर्व मदतही केली. महाराष्ट्र मंडळाने अडचणीत मदत करून घरच्यासारखी वागणूक दिली, असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

लॉकडाऊनमुळे भारतात येण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे एक रात्र बँकॉकच्या विमानतळावर काढावी लागली. त्यानंतर आम्ही इतरत्र संपर्क साधल्यानंतर तेथील महाराष्ट्र मंडळाने मोठा आधार दिला. तसेच लोकमतनेही आमची अडचण वृत्तांच्या माध्यमातून मांडून लक्ष वेधले. त्यामुळे आम्ही आता सुखरूप आमच्या घरी पोहोचलो. ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहकार्य केले त्या सर्वांचे आभार.- कुणाल मानकर, विद्यार्थी, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस