शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

रबी हंगामावरच शेतकऱ्यांची भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 5:00 AM

सोयाबीन पीक हातून गेले असतानाही कपाशीवर असलेली शेतकऱ्यांची भीस्त आता बोंडअळीने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठे संकट ओढावले असून हतबल होण्याची वेळ आली आहे. कोलगाव शिवारात असलेल्या बागायती पाच एकर शेतीत युवा शेतकरी पराग वैरागडे यांनी कपाशी पिकाची लागवड केली. पीक बहरले अधिकाधिक उत्पादनाची आशा बाळगून असलेल्या या युवा शेतकऱ्याने शेतात कपाशीचे बोंड फोडून पहिले असता त्यात बोंडअळी दिसून आली.

ठळक मुद्देसंकट, खरीपात झाले मोठे नुकसान । आर्थिक गणित विस्कटले

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : दसरा, दिवाळी सणाला लागणार खर्च तसेच रबीची पेरणी खरिपातील पिकांवर अवलंबून असते ते नुकसानीचे जरी ठरले असले तरी आर्थिक नुकसान उराशी बाळगून शेतकऱ्यांनी आता रबी हंगामावर भिस्त आहे.एकरी सोयाबीनचे उत्पादन पाच क्विंटलच्या वर गेले नाही तर एकरी उत्पादनाची मालिका शुण्यापासून सुरू झाली असून ती चार,पाचवरच थांबली. यातही भाव वाढतील, अशी आशा दिसत असली तरी सोयाबीन घरी साठवून ठेवण्याची परिस्थिती नाही. बाजारात ४२०० रुपये भावाचा आकडा असला तरी १८०० रुपयांपासून खरेदी केली जात आहे. सरासरी भाव पहिला तर हा ३ हजारावर स्थिरावत आहे. यावर्षी असलेला सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात होता. सध्या कापूस वेचाणीला प्रारंभ झाला असून दिवाळी अगोदर शेतकऱ्याच्या घरी पांढर सोन असणार आहे. पण बोंडअळीने शिरकाव केल्याने हे पीक अधांतरी आले आहे.अशातच समोर असलेली रब्बीची पेरणी पाहता यासाठी येणाऱ्या खर्चाला आर्थिक बळ आणावे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.असे असले तरी शेतकरी पुन्हा मशागती व रब्बीच्या पेरणीला सामोरे जात आहे.शासनाने शेती व्यवसायाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.कर्जमुक्ती ठरली कागदावरशेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता तसेच दुष्काळाची गडद छाया असल्याने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला. मात्र, २०१३ चे कर्ज घेतले असणारे शेतकरी अजूनही कर्जमुक्त झाले नसून कर्जमुक्ती कागदावरच राहिली असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.कोलगाव शिवारात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भावसोयाबीन पीक हातून गेले असतानाही कपाशीवर असलेली शेतकऱ्यांची भीस्त आता बोंडअळीने शिरकाव केल्याने शेतकऱ्यांसमोर पुन्हा मोठे संकट ओढावले असून हतबल होण्याची वेळ आली आहे. कोलगाव शिवारात असलेल्या बागायती पाच एकर शेतीत युवा शेतकरी पराग वैरागडे यांनी कपाशी पिकाची लागवड केली. पीक बहरले अधिकाधिक उत्पादनाची आशा बाळगून असलेल्या या युवा शेतकऱ्याने शेतात कपाशीचे बोंड फोडून पहिले असता त्यात बोंडअळी दिसून आली. त्यामुळे आता कपाशीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाला मुकावे लागते की काय, अशी चिंता निर्माण झाली आहे. कृषी विभागाने शेताची पाहणी करून मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतात बोंडअळी आढळल्याने आता कपाशीवरही बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट आले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी