शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या ९० लाख गाठींची चीनला निर्यात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

अमेरिका दरवर्षी चीनला ६० लाख कापसाच्या गाठींची निर्यात करीत होता; पण अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धामुळे अमेरिकेकडून ही निर्यात थांबली आहे. यावर्षी चीनमध्ये ३५५ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. ते उत्पादन दरवर्षीपेक्षा ६० लाख गाठींनी कमी आहे. चीनमधील वस्त्रोद्योग जगविख्यात असल्याने चीनला ६०० लाख गाठींची आवश्यकता आहे. त्यामुळे चीन आता विदेशातून २४५ लाख गाठींची आयात करणार आहे.

ठळक मुद्देकृषीतज्ज्ञांनी पाठविले पंतप्रधानांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतामध्ये यावर्षी ३३० लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यापैकी भारताला २४० कापसाच्या गाठींची गरज असून ९० लाख गाठी निर्यातीकरिता उपलब्ध राहणार आहेत. देशात कापसाच्या गाठींचे उत्पादन जास्त होणार असल्याच्या कारणाने खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षी कमी आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढून कापूस उत्पादकांना दिलासा देण्याकरिता देशातील ९० लाख कापसाच्या गाठींची चीनला निर्यात करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे उपाध्यक्ष प्रशांत इंगळे तिगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.अमेरिका दरवर्षी चीनला ६० लाख कापसाच्या गाठींची निर्यात करीत होता; पण अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धामुळे अमेरिकेकडून ही निर्यात थांबली आहे. यावर्षी चीनमध्ये ३५५ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. ते उत्पादन दरवर्षीपेक्षा ६० लाख गाठींनी कमी आहे.चीनमधील वस्त्रोद्योग जगविख्यात असल्याने चीनला ६०० लाख गाठींची आवश्यकता आहे. त्यामुळे चीन आता विदेशातून २४५ लाख गाठींची आयात करणार आहे. त्यामुळे चीनचे राष्ट्रपती शि. जिनपिंग आणि भारत देशाचे संबंध चांगले असल्याने आपल्याकडील अतिरिक्त ९० लाख गाठी चीनला निर्यात करण्यासंदर्भात दहा वर्षांकरिता दीर्घकालीन करार केल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार ५५० रुपयांच्या हमीभावापेक्षा जास्त दर मिळणार आहे. त्यामुळे येथील कापूस उत्पादकांना मोठा आधार मिळेल, असेही प्रशांत इंगळे तिगांवकर यांनी पत्रात नमूद केले आहे.चीनकडूनही भारतातील कापसाला मागणीचीनचे अमेरिकेशी संबंध बिघडल्याने आता कापसाकरिता चीनने भारताकडे मागणी केली आहे. त्यामुळे भारतानेही या मागणीचा विचार करून ९० लाख गाठींची निर्यात करावी. निर्यात केल्यास शेतकऱ्यांच्या कापसाला जास्त दर मिळणार असून कापूस उत्पादकांना न्याय मिळेल, असेही पत्रात नमूद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार रामदास तडस यांनाही पत्र दिले आहे.

टॅग्स :agricultureशेती