शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोदयी विचारानेच विकास शक्य

By admin | Updated: November 15, 2014 22:51 IST

मास प्रॉडक्शन हा शब्द सध्या सर्वत्र प्रचलित आहे. परंतु या शब्दाऐवजी प्रॉडक्शन बाय द मासेस ही कृती अंगीकारल्यास खरे ग्राम स्वराज येऊ शकते. आपण आत्मघाती विकासामुळे विनाशाकडे चाललो

अमरभाई यांचे प्रतिपादन : विनोबा आश्रमात मित्र-मिलन सोहळापवनार : मास प्रॉडक्शन हा शब्द सध्या सर्वत्र प्रचलित आहे. परंतु या शब्दाऐवजी प्रॉडक्शन बाय द मासेस ही कृती अंगीकारल्यास खरे ग्राम स्वराज येऊ शकते. आपण आत्मघाती विकासामुळे विनाशाकडे चाललो असून यातून बाहेर पडायचे असेल तर सर्वोदय विचार याचा पर्याय असू शकतो असे मत ग्रामस्वराज-कृषी संस्कृती य विषयावर मार्गदर्शन करताना अमरभाई यांनी व्यक्त केले. द्वितीय सत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण दिनी ब्रह्म विद्या मंदिर पवनार येथे मित्र-मिलन सोहळ्याचे आयोजन १५, १६ आणि १७ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. यावेळी द्वितीय सत्रात ग्रामस्वराज कृषी संस्कृती हा विषयावर अमरभाई यानी विचार व्यक्त केले. यंदा मित्र मिलन सोहळ्याचा विषय ‘सर्वोदय की दिशा मे.. बढते कदम’ असा ठेवण्यात आला आहे. या संमेलनामध्ये देशभरातील ७०० च्या वर सर्वोदयी कार्यकर्ते सहभागी झाले आहे. तीन दिवस चालत असलेल्या या संमेलनात सर्वोदयची दिशा या विषयावर चर्चा होणार आहे. शनिवारी संमेलनाला सुरुवात करताना शिला दिदी यांनी सोहळ्याच्या आयोजनाचा उद्देश उपस्थितांना सांगितला. प्रथम सत्रामध्ये नारायण देसाई, महेंद्रभाई यांनी ग्राम स्वराज या विषयावर यथोचित मार्गदर्शन केले.या चर्चासत्रात सुब्बाराव, सुभाष पाळेकर, कमल टावरी, मूर्ती यांनीही मार्गदर्शन केले. सत्राचे संचालन रमेशभाई यांनी केले. या सोहळ्यासाठी संपूर्ण विनोबा आश्रमाला साध्या पण सुंदर पद्धतीने सुशोभित करण्यात आले आहे. दरवर्षी विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण पर्वावर मित्र मिलन आयोजित केले जाते. देशभरातील सर्वोदयी सहभागी यात होत असतात. महिला कार्यकर्त्यांची यात मोठी उपस्थिती असते. डॉ. अभय बंग यांनीही या वेळी हजेरी लावत आश्रमातील ज्येष्ठांची आस्थेने चौकशी केली.(वार्ताहर)