सतत बदलत्या वातावरणाचा फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 05:00 IST2020-11-19T05:00:00+5:302020-11-19T05:00:09+5:30

जिल्ह्यात सुमारे साडे सात हजार हेक्टर क्षेत्र फळबागाखाली आहे. आर्वी  उपविभागात सर्वाधिक संत्रा, मोसंबी, लिंबू , केळी, पपई याचे उत्पादन घेतले जाते. पण सध्या जिल्ह्यात दिवसेंदिवस पार घसरत आहे. या थंडीच्या दिवसातील वातावरणाचा संत्रा, मोसंबी, पपई पिकाला फटका बसत आहे. आर्वी तालुक्यातील हिवरा गावात शंभर हेक्टर संत्रा  बागायत आहे. थंडीमुळे डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर दिसून येत आहे. त्यामुळे संत्राची झाडे मुळासकट पूर्णपणे वाळल्यागत दिसत आहे.

The ever-changing climate is a big blow to fruit growers | सतत बदलत्या वातावरणाचा फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका

सतत बदलत्या वातावरणाचा फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका

ठळक मुद्देसंत्रा, मोसंबी, पपई उत्पादकांच्या अडचणीत भर : कृषीविभाग मात्र सुस्तच

राजेश सोळंकी
    लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी/देऊरवाडा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात गारवा वाढत आहे. तर आर्वी उपविभागात काही भागात ढगाळी वातावरण कायम आहे. याचा फटका फळबागांवर दिसून येत असून फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
जिल्ह्यात सुमारे साडे सात हजार हेक्टर क्षेत्र फळबागाखाली आहे. आर्वी  उपविभागात सर्वाधिक संत्रा, मोसंबी, लिंबू , केळी, पपई याचे उत्पादन घेतले जाते. पण सध्या जिल्ह्यात दिवसेंदिवस पार घसरत आहे. या थंडीच्या दिवसातील वातावरणाचा संत्रा, मोसंबी, पपई पिकाला फटका बसत आहे. 
आर्वी तालुक्यातील हिवरा गावात शंभर हेक्टर संत्रा  बागायत आहे. थंडीमुळे डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर दिसून येत आहे. त्यामुळे संत्राची झाडे मुळासकट पूर्णपणे वाळल्यागत दिसत आहे. तर आर्वी उपविभागातील कारंजा तालुक्यातील जसापूर येथे थंडीमुळे पपई पिकावर विपरित परिणाम दिसून येत आहेत. पपईच्या झाडांमध्ये अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. अशातच बुरशी आणि मावाचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. आंबीया बहराचा संत्राही यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांना विकता आला नाही. तो झाडावरूनच गळून पडला. 

तीन एकरात पपईची लागवड केली. वाढत्या थंडीचा पिकावर परिणाम होत आहेत. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पिकावर दिसून येत आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
- किशोर बंनगरे, 
फळ उत्पादक, जसापूर.

सततच्या पावसामुळे फळगळ झाली. तर सध्या थंडीमुळे डिंक्या, कोळशी आदी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे फळगळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
- गौरव ठाकरे, फळ उत्पादक,            हिवरा तांडा. 

सहा महिन्यांपासून फळबागांवर परिणाम मदतीची प्रतीक्षा
मागील सहा महिन्यांपासून संत्रा पिकावर तपकीरी रॅाट या रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली. त्यामुळे त्यावेळी संत्रा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला. आता  वाढत्या थंडीमुळे पुन्हा डिंक्या रोग आहे.
डिक्या रोगापासून बचाव करण्यासाठी चुना आणि मोरचुद यांचे मिश्रण करून झाडाला लावावे कृषी विभागाने केले आहे. थंडीमुळे फळगळती होते. तसेच फुलगळतात. आर्वी उपविभागात संत्रा, मोसंबी आणि पपई या पिकांवर याचा परिणाम दिसून येत आहे.
सततच्या रोग प्रार्दुभावामुळे संत्रा उत्पादकांनी लावलेला खर्चही यंदा निघणे कठीण झाले आहे. रोहणा येथील शेतकऱ्याला लागलेले पैसेही मिळालेले नाही, अशी माहिती या हवालदिल शेतकऱ्याने सांगितले.

 

Web Title: The ever-changing climate is a big blow to fruit growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.