शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोहिमेअंती १४ बालके बेपत्ताच

By admin | Updated: August 15, 2015 02:06 IST

जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या बालकांच्या तक्रारी त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहेत.

आॅपरेशन मुस्कान : महिन्याभरात सापडली २५ बालके वर्धा : जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या बालकांच्या तक्रारी त्यांच्या पालकांकडून करण्यात येत आहेत. या बेपत्ता बालकांचा शोध पोलीस विभागाच्यावतीने सुरू असताना राज्य शासनाच्या आदेशाने आॅपरेशन मुस्कान राबविण्याच्या सूचना आल्या. ही विशेष मोहीम राबविण्याचा कालावधी संपला असताना अद्यापही १४ बालके बेपत्ता असल्याचे दिसून आले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार १ ते ३१ जुलै या कालावधीत ही विशेष मोहीम ‘आॅपरेशन मुस्कान’च्या नावाने राबविण्यात आली. यात जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वेस्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी कचरा उचलताना व इतर कामे करताना आढळलेल्या बालकांचा शोध घेण्याचे आदेशित होते. यानुसार जिल्हा पोलिसांच्यावतीने शोध मोहीम राबविण्यात आली. या एका महिन्यात केलेल्या कारवाईत जानेवारी २०१० ते ३० जून २०१५ या काळातील बेपत्ता बालकांचा शोध घेण्यात आला. या काळात १३ मुले व २६ मुलींचा अशी एकूण ३९ मुले बेपत्ता होती. यापैकी २५ बालकांचा शोध लागला आहे. त्यात ८ मुले व १७ मुलींचा समावेश आहे. पोलीस विभागाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली असतानाही एकूण १४ मुले बेपत्ताच असल्याचे पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. यात नऊ मुली व पाच मुलांचा समावेश आहे.शहरात व जिल्ह्यात पोलीस विभागाच्यावतीने ही मोहीम राबविण्यात आली. यात पोलिसात गुन्हे दाखल नसलेली बरीच बालके पोलिसांच्या हाती आली आहे. त्या बालकांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. अशी १४ बालके पोलिसांच्या हाती आली असून यात सहा मुले व आठ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी १२ मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यात पाच मुले व सात मुलींचा समावेश आहे. तर उर्वरीत दोन बालकांना बालसंरक्षण समितीकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.बालमजुरी व बालकामगारांवर आळा बसविण्याकरिता शासनाच्यावतीने ही मोहीम राबविण्यात आली होती. या विशेष मोहिमेचा कालावधी संपला असला तरी बालकांचा शोध सुरूच राहणार असल्याचे जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)