शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

अकरा जलाशयातील पाणीसाठा तळालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 10:19 PM

यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पावसाळा उलटूनही नदी-नाल्यांना पूर आले नाही.परिणामी जिल्ह्यातील अकराही जलाशयातील पाण्याची पातळी आजही तळालाच लागली आहे.

ठळक मुद्दे७७ टक्के पावसाची नोंद : प्रकल्पात ४१.३६ टक्केच पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यावर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिल्याने पावसाळा उलटूनही नदी-नाल्यांना पूर आले नाही.परिणामी जिल्ह्यातील अकराही जलाशयातील पाण्याची पातळी आजही तळालाच लागली आहे. सध्या सर्व जलाशयामध्ये केवळ ४१.३६ टक्के च पाणी उपलब्ध असल्याने डिसेंबर महिन्यापासूनच पाणीबाणी सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जिल्ह्यातील आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू, वर्धा व देवळी या आठही तालुक्यात पावसाने यावर्षी दडी मारली. जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसात दमदार पाऊस झाला नसल्याने नद्या व जलाशय अद्यापही तहाणलेलच आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यावर या एकाच पावसाने नद्या, नाल्यांना पूर आला होता. या एकाच पावसामुळे जलाशयाच्या पातळीत थोडी का होईना; पण वाढ झाली. आता पर्यंत जिल्ह्यामध्ये ७७ टक्के च पावसाची नोंद करण्यात आली आहे. या अल्प पावसामुळे वर्धा नगरपालिकेसह इतरही ग्रामपंचायतीमध्ये दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरु केला आहे.अजून हिवाळाही उलटायचा असतानाच ही परिस्थिती असल्याने उन्हाळ्यात परिस्थिती चिंतनीय आहे. डिसेंबर महिन्यापासूनच नागरिकांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागणार असल्याचे सांगण्यात येत असल्याने आतापासूनच पाणी बचतीशिवाय दुसरा पर्याय नाही. शहरात पाणी पुरवठा प्रभावित होणार आहे.रब्बी हंगामही धोक्यातजिल्ह्यातील अकरा जलाशयातून पिण्याकरिता, शेतीकरिता व उद्योगाकरिता पाणी पुरवठा केल्या जातो. सध्या जलाशयात ४१.३६ टक्के जलासाठा उपलब्ध आहे. यातील १५ टक्के पाणी हे संरक्षित ठेवल्या जाते तर उर्वरीत पाण्यातून पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता देण्यात येते. त्यानंतर सिंचन आणि नंतर उद्योगाला पाणी देणे अपेक्षीत आहे. परंतु सिंचनाला पाणी देण्यासाठी सिंचन विभागाने असमर्थता दर्शविल्याने यावर्षीचा रब्बी हंगामही अडचणी आला आहे. खरिपातही शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागता तर आताही पाण्याअभावी रब्बीतही नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई