शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

निवडणूक येते अन् जाते; सर्व दिवस सारखेच ! मजुरी बुडण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:54 IST

Wardha : बेरोजगार, कष्टकऱ्यांची व्यथा बेरोजगारी, महागाईने बिघडविले आर्थिक गणित

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक मतदाराला निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. लोकशाहीकरिता हा हक्क बजावताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी देण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांना या दिवसाचा पूर्ण पगार मिळणार आहे. मात्र, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, अकुशल कामगार यांनी मतदानासाठी सुटी घेतल्यास त्यांच्या दिवसभराची मजुरी बुडणार आहे. त्यामुळे निवडणुकीत कोण जिंकले, कोण हरले? आमच्यासाठी सर्व दिवस सारखेच असल्याचे मत शेतकरी, शेतमजूर व्यक्त करीत आहेत.

लोकशाहीमध्ये मतदानाला महत्त्वाचे स्थान आहे. १८ वर्षांवरील सर्व मतदारांनी मतदान करणे आवश्यक असून मतदानाच्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी देण्यात आली. तसेच उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या प्रत्येक उपक्रम व आस्थापनेला पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास मतदानासाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने दोन तासांची सवलत मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना मतदानासाठी मिडवीक ऑफ मिळणार आहे. 

कर्मचाऱ्यांचा पगार न कापता मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र, देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी, शेतमजूर व रोजंदारीवर काम करणारे तसेच अकुशल कामगार, मानधनावर काम करणारे कामगार, हातावर पोट असलेले कष्टकरी यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे कामावर न जाता मतदानासाठी एक दिवसाची पूर्ण रोजंदारीची मजुरी मिळेल काय? निवडणुका होतात. आम्हीही मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावतो; पण आमच्या समस्यांचा गांभीर्यान विचार केला जातो का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

एक दिवस कामावर न गेल्यास संध्याकाळची चूल पेटणार का? अशी गरीब जनतेची अवस्था आहे. त्यामुळे निवडणुकीच्या सार्वजनिक सुटीचा आम्हाला काय फायदा? असा या भागातील कष्टकरी जनतेचा सवाल आहे. आम्हाला सर्व दिवस सारखेच, असा सूर त्यांच्याकडून ऐकू येत आहे. 

कष्टकऱ्यांचे सरकार पाहिजे निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. प्रत्यक्षात मात्र दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याचा अनुभव मतदारांना नेहमीचाच आहे. त्यामुळे यावेळेस मतदारांकडून प्रचाराकरिता आलेल्या उमेदवारांवर प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. निवडणुकीनंतर कष्टकरी व गरजूंना त्यांच्या समस्यांवर विचार करणारे सरकार हवे आहे. ते आता तरी मिळणार का? पाच वर्षे झाली की निवडणुका होतात. आम्हीही मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावतो. पण, आमच्या समस्यांचा गांभीयनि विचार केला जातो का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

"निवडून आल्यावर सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा विचार होणे अपेक्षित आहे. त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. परंतु, सरकार निवडून देणाऱ्या सामान्य जनतेच्या हिताचा विचार होत नाही. त्यांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्या सोडविल्या जात नाहीत. सर्वसामान्यांचे जीवन म्हणजे गरिबीत जगणे आणि गरिबीतच मरणे, यासारखेच आहे."- संतोष लेंडे, मतदार

"दिवसभर काम केल्यावर ३०० ते ४०० रुपये मजुरी मिळते. आता निवडणूक होण्यापूर्वीही तेवढीच आहे आणि निवडणूक झाल्यावरही तेवढीच राहणार आहे. त्यामुळे कोण निवडून आले आणि कोण पडले? याचा काहीही फरक पडत नाही. आमच्यासाठी सर्व दिवस सारखेच असतात. त्यामुळे निवडणुकीबद्दल आता काहीच वाटत नाही."- माया धांदे, मतदार

टॅग्स :wardha-acवर्धा