शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

निवडणूक येते अन् जाते; सर्व दिवस सारखेच ! मजुरी बुडण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:54 IST

Wardha : बेरोजगार, कष्टकऱ्यांची व्यथा बेरोजगारी, महागाईने बिघडविले आर्थिक गणित

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक मतदाराला निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. लोकशाहीकरिता हा हक्क बजावताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी देण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांना या दिवसाचा पूर्ण पगार मिळणार आहे. मात्र, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, अकुशल कामगार यांनी मतदानासाठी सुटी घेतल्यास त्यांच्या दिवसभराची मजुरी बुडणार आहे. त्यामुळे निवडणुकीत कोण जिंकले, कोण हरले? आमच्यासाठी सर्व दिवस सारखेच असल्याचे मत शेतकरी, शेतमजूर व्यक्त करीत आहेत.

लोकशाहीमध्ये मतदानाला महत्त्वाचे स्थान आहे. १८ वर्षांवरील सर्व मतदारांनी मतदान करणे आवश्यक असून मतदानाच्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी देण्यात आली. तसेच उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या प्रत्येक उपक्रम व आस्थापनेला पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास मतदानासाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने दोन तासांची सवलत मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना मतदानासाठी मिडवीक ऑफ मिळणार आहे. 

कर्मचाऱ्यांचा पगार न कापता मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र, देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी, शेतमजूर व रोजंदारीवर काम करणारे तसेच अकुशल कामगार, मानधनावर काम करणारे कामगार, हातावर पोट असलेले कष्टकरी यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे कामावर न जाता मतदानासाठी एक दिवसाची पूर्ण रोजंदारीची मजुरी मिळेल काय? निवडणुका होतात. आम्हीही मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावतो; पण आमच्या समस्यांचा गांभीर्यान विचार केला जातो का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

एक दिवस कामावर न गेल्यास संध्याकाळची चूल पेटणार का? अशी गरीब जनतेची अवस्था आहे. त्यामुळे निवडणुकीच्या सार्वजनिक सुटीचा आम्हाला काय फायदा? असा या भागातील कष्टकरी जनतेचा सवाल आहे. आम्हाला सर्व दिवस सारखेच, असा सूर त्यांच्याकडून ऐकू येत आहे. 

कष्टकऱ्यांचे सरकार पाहिजे निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. प्रत्यक्षात मात्र दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याचा अनुभव मतदारांना नेहमीचाच आहे. त्यामुळे यावेळेस मतदारांकडून प्रचाराकरिता आलेल्या उमेदवारांवर प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. निवडणुकीनंतर कष्टकरी व गरजूंना त्यांच्या समस्यांवर विचार करणारे सरकार हवे आहे. ते आता तरी मिळणार का? पाच वर्षे झाली की निवडणुका होतात. आम्हीही मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावतो. पण, आमच्या समस्यांचा गांभीयनि विचार केला जातो का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

"निवडून आल्यावर सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा विचार होणे अपेक्षित आहे. त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. परंतु, सरकार निवडून देणाऱ्या सामान्य जनतेच्या हिताचा विचार होत नाही. त्यांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्या सोडविल्या जात नाहीत. सर्वसामान्यांचे जीवन म्हणजे गरिबीत जगणे आणि गरिबीतच मरणे, यासारखेच आहे."- संतोष लेंडे, मतदार

"दिवसभर काम केल्यावर ३०० ते ४०० रुपये मजुरी मिळते. आता निवडणूक होण्यापूर्वीही तेवढीच आहे आणि निवडणूक झाल्यावरही तेवढीच राहणार आहे. त्यामुळे कोण निवडून आले आणि कोण पडले? याचा काहीही फरक पडत नाही. आमच्यासाठी सर्व दिवस सारखेच असतात. त्यामुळे निवडणुकीबद्दल आता काहीच वाटत नाही."- माया धांदे, मतदार

टॅग्स :wardha-acवर्धा