शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक येते अन् जाते; सर्व दिवस सारखेच ! मजुरी बुडण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:54 IST

Wardha : बेरोजगार, कष्टकऱ्यांची व्यथा बेरोजगारी, महागाईने बिघडविले आर्थिक गणित

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक मतदाराला निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. लोकशाहीकरिता हा हक्क बजावताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी देण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांना या दिवसाचा पूर्ण पगार मिळणार आहे. मात्र, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, अकुशल कामगार यांनी मतदानासाठी सुटी घेतल्यास त्यांच्या दिवसभराची मजुरी बुडणार आहे. त्यामुळे निवडणुकीत कोण जिंकले, कोण हरले? आमच्यासाठी सर्व दिवस सारखेच असल्याचे मत शेतकरी, शेतमजूर व्यक्त करीत आहेत.

लोकशाहीमध्ये मतदानाला महत्त्वाचे स्थान आहे. १८ वर्षांवरील सर्व मतदारांनी मतदान करणे आवश्यक असून मतदानाच्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी देण्यात आली. तसेच उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या प्रत्येक उपक्रम व आस्थापनेला पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास मतदानासाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने दोन तासांची सवलत मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना मतदानासाठी मिडवीक ऑफ मिळणार आहे. 

कर्मचाऱ्यांचा पगार न कापता मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र, देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी, शेतमजूर व रोजंदारीवर काम करणारे तसेच अकुशल कामगार, मानधनावर काम करणारे कामगार, हातावर पोट असलेले कष्टकरी यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे कामावर न जाता मतदानासाठी एक दिवसाची पूर्ण रोजंदारीची मजुरी मिळेल काय? निवडणुका होतात. आम्हीही मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावतो; पण आमच्या समस्यांचा गांभीर्यान विचार केला जातो का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

एक दिवस कामावर न गेल्यास संध्याकाळची चूल पेटणार का? अशी गरीब जनतेची अवस्था आहे. त्यामुळे निवडणुकीच्या सार्वजनिक सुटीचा आम्हाला काय फायदा? असा या भागातील कष्टकरी जनतेचा सवाल आहे. आम्हाला सर्व दिवस सारखेच, असा सूर त्यांच्याकडून ऐकू येत आहे. 

कष्टकऱ्यांचे सरकार पाहिजे निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊस पाडला जातो. प्रत्यक्षात मात्र दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याचा अनुभव मतदारांना नेहमीचाच आहे. त्यामुळे यावेळेस मतदारांकडून प्रचाराकरिता आलेल्या उमेदवारांवर प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. निवडणुकीनंतर कष्टकरी व गरजूंना त्यांच्या समस्यांवर विचार करणारे सरकार हवे आहे. ते आता तरी मिळणार का? पाच वर्षे झाली की निवडणुका होतात. आम्हीही मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावतो. पण, आमच्या समस्यांचा गांभीयनि विचार केला जातो का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

"निवडून आल्यावर सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा विचार होणे अपेक्षित आहे. त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविणे गरजेचे आहे. परंतु, सरकार निवडून देणाऱ्या सामान्य जनतेच्या हिताचा विचार होत नाही. त्यांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्या सोडविल्या जात नाहीत. सर्वसामान्यांचे जीवन म्हणजे गरिबीत जगणे आणि गरिबीतच मरणे, यासारखेच आहे."- संतोष लेंडे, मतदार

"दिवसभर काम केल्यावर ३०० ते ४०० रुपये मजुरी मिळते. आता निवडणूक होण्यापूर्वीही तेवढीच आहे आणि निवडणूक झाल्यावरही तेवढीच राहणार आहे. त्यामुळे कोण निवडून आले आणि कोण पडले? याचा काहीही फरक पडत नाही. आमच्यासाठी सर्व दिवस सारखेच असतात. त्यामुळे निवडणुकीबद्दल आता काहीच वाटत नाही."- माया धांदे, मतदार

टॅग्स :wardha-acवर्धा