शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

देवळीत बाजार समितीची निवडणूक; काँग्रेस-राष्ट्रवादीत युतीची खलबते, भाजपचे तळ्यात-मळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 12:36 IST

राजकीय ज्वर वाढला : युतीच्या चर्चेसोबतच जागा वाटपासाठी बैठकांना उधाण

हरिदास ढोक

देवळी (वर्धा) : तब्बल दीड वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे देवळी तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बाजार समितीवर वर्चस्व कायम ठेवण्याकरिता काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रा. सुरेश देशमुख यांच्या गटात युतीकरिता खलबते सुरू झाली आहेत. महाविकास आघाडीच्या तत्त्वानुसार या निवडणुका लढण्याचे आदेश असल्याने दोन्ही गटाकडून जागा वाटपाचे समीकरण मांडले जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेवा सहकारी, ग्रामपंचायत, व्यापारी, अडते तसेच हमाल, मापारी गटातील मतदारांत कॉंंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम आहे. शिवाय खासदार रामदास तडस यांच्याकडून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यादरम्यानच्या युतीची शक्यता तपासली जात आहे. प्रा. सुरेश देशमुख यांच्या सोबतच्या बैठकीत युतीची समिकरणे मांडून चर्चेला वाव दिला जात आहे. यासोबतच अशी युती न झाल्यास भाजपला काही जागा देण्याबाबतची बाजू तपासली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे सध्या तळ्यात- मळ्यात असल्याचे दिसून येत आहे.

पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या ३ एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपने दंड थोपटून उभे राहिल्यास रंगत येणार आहे. भाजपचे ग्रामपंचायत गटात बऱ्यापैकी मताधिक्य असल्याने कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे बोलले जात आहे.

बाजार समितीच्या १८ संचालकांकरिता निवडणूक

या निवडणुकीत सेवा सहकारी ११, ग्रामपंचायत चार, व्यापारी अडते दाेन, तसेच हमाल मापारी मतदारसंघातील एक अशा एकूण १८ जागेसाठी मतदान होत आहे. देवळी तालुक्यात ४१ सेवा सहकारी संस्था कार्यरत असून या संस्थेतील ५३२ मतदार सेवा सहकारी गटात मतदानाचा हक्क बजावणार आहे. या गटातील ११ जागांपैकी सात जागा सर्वसाधारण, दाेन महिला, एक इतर मागासवर्गीय तसेच एक जागा विमुक्त भटक्या जमातीसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायत गटातील चार जागांसाठी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीमधील ५५७ मतदार हक्क बजाविणार आहे.

या गटातील चार जागांपैकी दाेन जागा सर्वसाधारण, एक अनुसूचित जाती- जमाती तसेच एक जागा आर्थिक दुर्बल घटकासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. व्यापारी अडते मतदार गटातील दाेन जागांसाठी ९७ मतदार तसेच हमाल मापारी मतदार गटातील एक जागेसाठी ५५ मतदार हक्क बजाविणार आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणAgriculture Sectorशेती क्षेत्रcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक