कापूस विक्रीसाठी ८०० शेतकऱ्यांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 05:00 IST2020-04-16T05:00:00+5:302020-04-16T05:00:09+5:30

कापूस हे शेतकऱ्यांचे पांढरे सोने आहे या कापसावर वर्ष भऱ्याचा आर्थिक लेखा जोखा असतो ही शेतकऱ्याची अडचण ओळखून बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे यांनी ११ एप्रिलला जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून सी सी आय ला कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती केली आहे. कापूस शेतकऱ्यांच्या घरी जास्त काळ राहिल्यास घरातील व्यक्तीला खाज हा विकार होण्याची शक्यता असते ...

Eight hundred farmers register for cotton sale | कापूस विक्रीसाठी ८०० शेतकऱ्यांनी केली नोंदणी

कापूस विक्रीसाठी ८०० शेतकऱ्यांनी केली नोंदणी

ठळक मुद्देसभापतींनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र : सेलू बाजार समिती

लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : सध्या धान्य बाजार सुरू झाल्याने काही प्रमाणात शेतकºयांना आर्थिकदृष्टया दिलासा मिळाला आहे. कापूस खरेदी केंद्र कधी सुरू होणार याची प्रतीक्षा मात्र कायम आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी सुरू झाली तेव्हापासून कापूस खरेदी केंद्र बंद झाले आहे. या अगोदरच सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या सेलू उप बाजार पेठेत जवळपास ८०० कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. अजूनही बहुतांश शेतकरी नोंदणी करावयाचे आहे.
कापूस हे शेतकऱ्यांचे पांढरे सोने आहे या कापसावर वर्ष भऱ्याचा आर्थिक लेखा जोखा असतो ही शेतकऱ्याची अडचण ओळखून बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे यांनी ११ एप्रिलला जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून सी सी आय ला कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावे अशी विनंती केली आहे. कापूस शेतकऱ्यांच्या घरी जास्त काळ राहिल्यास घरातील व्यक्तीला खाज हा विकार होण्याची शक्यता असते त्या मुळे जिनिंग मालकाला सुद्धा कापूस खरेदीची परवानगी द्यावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे शासनाने कापूस खरेदी केंद्र्र सुरू करण्याचे जाहीर केल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे पण अजूनपर्यंत बाजार समितीला कोणतेही निर्देश आले नसल्याचे सांगण्यात येते. २० एप्रिलनंतरच यावर निर्णय होईल.

जिल्हा कृषी व्यवसायी संघाचे पालकमंत्र्यांना निवेदन
वर्धा : जिल्हा कृषी व्यवसायी संघाच्यावतीने पालकमंत्री सुनील केदार यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. या निवेदनात सीसीआय तर्फे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी केंद्रे सुरू करावी व त्यांचे पेमेंट १० दिवसात देण्यात यावे, रब्बी हंगामाचे पीक शेतकºयांच्या घरी आलेले आहे तूर, चना, गहू व सोयाबीन सरकारी खरेदी सुरू करण्याबाबत आदेश द्यावे, खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खताचा पुरवठा १५ मे पर्यंत करण्यात यावा, रासायनिक खताच्या हंगामाकरीता साठवणूक करण्यास तयार असून सोयाबीन बियाणे कॉटन सिड्सचा पुरवठा १५ मे पर्यंत करण्यात यावा करिता राज्य सरकारने परवानगी द्यावी, ठोक विके्रत्यांना जिल्ह्यामध्ये आर्थिक व्यवहार व बि-बियाणे पुरवठ्याकरिता परवानगी देण्यात यावी अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतांना कृषी व्यवसायी संघटनेचे अध्यक्ष रवी प्रमोद शेंडे, मनोज भुतडा, श्रीकांत काशीकर उपस्थित होते.

कापूस खरेदीचे कोणतेही आदेश आलेले नाही पण आदेश येताच टोकण पद्धतीने कापूस खरेदी करण्याचे धोरण आखले आहे कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाईल .कापूस खरेदी लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्नरत आहे. शासन या संदर्भात काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे.
- विद्याधर वानखेडे, सभापती
कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी

Web Title: Eight hundred farmers register for cotton sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.