शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

शिक्षण व्यवस्था मुलांचे खच्चीकरण करणारी; डॉ. अभय बंग यांचे शैक्षणिक धोरणावर आसूड

By अभिनय खोपडे | Updated: February 5, 2023 14:45 IST

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी डॉ. बंग यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य हिरो होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी (वर्धा) : वर्षाला २.५० कोटी मुलं जन्माला येतात. १५ ते २० कोटी लोकं सध्या शिक्षणाच्या बाजारात गुंतलेली आहेत. पालकांनीही मुलांना रेसकोर्सचे घोडे बनविले आहे. निर्बुद्ध जीवन  तयार करणारी सध्याची शिक्षण प्रणाली मुलांचे खच्चीकरण करीत आहे. नयी तालीम शिक्षण प्रणालीतून जीवनासाठी शिक्षण देण्याची व्यवस्था होती, असे प्रतिपादन  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले. 

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी डॉ. बंग यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य हिरो होते. परंतु, मराठी साहित्यकारांनी या लढ्याची सुरुवातीला उपेक्षा केली. नंतर विरोध केला. मराठीत यावर महाकादंबरी निघाली असती. परंतु विशेषत: एका विशिष्ट समाजाच्या साहित्यकारांनी यावर साहित्य निर्मिती केली नाही. गांधी गैरमराठी असल्यामुळे हे घडले असावे, असेही ते म्हणाले. 

विनोबांच्या अनुशासन पर्वावर केला खळबळजनक खुलासा -भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ ला देशात आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी विनोबा भावे पवनार आश्रमात मौन व्रत धारण करून होते. त्यांना भेटण्यासाठी तत्कालीन काँग्रेस नेते दिवंगत वसंत साठे गेले होते. त्यांनी आणीबाणी पर्वाची माहिती कागदावर विनोबांना लिहून दिली. त्यावर विनोबांनी अनुशासन पर्व यावर प्रश्नचिन्ह टाकले होते. मात्र, वसंत साठेंनी नागपुरात जाऊन आणीबाणीला विनोबांनी अनुशासन पर्व म्हटल्याचे सांगितले आणि ध चा मा केला, असा दावा डॉ. बंग यांनी या मुलाखतीत केला. 

टॅग्स :Abhay Bangअभय बंगEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन