शहरं
Join us  
Trending Stories
1
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
2
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
4
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
5
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
6
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”; मंत्री चंद्रकांत पाटील
7
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
8
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
9
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
10
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
11
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
12
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
13
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
14
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
15
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
16
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
17
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
18
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
19
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
20
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण व्यवस्था मुलांचे खच्चीकरण करणारी; डॉ. अभय बंग यांचे शैक्षणिक धोरणावर आसूड

By अभिनय खोपडे | Updated: February 5, 2023 14:45 IST

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी डॉ. बंग यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य हिरो होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी (वर्धा) : वर्षाला २.५० कोटी मुलं जन्माला येतात. १५ ते २० कोटी लोकं सध्या शिक्षणाच्या बाजारात गुंतलेली आहेत. पालकांनीही मुलांना रेसकोर्सचे घोडे बनविले आहे. निर्बुद्ध जीवन  तयार करणारी सध्याची शिक्षण प्रणाली मुलांचे खच्चीकरण करीत आहे. नयी तालीम शिक्षण प्रणालीतून जीवनासाठी शिक्षण देण्याची व्यवस्था होती, असे प्रतिपादन  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले. 

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी डॉ. बंग यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य हिरो होते. परंतु, मराठी साहित्यकारांनी या लढ्याची सुरुवातीला उपेक्षा केली. नंतर विरोध केला. मराठीत यावर महाकादंबरी निघाली असती. परंतु विशेषत: एका विशिष्ट समाजाच्या साहित्यकारांनी यावर साहित्य निर्मिती केली नाही. गांधी गैरमराठी असल्यामुळे हे घडले असावे, असेही ते म्हणाले. 

विनोबांच्या अनुशासन पर्वावर केला खळबळजनक खुलासा -भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ ला देशात आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी विनोबा भावे पवनार आश्रमात मौन व्रत धारण करून होते. त्यांना भेटण्यासाठी तत्कालीन काँग्रेस नेते दिवंगत वसंत साठे गेले होते. त्यांनी आणीबाणी पर्वाची माहिती कागदावर विनोबांना लिहून दिली. त्यावर विनोबांनी अनुशासन पर्व यावर प्रश्नचिन्ह टाकले होते. मात्र, वसंत साठेंनी नागपुरात जाऊन आणीबाणीला विनोबांनी अनुशासन पर्व म्हटल्याचे सांगितले आणि ध चा मा केला, असा दावा डॉ. बंग यांनी या मुलाखतीत केला. 

टॅग्स :Abhay Bangअभय बंगEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन