शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पावसाअभावी ४.१५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 12:26 AM

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. तर यंदाच्या वर्षी गत काही दिवसांपासून वरुणराजा रुसल्याचे बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देसोयाबीन पीक अडचणीत : बळीराजावर अस्मानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. तर यंदाच्या वर्षी गत काही दिवसांपासून वरुणराजा रुसल्याचे बघावयास मिळत आहे. येत्या दोन दिवसात जोरदार पाऊस न झाल्यास पाण्याअभावी जिल्ह्यातील सुमारे ४.१५ लाख हेक्टर कोरडवाहू क्षेत्रावरील पीक करपण्याची भीती तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.यंदाच्या वर्षी जिल्ह्यात ३ हेक्टरवर धान, ६६३ हेक्टरवर ज्वारी, ६२ हेक्टरवर मका, ६२ हजार ८८२.५ हेक्टरवर, मुग २८२ हेक्टरवर, उडीद २५१ हेक्टरवर, भुईमुंग ४५७ हेक्टरवर, सोयाबीन १ लाख १५ हजार ६७९ हेक्टरवर तर २ लाख १९ हजार ५ हेक्टर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण सुमारे ५ लाख ५६ हजार हेक्टरपैकी केवळ १ लाख ४१ हजार हेक्टरवरच ओलिताची सोय आहे. गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ज्या शेतकºयांकडे ओलिताची सोय आहे ते शेतकरी योग्य निगा घेतल्याने बºया पैकी वाढ झालेले पीक वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु, ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोयच नाही त्यांच्या नजरा सध्या आकाशाकडे लागल्या आहेत. येत्या दोन दिवसात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास कोरडवाहू क्षेत्रावरील तूर, कपाशी, सोयाबीन पीक करपण्यास सुरूवात होईल, असे सांगितले जात असून यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे.कपाशी व तूर पीक दमधरूनजिल्ह्यात ओलिताच्या शेतजमिनीच्या तूलनेत कोरडवाहू शेतजमिनीचे क्षेत्र जास्त आहे. गत काही दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला असला तरी सध्यास्थितीत कपाशी व तूर पीक दमधरूनच आहे. येत्या चार-पाच दिवसात पाऊस न झाल्यास कोरडवाहू क्षेत्रावरील हे उभे पीक करपण्यास सुरूवात होईल, असे वयोवृद्ध शेतकरी सांगतात.सोयाबीन पीक हातचे जाण्याची भीतीयंदा १ लाख १५ हजार ६६९ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सध्यास्थितीत हे पीक फुलावर असून येत्या दोन दिवसात जोरदार पाऊस होत या पिकाला पुरेसे पाणी न मिळाल्यास फुलगळतीला सुरूवात होईल. शिवाय पावसाचा खंड त्यापेक्षा जास्त काळ कायम राहिल्यास कोरडवाहू क्षेत्रावरील सोयाबीन पीक बळीराजाच्या हातचे जाईल, असे बोलले जात आहे.काळीची शेत जमीन असलेल्या शेतात सध्या ओलावा कायम आहे. परंतु, मुरमाड शेतजमिनीत ओलावा पाहिले तसा नसल्याचे दिसून येते. येत्या दोन दिवसात पाऊस न आल्यास कोरडवाहू क्षेत्रावरील सोयाबीन पिकाची फुलगळती सुरू होत हे पीक करपण्यास सुरूवात होईल, अशी स्थिती आहे. पावसाचा खंड काही दिवस कायम राहत कडक ऊन तापल्यास तूर, कपाशी, सोयाबीन आदी पीक करपण्यास सुरूवात होईल. येत्या काही दिवसात जोरदार पाऊसाची आशा असून तसा हवामान खात्याचा अंदाज आहे.- डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी