शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

गुढीपाडव्यावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: March 21, 2015 02:07 IST

शेतकऱ्यांच्या आर्थिक वर्षांला मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्यापासून प्रारंभ होत असतो.

सेलू : शेतकऱ्यांच्या आर्थिक वर्षांला मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्यापासून प्रारंभ होत असतो. यंदा नव्या वर्षात प्रवेश करताना शेतकऱ्यांना जुन्या वर्षात आलेले अनुभव व त्याच्या आठवणी पुसता पुसत नाही, असे चित्र आहे. पहिले पावसाची प्रतीक्षा व नंतर अवकाळी पावसाने दिलेल्या जखमा ताज्या आहेत. या साऱ्या दुष्काळी परिस्थितीचे सावट गुढीपाडव्यावर दिसत आहे.गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरी त्याच्या शेतात जावून त्याच्या मांडवाना आंब्याच्या पानांचे तोरण बांधून नवा सालकरी ठेवण्याची पद्धत आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सालकऱ्याचे साल ठरवून त्याच्या हातून मांडवाला तोरण बांधण्याचा आजपर्यंतची प्रथा आहे. यंदा मात्र शेतीत आलेल्या नुकसानामुळे बरेच शेतकरी सालकरी ठेवण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले आहे. ज्यांच्याकडे अधिक शेती आहे तेच सालकरी ठेवत आहे. यातही सालकऱ्याला देण्यात येत असलेल्या सालाबाबतही भावबाजी सुरू असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी गत वर्षी असलेल्या सालकऱ्यालाच पुन्हा ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात त्याला असलेल्या जुन्याच सालात काम करण्याचे बळीराजा बोलत आहे. यंदा आलेल्या दुष्काळाच्या स्थितीमुळे आर्थिक घडी विस्कटली असल्याचे अशी वेळ असल्याचे चित्र ग्रामीण भागात येत आहे. असे असताना सर्वच दु:ख विसरुन शेतकरी आपल्या कामाला लागल्याचे चित्र आहे. येत्या वर्षात तरी जुन्या वर्षाच्या आठवणी पुसल्या जाव्या असे शेतकऱ्याची इच्छा असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.(तालुका प्रतिनिधी)