शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

गुढीपाडव्यावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: March 21, 2015 02:07 IST

शेतकऱ्यांच्या आर्थिक वर्षांला मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्यापासून प्रारंभ होत असतो.

सेलू : शेतकऱ्यांच्या आर्थिक वर्षांला मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्यापासून प्रारंभ होत असतो. यंदा नव्या वर्षात प्रवेश करताना शेतकऱ्यांना जुन्या वर्षात आलेले अनुभव व त्याच्या आठवणी पुसता पुसत नाही, असे चित्र आहे. पहिले पावसाची प्रतीक्षा व नंतर अवकाळी पावसाने दिलेल्या जखमा ताज्या आहेत. या साऱ्या दुष्काळी परिस्थितीचे सावट गुढीपाडव्यावर दिसत आहे.गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरी त्याच्या शेतात जावून त्याच्या मांडवाना आंब्याच्या पानांचे तोरण बांधून नवा सालकरी ठेवण्याची पद्धत आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सालकऱ्याचे साल ठरवून त्याच्या हातून मांडवाला तोरण बांधण्याचा आजपर्यंतची प्रथा आहे. यंदा मात्र शेतीत आलेल्या नुकसानामुळे बरेच शेतकरी सालकरी ठेवण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले आहे. ज्यांच्याकडे अधिक शेती आहे तेच सालकरी ठेवत आहे. यातही सालकऱ्याला देण्यात येत असलेल्या सालाबाबतही भावबाजी सुरू असल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी गत वर्षी असलेल्या सालकऱ्यालाच पुन्हा ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात त्याला असलेल्या जुन्याच सालात काम करण्याचे बळीराजा बोलत आहे. यंदा आलेल्या दुष्काळाच्या स्थितीमुळे आर्थिक घडी विस्कटली असल्याचे अशी वेळ असल्याचे चित्र ग्रामीण भागात येत आहे. असे असताना सर्वच दु:ख विसरुन शेतकरी आपल्या कामाला लागल्याचे चित्र आहे. येत्या वर्षात तरी जुन्या वर्षाच्या आठवणी पुसल्या जाव्या असे शेतकऱ्याची इच्छा असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.(तालुका प्रतिनिधी)