शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

कपाशीवर रोग, पाने पिवळी पडली; शेतकऱ्यापुढे नवे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 17:28 IST

उत्पादनात घट होण्याची शक्यता : उपाययोजना सुचविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : तालुक्यातील अनेक गावांत जोमात वाढलेल्या कपाशीवर रोग आला आहे. सततच्या पावसामुळे कपाशी पीक पिवळे पडले असल्याचा अंदाज जाणकारांचा अंदाज आहे. आणखी पाऊस आल्यास हे पीक हातचे जाण्यासह उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तालुक्यात हजारो हेक्टरवर कपाशी पिकांची लागवड करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडला नसल्याने पेरण्यांना विलंब झाला. पेरणीनंतर तुरळक झालेल्या पावसाने कपाशी पिकांनी तग धरला. तर ज्याच्याकडे ओलिताची सोय होती त्यांनी ओलित करून कपाशी जगविली. तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी ४० टक्क्यांपर्यंत डोब आली होती. त्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली होती. मात्र, त्यानंतर लागून पडलेल्या पावसाने पिकांची पुरती वाट लावली. सध्या घडला कपाशी फुले पात्यावर आहेत. असे असताना परतीच्या पावसाचा फटका तालुक्याला बसला आहे. 

दिवसा ऊन, रात्री ढगाळ वातावरण असल्याने शेतात शेवाळ निर्माण झाले. परिणामी कपाशीचे पीक पिवळे पडत आहे. हे वातावरण कीड, रोगांना पोषक ठरत असून, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशीवर बोंडअळी तर आलीच रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भावही वाढला आहे; तणनाशके निष्प्रभावी ठरत असल्याने पिकांमध्ये तण प्रचंड वाढले आहे. कीड, रोग, शेतातील तणांचे व्यवस्थापन, नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी जहाल, अत्यंतिक विषारी कीटकनाशके फवारणी करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. असे असताना अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

मार्गदर्शन करण्याची मागणी दरवर्षी कपाशीवर व सोयाबीनवर काही ना काही रोग येतो. यंदाही कपाशीवर रोग आला आहे. पाने पिवळी पडत आहे. यंदा जमिनीत चांगल्या पावसामुळे ओलेपणा कायम आहे व ऊनही चांगले तापत आहे. त्यामुळे कदाचित कपाशीवर रोगांनी अटॅक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. कपाशीची पाने पिवळी पडल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. वळीच उपायोजना झाल्या नाही तर हातचे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

संकटाशी दोन हात हंगामात अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान केले. यात कपाशीवर आलेल्या कीडरोगाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. लागवडीला लागलेला खर्च आणि बाजारात मिळणारा हमीभाव यात मोठी तफावत असल्याने संकटाशी दोन हात करताना शेतकऱ्यांच्या आता जिव्हारी लागत असल्याचे बोलले जात आहे.

दिवाळी सणही फिकाच दिवाळी सनापूर्वी खरिपातील पीके निघण्यास सुरवात होते. यंदा सोयाबिनने दगा दिला. त्यात भाव पाडून व्यापारी शेतमालाची खरेदी करीत आहे. त्यामुळे दिवाळी सारखा सण सूनाच जाण्याची चिन्ह दिसून येत आहे. लेकी बाळीला चोरी बांगडी घेण्यासाठी उधार घेण्याची वेळ ओढावली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाcottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती