शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

कपाशीवर रोग, पाने पिवळी पडली; शेतकऱ्यापुढे नवे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 17:28 IST

उत्पादनात घट होण्याची शक्यता : उपाययोजना सुचविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : तालुक्यातील अनेक गावांत जोमात वाढलेल्या कपाशीवर रोग आला आहे. सततच्या पावसामुळे कपाशी पीक पिवळे पडले असल्याचा अंदाज जाणकारांचा अंदाज आहे. आणखी पाऊस आल्यास हे पीक हातचे जाण्यासह उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तालुक्यात हजारो हेक्टरवर कपाशी पिकांची लागवड करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस पडला नसल्याने पेरण्यांना विलंब झाला. पेरणीनंतर तुरळक झालेल्या पावसाने कपाशी पिकांनी तग धरला. तर ज्याच्याकडे ओलिताची सोय होती त्यांनी ओलित करून कपाशी जगविली. तर कोरडवाहू शेतकऱ्यांनी ४० टक्क्यांपर्यंत डोब आली होती. त्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली होती. मात्र, त्यानंतर लागून पडलेल्या पावसाने पिकांची पुरती वाट लावली. सध्या घडला कपाशी फुले पात्यावर आहेत. असे असताना परतीच्या पावसाचा फटका तालुक्याला बसला आहे. 

दिवसा ऊन, रात्री ढगाळ वातावरण असल्याने शेतात शेवाळ निर्माण झाले. परिणामी कपाशीचे पीक पिवळे पडत आहे. हे वातावरण कीड, रोगांना पोषक ठरत असून, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशीवर बोंडअळी तर आलीच रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भावही वाढला आहे; तणनाशके निष्प्रभावी ठरत असल्याने पिकांमध्ये तण प्रचंड वाढले आहे. कीड, रोग, शेतातील तणांचे व्यवस्थापन, नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी जहाल, अत्यंतिक विषारी कीटकनाशके फवारणी करीत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे. असे असताना अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

मार्गदर्शन करण्याची मागणी दरवर्षी कपाशीवर व सोयाबीनवर काही ना काही रोग येतो. यंदाही कपाशीवर रोग आला आहे. पाने पिवळी पडत आहे. यंदा जमिनीत चांगल्या पावसामुळे ओलेपणा कायम आहे व ऊनही चांगले तापत आहे. त्यामुळे कदाचित कपाशीवर रोगांनी अटॅक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. कपाशीची पाने पिवळी पडल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. वळीच उपायोजना झाल्या नाही तर हातचे पीक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

संकटाशी दोन हात हंगामात अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने खरीप पिकांचे नुकसान केले. यात कपाशीवर आलेल्या कीडरोगाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. लागवडीला लागलेला खर्च आणि बाजारात मिळणारा हमीभाव यात मोठी तफावत असल्याने संकटाशी दोन हात करताना शेतकऱ्यांच्या आता जिव्हारी लागत असल्याचे बोलले जात आहे.

दिवाळी सणही फिकाच दिवाळी सनापूर्वी खरिपातील पीके निघण्यास सुरवात होते. यंदा सोयाबिनने दगा दिला. त्यात भाव पाडून व्यापारी शेतमालाची खरेदी करीत आहे. त्यामुळे दिवाळी सारखा सण सूनाच जाण्याची चिन्ह दिसून येत आहे. लेकी बाळीला चोरी बांगडी घेण्यासाठी उधार घेण्याची वेळ ओढावली आहे.

टॅग्स :wardha-acवर्धाcottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती