शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

धोची वाळूघाटातील पाण्याचा प्रवाहच वळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 22:21 IST

हिंगणघाट तालुक्यातील धोची वाळूघाटात वाळू माफियांनी चांगलाच धुडगूस घातला असून वाळूउपसा करण्याकरिता नदीपात्रात दोन बोटी लावण्यात आल्या आहेत. या बोटी चालविण्याकरिता चक्क पाण्याचा प्रवाहच वळविल्याने नदीपात्र धोक्यात आले आहे. यामुळे परिसरातील गावांना भविष्यात धोका होण्याची शक्यताही बळावली आहे.

ठळक मुद्देवाळूमाफियांचा धुडगूस : दोन बोटींच्या सहाय्याने होतोय अवैध उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/पोहणा : हिंगणघाट तालुक्यातील धोची वाळूघाटात वाळू माफियांनी चांगलाच धुडगूस घातला असून वाळूउपसा करण्याकरिता नदीपात्रात दोन बोटी लावण्यात आल्या आहेत. या बोटी चालविण्याकरिता चक्क पाण्याचा प्रवाहच वळविल्याने नदीपात्र धोक्यात आले आहे. यामुळे परिसरातील गावांना भविष्यात धोका होण्याची शक्यताही बळावली आहे.पहिल्या टप्प्यात झालेल्या आठ घाटांच्या लिलावापैकी हा एक वाळू घाट असून या घाटाची सर्वाधिक बोली लागली. आठही घाटाच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला ६ कोटी ७४ लाख ४१ हजार ८५१ रुपयांचा महसूल मिळाला. त्यापैकी तब्बल २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयांचा महसूल एकट्या धोची वाळूघाटाने दिला आहे. या घाटात सर्वांत जास्त ६ हजार १८४ ब्रास वाळू असल्याचा अंदाज ठरविण्यात आला होता.त्यामुळे जास्त वाळूसाठा असल्याने आतापर्यंतच्या वाळूघाटाच्या लिलावाच्या इतिहासात पहिल्यांच बोली अडीच कोटींवर गेली. हा घाट आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्टस् लि. या कंपनीच्या नावाने असून येथून वाळू उपसा करण्याचा कंत्राट बुरांडे व साटोणे नामक व्यक्तींनी घेतल्याचे नुकताच घडलेल्या घटनेवरून उघडकीस आले आहे. वाळूउपसा करण्याचा कंत्राट घेणाऱ्यांनी या नदीपात्रात नियमबाह्य दोन बोटी लावून दिवस-रात्र वाळूउपसा चालविला.परिणामी, नदीपात्रही धोक्यात आले. गावातून वाहतूक बंद करण्याकरिता नागरिकांनी वाहने अडविल्याने झालेल्या चाकू हल्ल्यानंतर प्रशासनालाही जाग आली. त्यांनी लगेच घाटाकडे धाव घेत बोटी जप्त करण्याच्या कारवाईसाठी धडपड चालविली.महसूल-पोलीस प्रशासनाने मिटलेय डोळेलिलावानंतरच्या काळात वाळू उपस्यावर बंदी आली होती. ती बंदी उठवून अटी व शर्तीच्या अधिन राहून वाळूउपसा करण्याचे निर्देश घाटधारकांना दिले होते. परंतु, अद्याप घाटधारकांकडून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे धोची घाटावरील प्रकारावरून निदर्शनास आले आहे. बोटी व जड वाहनांना घाटात प्रवेश निषिद्ध असतानाही या घाटात राजरोसपणे नियम धाब्यावर बसवून वाळूउपसा सुरू होता. परंतु, आतापर्यंत याकडे हिंगणघाटच्या महसूल विभागाचे आणि पोलिसांचेही कसे लक्ष गेले नाही, हे न उलगडणारे कोडेच आहे.आता तरी प्रशासनाला जाग येईल का?वाळूघाटातून वाळू भरून निघालेल्या जड वाहनांमुळे गावकऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे गावकºयांनी दुसºया मार्गाने वाहतूक करा, असे सांगण्याकरिता वाहने अडविली, तर त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याऐवजी मुजोर घाटधारक बुरांडे याने त्यांच्यावर चाकू हल्ला करून ज्ञानेश्वर इंगळे याला जखमी केले. त्यामुळे गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वाळूघाटधारक गावकºयांच्या जिवावर उठले आहेत, त्यामुळे आता तरी कठोर कारवाई करणार काय? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.हल्लेखोराला अटकवाळूघाटधारक आकाश उर्फ अक्षय दिनेश बुरांडे रा. धानोरा याला वडनेर पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली, असे ठाणेदार गजभिये यांनी सांगितले.