शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

खाणपट्ट्यांना ‘नाहरकत’ प्रमाणपत्रास नकार

By admin | Updated: December 15, 2014 23:06 IST

गिट्टी खदाणीत ब्लास्टींग केले जात असल्याने घरांचे, शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते़ यामुळे खाणपट्टा देण्यात येऊ नये, खदाणीला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी येसंबा

येसंबा ग्रामपंचायतीने घेतला ठराव : जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित मंत्र्यांना निवेदनवर्धा : गिट्टी खदाणीत ब्लास्टींग केले जात असल्याने घरांचे, शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते़ यामुळे खाणपट्टा देण्यात येऊ नये, खदाणीला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणी येसंबा येथील ग्रामस्थांनी केली़ ग्रामपंचायतीने ही मागणी मान्य करीत ग्रामसभेत ठराव पारित केला आहे़ या ठरावाच्या प्रती तलाठ्यासह जिल्हाधिकारी आणि संबंधित मंत्र्यांना सादर केल्या़ येसंबा परिसरातील खाणपट्ट्यांचे नुतनीकरणही करण्यात येऊ नये, अशी मागणीही ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने केली आहे़ गौण खनिज उत्खननास सध्या उधान आले आहे़ झटपट श्रीमंत होण्याच्या नादात परवानगीपेक्षा अधिक उत्खनन करून पर्यावरणास धोका निर्माण केला जात आहे़ खाणपट्ट्यांचे नुतनीकरण न करता शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे़ वर्धा जिल्ह्यात गतवर्षीपर्यंत बहुतांश खदाणी नुतनीकरण न करताच सुरू होत्या़ यात शासकीय महसूल बुडाला असून मर्यादेपेक्षा अधिक उत्खनन करण्यात आल्याने पर्यावरणासही धोका निर्माण झाला आहे़ या खाणींमध्ये होणाऱ्या ब्लास्टींगमुळे येसंबा व परिसरातील गावांत घरांचे नुकसान होत आहे़ शिवाय पिकांचे नुकसान होत असून जनावरेही चारा खाऊ शकत नाहीत़ खाणपट्ट्यांमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यालाही धोक्यात निर्माण झाला आहे़ शिवाय पर्यावरण धोक्यात आले आहे़ खाणपट्टा व के्रशरमधून निघणाऱ्या धूळीमुळे पिकांवरही दुष्परिणाम होत आहे़ के्रशरमुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना शेतातून काही पिकेल, ही अपेक्षाच राहिलेली नाही़ यामुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसानही सहन करावे लागत आहे़ खाणपट्टा व क्रेशरमुळे त्रस्त झालेल्या येसंबा येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेत खाणपट्ट्याची परवानगी कुणालाही देण्यात येऊ नये, गिट्टी खदाणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, संबंधितांना वीज जोडणीही देण्यात येऊ नये आणि भविष्यात पूर्वीपासून असलेल्या खाणपट्टा धारकांच्या खाणींचे नुतनीकरण करणे कायम बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़ येसंबा ग्रामपंचायतीनेही ९ डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत तसा ठराव पारित केला आहे़ ठरावाच्या प्रती तलाठी, तहसीलदार, एसडीओ, जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विभागाच्या मंत्र्यांनाही पाठविल्या आहेत़ यात मातीच्या उत्खननाची परवानगी कुणालाच देण्यात येऊ नये, अशी मागणीही करण्यात आलेली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)