शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कापसाला मातीमोल भाव, शेतकरी झाले हवालदिल; सरकारी कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 20:16 IST

Vardha : कापसातील ओलावा आणि कापसाची पत हे कारण सांगून खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडले आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचे 'पांढरे सोने' अक्षरशः मातीमोल भावाने जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : विधानसभा क्षेत्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या नैसर्गिक संकटांसह बाजारातील धोरणांचे दुहेरी संकट कोसळले आहे. अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलांमुळे सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने वाचवलेल्या कापसावर आता त्यांची सारी भिस्त आहे. मात्र, हाती आलेला कापूस खासगी व्यापारी अत्यंत बेभाव दराने खरेदी करत आहेत.

कापसातील ओलावा आणि कापसाची पत हे कारण सांगून खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे दर पाडले आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचे 'पांढरे सोने' अक्षरशः मातीमोल भावाने जात आहे. या प्रचंड आर्थिक नुकसानीमुळे आर्वी मतदारसंघातील बळीराजा पूर्णपणे हतबल झाला असून, शेतकऱ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. 

शेतकऱ्यांची भिस्त आता शासनावरच

आमदार वानखेडे यांच्याकडून मिळालेल्या आश्वासनामुळे आर्वी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. सध्या आर्थिकदृष्ट्या पूर्णतः खचलेला बळीराजा शासनाच्या एका ठोस निर्णयाची वाट पाहत आहे. कापूस पिकाला तरी उत्कृष्ट आणि चांगले दर मिळवून द्यावेत, यासाठी ते मोठ्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत. 

सर्वच शेतकरी सापडले मोठ्या आर्थिक संकटात

यावर्षी झालेला सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या सोयाबीन व कापसाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या प्रकोपातून कसाबसा शिल्लक राहिलेला कापूस शेतकरी खासगी बाजारपेठेत विकायला आणत आहे; मात्र खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला अत्यंत कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह, दैनंदिन अर्थचक्र, मुलांचे शिक्षण तसेच बी-बियाणे तसेच लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत बळीराजा दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने कापूस केंद्र सुरू करून कापसाला हमी भाव देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकऱ्यांनी मांडली आपली कैफियत, आशा पल्लवीत

या गंभीर परिस्थितीत, आर्थिक अडचणींनी गांजलेल्या शेतकऱ्यांनी थेट आमदार सुमित वानखेडे यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी आमदारांसमोर कापसाच्या खरेदी संदर्भात असलेली आपली कैफियत मांडली. व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी, शासनाने तत्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची त्यांची मुख्य मागणी आहे. सरकारी केंद्र सुरू झाल्यास त्यांना किमान आधारभूत किंमत मिळेल आणि ते या संकटातून काही प्रमाणात बाहेर पडू शकतील. शेतकऱ्यांचे दुःख आणि मागणी ऐकून आमदार वानखेडे यांनी या समस्येवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी हे खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cotton prices crash; distressed farmers demand government purchase centers.

Web Summary : Farmers in Arvi face dual crises: crop loss and low cotton prices. Exploited by private traders, they seek government intervention and demand cotton purchase centers to alleviate their financial distress. MLA Wanekhede has assured support.
टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीfarmingशेतीnagpurनागपूर