शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

कापसाचा भाव ५ हजार ५५० राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 3:25 PM

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : यंदा महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता ...

ठळक मुद्देराज्यात अधिक केंद्र उघडावे१ कोटी कापूस गाठी खरेदीसाठी सीसीआयवर दबाव वाढवावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदा महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादन २५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. मात्र, देशातील कापसाचे उत्पादन लक्षात घेऊन यावेळी सीसीआयने १ कोटी गाठी खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम केल्यास कापसाचा ५ हजार ५५० रुपये हमीभाव टिकून राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारवर आतापासूनच दबाव वाढवावा लागणार आहे, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव ५ हजार ५५० रूपये निश्चित केला आहे. देशातील बाजारपेठ व जागतिक बाजारपेठेतील कल पाहता कापूस यावर्षी या हमीभावाच्या आसपास स्थिर होईल, अशी शक्यता आहे. सीसीआयने दहा लाख गाठी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सीसीआयने १ कोटी गाठी खरेदी कराव्यात, १०० दशलक्ष गाठी सीसीआयने खरेदी करण्याचे नियोजन करावे, अशी मागणीही इंगळे यांनी केली आहे. महाराष्ट्रात कापसाचे उत्पादन २५ टक्के कमी होणार आहे. यामागे काही जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी तर काही जिल्ह्यात कमी झालेला पाऊस हे महत्त्वाचे कारण आहे. परंतु, देशातील इतर राज्यात कापूस उत्पादन होत असल्यामुळे ३३० दशलक्ष कापूस गाठींचे उत्पादन देशात होईल. यावर्षी ३० लाख कापूस गाठी आयात झालेल्या आहेत. देशांतर्गत गरज २७५ दशलक्ष गाठींपर्यंत वाढलेली आहे. त्यामुळे आयातीवर संपूर्ण बंदी घालावी यासाठी राज्यसरकारने आत्ताच केंद्र सरकारवर दबाव आणून केंद्राअंतर्गत येणाऱ्या सीसीआयचे राज्यातील नेटवर्क (कापूस खरेदी केंद्र) वाढवावे व १०० दशलक्ष गाठी खरेदीचे उद्दिष्ट ठेवावे, तेव्हाच राज्यातील शेतकऱ्याला ५ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल कापसाला भाव मिळेल, असेही इंगळे यांनी सांगितले. यावर्षी कापसाचे भाव कमी होतील, अशी भीती उत्पादकांमध्ये आहे. त्यामुळे याबाबत आताच राज्यसरकारने पावले उचलून केंद्राकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहून विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती इंगळे यांनी दिली आहे.

गडकरींची जबाबदारी वाढणारकेंद्र सरकारच्या शेतमाल आयात निर्यात टास्कफोर्स (मंत्रीगट) अध्यक्ष केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आहेत. राज्यात उत्पन्न होणाऱ्या कापसामध्ये ७० टक्के कापूस एकट्या विदर्भाचा आहे. विदर्भातील नगदी पीक असलेल्या कापसाच्या भावावर येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. त्यामुळे आयात निर्यातीबाबत केंद्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे गडकरी यांच्यावर मोठी जबाबदारी यावेळी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव मिळण्यासाठी कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) चे अधिक कापूस खरेदी केंद्र विदर्भात सुरू होणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा आताच सुरू करण्याची गरज आहे.- प्रशांत इंगळे तिगावकर, सदस्यराज्य कृषी मूल्य आयोग, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती