शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्याच्या खरेदीत व्यापाऱ्यांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 20:09 IST

चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत कापूस उत्पादकांनी पांढर सोनं घरातच साठवून ठेवलं. प्रारंभी जागतिक मंदी आणि आता लॉकडाऊनचा दणका बसल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. लॉकडाऊनच्या काळात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केला जात आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भरसीसीआयकडून केवळ एफएक्यू दर्जाच्या कापसाला पसंती

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत कापूस उत्पादकांनी पांढर सोनं घरातच साठवून ठेवलं. प्रारंभी जागतिक मंदी आणि आता लॉकडाऊनचा दणका बसल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. लॉकडाऊनच्या काळात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केला जात आहे. त्यातही सीसीआयकडूनही एफएक्यू (फेअर अ‍ॅव्हरेज क्वालिटी) दर्जाचाच कापूस घेतला जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात कापूस विकावा लागत आहे.कापूस उत्पादकांनी जवळपास ३० ते ४० टक्के कापूस अद्याप घरातच साठवून ठेवला आहे. जिल्ह्यात सीसीआयच्या आठ केंद्रांमार्फत कापसाची खरेदी सुरू होती. शेतकऱ्यांना सुरुवातीला सीसीआयकडून ५ हजार ५५० रुपये हमीभावही मिळाला. शेतकऱ्यांची सीसीआय केंद्रावर गर्दी कायम असतानाच मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सीसीआयकडूनही कापूस खरेदी थांबविण्यात आली. खरीप हंगाम तोेंडावर आला असल्यामुळे शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीची मागणी करण्यात आली. त्यामुळे शासनानेही सीसीआयचे केंद्र पुन्हा सुरू केले. आता शेतकऱ्यांची गर्दी टाळण्याकरिता नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी ठरावीक शेतकऱ्यांना बोलाविले जात आहे. त्यामुळे असंख्य शेतकरी क्रमांक लागण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता सीसीआयच्या केंद्रावर एफएक्यू (फेअर अ‍ॅव्हरेज क्वालिटी) च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून ५ हजार २५०, ५ हजार ३५० किंवा ५ हजार ४५० रुपयांपर्यंतच भाव दिले जात आहे. या शासकीय खरेदीतही शेतकऱ्यांना अडथळे पार करावे लागत असल्याने आगामी खरीप हंगाम लक्षात घेऊन कापूस उत्पादक लवकरात लवकर कापूस विकण्याच्या तयारीत आहेत. याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांना होत आहे. नाईलाजामुळे मिळेल त्या भावात कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

मंदीच्या काळातील ‘एफएक्यू’चे धोरण अयोग्यमध्यंतरी जिनिंग-प्रेसिंग मालक व सीसीआय यांच्यात १ क्विंटल कापसापासून किती रुई, सरकी व तूट, हा वाद सुरु होता. तो आता निवळला आहे. परंतु, सीसीआय व सीसीआयचा एजंट म्हणून महाराष्ट्र कापूस फेडरेशनने केवळ एफएक्यू (फेअर अ‍ॅव्हरेज क्वालिटी) दर्जाचाच कापूस विकत घेईल. त्यांनी नाकारलेला कापूस शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विकावा, हे धोरण मंदीच्या काळात योग्य नाही. म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने मंदीच्या पार्श्व•ाूमीवर अंतर्गत गे्रडिंग करून शेतकऱ्यांचा उरलेला सर्व कापूस विकत घ्यावा.२००८-०९ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी कापसाच्या हमीभावात ५० टक्के वाढ करून २ हजार ३० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव ३ हजार रुपये जाहीर केला होता. तेव्हा हे भाव भारतीय आणि जागतिक बाजारपेठेतही नव्हते. महाराष्ट्रातील सर्व कापूस सीसीआय व नाफेडने खरेदी केला होता. नाफेडने तब्बल १६७.९४ लाख क्विंटल कापसाची खरेदी करून ४७१६ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलेत. तेव्हा हमीभाव ३ हजार रुपये होता आणि खरेदीचा सरासरी भाव २ हजार ८०० रुपये होता.सध्या शेतकºयांचा सीसीआयने नाकारलेला कापूस व्यापारी ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करीत आहेत. हाही कापूस पुन्हा सरकारी खरेदीतच जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. २५ मार्चपूर्वीसुद्धा व्यापाऱ्यांनी ४ हजार ते ५ हजार रुपये किंमतीत कापूस खरेदी केला होता. तो कापूस आता कुठे गेला? असा सवाल शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी केला आहे.

२०१८-१९ च्या हंगामात ६ हजार ते ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांना ३ हजार ते ४ हजार रुपयांत कापूस विकताना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कापूस खरेदीत होणारा तथाकथित गैरप्रकार व शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचा सर्व कापूस अंतर्गत गे्रडिंग करून विकत घेण्याचे धोरण जाहीर करावे.विजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे पाईक.

 

टॅग्स :cottonकापूस