शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पांढऱ्या सोन्याच्या खरेदीत व्यापाऱ्यांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 20:09 IST

चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत कापूस उत्पादकांनी पांढर सोनं घरातच साठवून ठेवलं. प्रारंभी जागतिक मंदी आणि आता लॉकडाऊनचा दणका बसल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. लॉकडाऊनच्या काळात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केला जात आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अडचणीत भरसीसीआयकडून केवळ एफएक्यू दर्जाच्या कापसाला पसंती

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत कापूस उत्पादकांनी पांढर सोनं घरातच साठवून ठेवलं. प्रारंभी जागतिक मंदी आणि आता लॉकडाऊनचा दणका बसल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. लॉकडाऊनच्या काळात नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाच कापूस खरेदी केला जात आहे. त्यातही सीसीआयकडूनही एफएक्यू (फेअर अ‍ॅव्हरेज क्वालिटी) दर्जाचाच कापूस घेतला जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच नाईलाजास्तव व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात कापूस विकावा लागत आहे.कापूस उत्पादकांनी जवळपास ३० ते ४० टक्के कापूस अद्याप घरातच साठवून ठेवला आहे. जिल्ह्यात सीसीआयच्या आठ केंद्रांमार्फत कापसाची खरेदी सुरू होती. शेतकऱ्यांना सुरुवातीला सीसीआयकडून ५ हजार ५५० रुपये हमीभावही मिळाला. शेतकऱ्यांची सीसीआय केंद्रावर गर्दी कायम असतानाच मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सीसीआयकडूनही कापूस खरेदी थांबविण्यात आली. खरीप हंगाम तोेंडावर आला असल्यामुळे शेतकऱ्यांकडून कापूस खरेदीची मागणी करण्यात आली. त्यामुळे शासनानेही सीसीआयचे केंद्र पुन्हा सुरू केले. आता शेतकऱ्यांची गर्दी टाळण्याकरिता नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी ठरावीक शेतकऱ्यांना बोलाविले जात आहे. त्यामुळे असंख्य शेतकरी क्रमांक लागण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता सीसीआयच्या केंद्रावर एफएक्यू (फेअर अ‍ॅव्हरेज क्वालिटी) च्या नावाखाली शेतकऱ्यांकडून ५ हजार २५०, ५ हजार ३५० किंवा ५ हजार ४५० रुपयांपर्यंतच भाव दिले जात आहे. या शासकीय खरेदीतही शेतकऱ्यांना अडथळे पार करावे लागत असल्याने आगामी खरीप हंगाम लक्षात घेऊन कापूस उत्पादक लवकरात लवकर कापूस विकण्याच्या तयारीत आहेत. याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांना होत आहे. नाईलाजामुळे मिळेल त्या भावात कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

मंदीच्या काळातील ‘एफएक्यू’चे धोरण अयोग्यमध्यंतरी जिनिंग-प्रेसिंग मालक व सीसीआय यांच्यात १ क्विंटल कापसापासून किती रुई, सरकी व तूट, हा वाद सुरु होता. तो आता निवळला आहे. परंतु, सीसीआय व सीसीआयचा एजंट म्हणून महाराष्ट्र कापूस फेडरेशनने केवळ एफएक्यू (फेअर अ‍ॅव्हरेज क्वालिटी) दर्जाचाच कापूस विकत घेईल. त्यांनी नाकारलेला कापूस शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विकावा, हे धोरण मंदीच्या काळात योग्य नाही. म्हणूनच केंद्र व राज्य सरकारने मंदीच्या पार्श्व•ाूमीवर अंतर्गत गे्रडिंग करून शेतकऱ्यांचा उरलेला सर्व कापूस विकत घ्यावा.२००८-०९ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी कापसाच्या हमीभावात ५० टक्के वाढ करून २ हजार ३० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव ३ हजार रुपये जाहीर केला होता. तेव्हा हे भाव भारतीय आणि जागतिक बाजारपेठेतही नव्हते. महाराष्ट्रातील सर्व कापूस सीसीआय व नाफेडने खरेदी केला होता. नाफेडने तब्बल १६७.९४ लाख क्विंटल कापसाची खरेदी करून ४७१६ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलेत. तेव्हा हमीभाव ३ हजार रुपये होता आणि खरेदीचा सरासरी भाव २ हजार ८०० रुपये होता.सध्या शेतकºयांचा सीसीआयने नाकारलेला कापूस व्यापारी ३ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करीत आहेत. हाही कापूस पुन्हा सरकारी खरेदीतच जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. २५ मार्चपूर्वीसुद्धा व्यापाऱ्यांनी ४ हजार ते ५ हजार रुपये किंमतीत कापूस खरेदी केला होता. तो कापूस आता कुठे गेला? असा सवाल शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी केला आहे.

२०१८-१९ च्या हंगामात ६ हजार ते ६ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांना ३ हजार ते ४ हजार रुपयांत कापूस विकताना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कापूस खरेदीत होणारा तथाकथित गैरप्रकार व शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचा सर्व कापूस अंतर्गत गे्रडिंग करून विकत घेण्याचे धोरण जाहीर करावे.विजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे पाईक.

 

टॅग्स :cottonकापूस