शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

शेती उत्पन्नापेक्षा मजुरीचा खर्च आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST

शेतकऱ्याला शेती कसताना अनेक गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासाठी त्याला बँक, सावकारांच्या दारात गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव घसरले तर शेतकरी शेती करणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज मार्केटमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस चार हजार, सोयाबीन तीन हजार, तूर पाच हजार या दराने खरेदी करीत आहे.

ठळक मुद्देशेतकरी विवंचनेत । हमीभावाअभावी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होतेय लूट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागीलवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकºयांना साधारण उत्पन्न झाले. परंतु, शेतातील पीक हातात येत असताना कोरोनाने शेतकऱ्यांच्या संकटात भर पाडली. खरिप हंगाम तोंडावर आला असताना बि-बियाणे खरेदी, शेतीच्या मशागतीसाठी पैसा शेतकºयांकडे उपलब्ध नाही. शेती उत्पन्नापेक्षा मजुरीचाच खर्च जास्त झाल्याने शेतकरी विवंचनेत सापडले आहेत.बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मिळेल त्या भावात पिकविलेला माल व्यापाºयांना विकत आहे. शेतकऱ्यांच्या या अडचणींचा फायदा घेऊन व्यापारी माल खरेदी करत आहे. पिकविलेल्या मालापेक्षा मजुरांचे वार्षिक उत्पन्न जास्त असल्याने शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.शेतकऱ्याला शेती कसताना अनेक गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासाठी त्याला बँक, सावकारांच्या दारात गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव घसरले तर शेतकरी शेती करणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.आज मार्केटमध्ये व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस चार हजार, सोयाबीन तीन हजार, तूर पाच हजार या दराने खरेदी करीत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ होत चालली आहे.उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे. सध्या मिळणाऱ्या भावाने शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघणे अवघड झाले आहे. आधीच शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँकांचे तसेच सावकाराचे कर्ज आहे. या कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. परंतु, शेतकऱ्यांना शेतीशिवाय पर्याय उरला नाही. शेती करायची म्हटले तर मजुरांची आवश्यकता आहे. त्यासाठी गावात मजूर मिळत नाही. बाहेरून मजूर आणावे लागत आहे. त्यांना येण्याजाण्याचा ऑटो खर्चही द्यावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.लागवडीची सोय नाहीआज तालुक्यात सालगड्याचे साल एक लाख २५ हजार आहे. माणसाची रोजी ३५० रूपये, डवरण २५० रूपये, फवारणी दर ३०० रुपये आहे. त्यामुळे शेती करावी की नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांवर कर्ज असल्याने बँका कर्ज देऊ शकत नाही. पेरणीसाठी पैसा नाही. त्यामुळे पेरणी करायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीवर कुटुंब असल्याने शेती करावी लागते. दुसरा व्यवसाय नाही. संस्था अध्यक्ष, सचिव यांच्याकडे शेतकरी कर्जाची मागणी करीत आहे. थकीत असल्याने कर्जही देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही लागवडीची सोय करता आली नाही.एकरी २६ हजारांचा खर्चनांगरणी खर्च दीड हजार रुपये, वखरणी २०० रूपये, रोटावेटर १ हजार २०० रूपये, पेरणी ४०० रूपये, शेणखत ६ हजार रुपये, रासायनिक खत पाच हजार, औषधी ६ हजार, वेचणी ६ हजार, थ्रेशर १ हजार, हमाली व माल घरी येईपर्यंत १ हजार ५०० रुपये तसेच रासायनिक खतांचा खर्च असा एकूण २६ हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च करताना शेतकऱ्यांना आर्थिक कसरत करावी लागत आहे. त्यातच मजुर मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती