शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

CoronaVirus : कोरोना विषाणूचा सहवास किती काळ, हे विषाणूवरच अवलंबून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 17:37 IST

CoronaVirus : तज्ज्ञांच्या मते यापूर्वी येऊन गेलेल्या चारपेक्षा अधिक कोरोना विषाणू, स्वाईन फ्लू तसेच इतर मानवी श्वसनजन्य विषाणूंसोबत आपण जगणे शिकलो आहोतच.  त्यामुळे या सोबत जगणेही शिकावे लागेल.

वर्धा - कोविड-१९  हा विषाणू आपल्यासोबत बराच काळ, सदैव राहील का? ही बाब विषाणू स्वत: निश्चित करीत असतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे जगभरातील तज्ज्ञांनी बºयाच कोरोनासदंर्भात केलेल्या दीर्घ अभ्यासावरून दिसून येते. असे मत येथील न्यायवैद्यक विभागाचे प्रा.डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी मांडले आहे.

तज्ज्ञांच्या मते यापूर्वी येऊन गेलेल्या चारपेक्षा अधिक कोरोना विषाणू, स्वाईन फ्लू तसेच इतर मानवी श्वसनजन्य विषाणूंसोबत आपण जगणे शिकलो आहोतच.  त्यामुळे या सोबत जगणेही शिकावे लागेल. या संदर्भात दाखला देताना हार्वर्ड एपिडेमिओलॉजीचे प्रा. मार्क लिपिसिच यांच्या विधानाचा डॉ. खांडेकर यांनी संदर्भ दिला आहे. मार्क लिपिसिच यांनी येत्या वर्षभरात जगभरातील जवळपास ४० ते ७० टक्के लोकांना कोविड-१९ विषाणूची लागण होईल असे सांगितले, पण ते म्हणतात की मात्र, याचा अर्थ असा नाही की, सर्वांना गंभीर आजार होतील. बहुधा अनेकांना सौम्य आजार असेल किंवा कुठलीही लक्षणे नसतील; पण हा विषाणू सर्वत्र पसरतच जाईल. जागतिक आरोग्य संघटनेनुसार तसेच ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित अहवालानुसार कोविड-१९ विषाणूची लागण झालेल्या ८० टक्के लोकांना कुठलीही लक्षणे नाहीत.

इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक बलराम भार्गव यांनीसुद्धा यावर असेच भाष्य केले आहे. असा दावा डॉ. खांडेकर यांनी केला आहे.  लान्सेट या आरोग्य पत्रिकेमध्ये २९ फेब्रुवारी २०२० ला प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार  लक्षणे नसलेल्या कोविड १९ रुग्णांचा आधीच खूप फैलाव (निर्यात) झाला असल्यामुळे जागतिकस्तरावर मोठ्या शहरांमध्ये कोविड-१९ चा स्वतंत्र स्वावलंबी उद्रेक अपरिहार्य होऊ शकतो. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये म्हटले आहे की, अशी लक्षणे नसलेल्या कोविड-१९ व्यक्ती १० टक्के जरी बाहेर असतील तर याचा अर्थ असा की, हा विषाणू सर्वत्र आहे.

यामुळे आपण जेव्हापासून समजत होतो, त्याच्या खूप पूर्वीपासूनच हा विषाणू लोकांमध्ये फिरत होता आणि त्यामुळे खूप मोठ्या लोकसंख्येला याची आधीच लागण झाली असेल, ही शक्यता नाकारता येत आहे. लक्षणे नसलेल्या कोविड-१९ रुग्णांना, लोकांना एवढ्या जास्त लोकसंख्येमधून ओळखणे व त्यांना विलगीकरण करणे हे आपल्यासारखी मोठी लोकसंख्या असलेल्या देशातील यंत्रणेला खूप कठीणच नाही तर अशक्य आहे. तज्ज्ञांच्या मते अशी लक्षणे नसलेल्या कोविड-१९ व्यक्ती पहिली नोंद होण्याच्या आधीच सर्वत्र पसरलेल्या असतात.  जे विषाणू जास्त लोकांमध्ये लक्षणे निर्माण करत नाहीत किंवा कमी लक्षणे निर्माण करतात, त्या विषाणूचा फैलाव होतच राहतो.  तज्ज्ञांच्या मते, बहुदा कोविड-१९ हा याआधी अस्तित्वात असलेल्या मानवी श्वसनजन्य विषाणूच्या संचाचा एक कायमचा भाग होईल. 

आधीपासून अस्तित्वात असलेल्या चार कोरोना विषाणूसाठी अजूनही लोकांना दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती विकसित झाली नाही. जर कोविड-१९ ने या आधी आलेल्या कोरोना विषाणूचे  अनुसरण केले व आता जसा फैलाव होत आहे तसाच फैलाव झाला तर आपला कोल्ड आणि फ्लू सिझन कोल्ड आणि फ्लू आणि कोविड-१९ सिझन होऊ शकतो, असे तज्ज्ञांना वाटते. यावरून हा अंदाज बांधता येऊ शकतो की कोरोना व्हायरस येथे राहण्यासाठी आला आहे. म्हणून आपण याआधी येऊन गेलेल्या चारपेक्षा जास्त कोरोना विषाणू तसेच स्वाईन फ्लू व इतर मानवी श्वसनजन्य विषाणूसोबत जसे जगायला शिकलो, तसेच यासोबतही आता जगणे शिकावे लागेल, असे तज्ज्ञांना वाटते.

यापूर्वी आलेल्या साथींचा जर अभ्यास केला तर तज्ज्ञांच्या मते साथीच्या विषाणूंनी आपल्यासोबत किती काळ राहावे याची वेळ विषाणू स्वत: निश्चित करीत असतो;.दुदैवाने आपण नाही असेही  डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस