शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

Coronavirus ; कोरोनामुळे अनेकांच्या घरी लांबला पाळणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 8:58 AM

Wardha news कोविड संसर्गाच्या भीतीमुळे अनेकांच्या घरी पाळणा ही लांबल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

ठळक मुद्देनागरिकांची तोबा गर्दी ठरतेय संसर्ग वाढीसाठी पोषक

वर्धा : नागरिकांची तोबा गर्दी कोरोना संसर्ग झपाट्याने वाढण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याने बोटावर मोजण्या इतक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यांसह विविध कार्यक्रमांवर होत आहेत. विशेष म्हणजे कोविड संसर्गाच्या भीतीमुळे अनेकांच्या घरी पाळणा ही लांबल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

लग्नसोहळा म्हटला की वाजंत्री, वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत काढण्यात येणारी वरात आदी चित्र डोळ्यासमोर येते. परंतु, मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे विवाह सोहळ्यांसह धार्मिक आणि विविध कार्यक्रमांवर अटी व शर्ती लादण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवघ्या काही व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसोहळे पार पाडले जात आहेत. असे असले तरी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सध्या राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. या कठोर निर्बंधांच्या काळात धुमधडाक्यात होणाऱ्या लग्नसोहळ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून लग्नसोहळ्यांवर नियम व अटी कायम असल्याने अनेकांची लग्नसोहळे पुढे ढकललेत. तर काहींनी मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसोहळे उरकवले. तसेच काही नव विवाहितांनी पाळणा लांबविल्याचे वास्तव आहे.

साधेपणाने केले जातेय लग्न

कोरोना संकटामुळे ग्रामीण आणि शहरी भागात रीतसर परवानगी घेऊन अगदी साधेपणाने लग्नसोहळे केले जात आहेत. लग्नसोहळा दरम्यान नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना वधू व वर कुटुंबीयांना पोलिसांकडून दिल्या जात आहेत.

१ टक्क्याने जन्मदर वाढला

जिल्ह्यात २०१९ मध्ये १६ हजार ६८१ बालकांनी जन्म घेतला. त्यावेळी जिल्ह्याचा जन्मदर १२.४० टक्के होता. तर २०२० मध्ये जिल्ह्यात १७ हजार ७९७ बालकांनी जन्म घेतला. त्याचा जन्मदर १३.११ टक्के असल्याचे सांगण्यात आले.

 

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस