शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

शहराचे होतेय निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 6:00 AM

जिल्ह्यासह शहरातही अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसतानाही खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व नगपालिका प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. शहरात दुपारपर्यंत नागरिकांची काहीशी वर्दळ पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देवर्धा नगरपालिकेचा पुढाकार : अधिकारी व पदाधिकारी उतरले रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे बाजारपेठही कडकडीत बंद आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने याला पायबंद घालण्याकरिता नगरपालिकेने शहराचे शंभरटक्के निजंर्तुकीकरण करण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहे. दोन दिवसांपासून मशीनच्या सहाय्याने फवारणी सुरु केली आहे.जिल्ह्यासह शहरातही अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसतानाही खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन व नगपालिका प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. शहरात दुपारपर्यंत नागरिकांची काहीशी वर्दळ पहावयास मिळत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसगार्पासून शहराच्या बचावाकरिता नगरपालिकेच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून वाडार्वार्डात नियमित फवारणी केली जात आहे. यासोबतच धुरळणीही सुरुअसल्याने निजंर्तुकीकरण होत आहे. आता मोठ्या रस्त्यांचे निजंर्तुकीकरण करण्याच्या उद्देशाने जळगावातून चार मशीन मागविण्यात आल्या. मात्र, दोनच मशीन प्राप्त झाल्याने या दोनच मशीनच्या सहाय्याने बुधवारपासून निजंर्तुकीकरणाला सुरुवात करण्यात आली. पण, बुधवारी ढगाळी वातावरण असल्याने फवारणी थांबविण्यात आली होती. गुरुवारी सकाळपासून पुन्हा मशीनच्या सहाय्याने शहरातील मुख्य मार्गासह बाजारपेठेत फवारणी करण्यात आली. नियमित दहा कर्मचाऱ्यांकडून वॉर्डनिहाय फवारणी व धुरळणी केली जात आहे. नियमित फवारणी व धुरळणीच्या सहाय्याने शहराचे निजंर्तुकीकरण केले जाणार असल्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी सांगितले. पालिकेचे सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी स्वत: उपस्थित राहून लक्ष देत आहेत.स्वावलंबी मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भाजी बाजारात सोशल डिस्टंसिंगसंचारबंदी लागू असतांनाही शहरातील मुख्य भाजीबाजारासह गोलबाजार, आर्वीनाका, केसरीमल कन्या शाळा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीकरिता नागरिकांची गर्दी पहावयास मिळत होती. त्यामुळे गर्दी टाळून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने येथील सर्व भाजीबाजार उठवून स्वावलंबी मैदान व डॉ. आंबेडकर चौकात व्यवस्था करण्यात आली होती. आज वर्धेकरांनी या दोनच ठिकाणी ग्राहकांनी सोशल डिस्टंसिंग पाळून भाजीपाला खरेदी केला.शहराच्या बजाज चौकामध्ये मुख्य भाजीबाजार आहे. येथे संचारबंदीच्या काळातही येथे भाजीपाला उत्पादक व खरेदीदारांची मोठी गर्दी होत होती. यासोबतच गोलबाजार, आर्वीनाका, केसरीमल कन्या शाळेसमोरील परिसरात नागरिक गर्दी करीत होते. ही गर्दी कोरोनाच्या संसर्गाकरिता पोषक असल्याने गर्दी टाळण्याकरिता हे सर्व बाजार बंद करुन स्वावलंबी शाळेच्या मैदानावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजीबाजार व फळांच्या दुकानाची व्यवस्था करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी घेतला. त्यानुसार आज गुरुवारपासून या दोन्ही ठिकाणी भाजी व फळविक्रिला सुरुवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व क्रीडा संकुल मार्गावर एका बाजुने शंभर दुकाने तर दुसºया बाजुने पार्कीगची व्यवस्था करण्यात आली होती. तर साईनगर परिसरातील स्वावलंबी शाळेच्या मैदानावर १०० दुकानांची व्यवस्था करुन पार्कीगही करण्यात आली होती. भाजी व फळे विकत घेतांना ग्राहकांमध्ये अंतर राहावे याकरिता चुन्याने चौरस आखले होते. त्यामुळे ग्राहकांनी चौरसाचा नियम पाळूनच भाजीपाला व फळांची खरेदी केली. सकाळी ७ वाजतापासून दुपारी २ वाजतापर्यंत या दोन्ही ठिकाणी भाजीपाला व फळांची विक्री सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनीही याला सहकार्य करण्याचे आवाहन, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस