शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कुठलाही जाती अथवा धर्मभेद न जोपासता गुण आणि कर्तृत्वावर प्रजेतील सर्वांना समान संधी दिली. सर्वच रयतेला पोटच्या पोराप्रमाणे जपले, म्हणूनच छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी राज्य होते, असे मत प्रसिद्ध वक्ते प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाद्वारे आयोजित शिवजयंती महोत्सवात ते बोलत होते.

ठळक मुद्देप्रवीण देशमुख : शिवजयंतीनिमित्त व्याख्यानमाला; वर्धेकरांची मोठी उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कुठलाही जाती अथवा धर्मभेद न जोपासता गुण आणि कर्तृत्वावर प्रजेतील सर्वांना समान संधी दिली. सर्वच रयतेला पोटच्या पोराप्रमाणे जपले, म्हणूनच छत्रपती शिवरायांचे राज्य हे खरे लोक कल्याणकारी राज्य होते, असे मत प्रसिद्ध वक्ते प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाद्वारे आयोजित शिवजयंती महोत्सवात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष ओंकार धावडे, कार्यकारी अभियंता रवींद्र वºहाडे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ वानखेडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता संदीप हासे, उपविभागीय अभियंता संजय मंत्री, सहाय्यक अभियंता संजय मानकर, पोलीस निरीक्षक धनाजी जळक, मोहन वडतकर, कोटंब्याच्या सरपंच रेणुका कोटंबकार, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष योगिता इंगळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मंगेश विधळे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष नीरज बुटे, विधी व न्याय परिषदेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. कपिल गोडघाटे उपस्थित होते. वैष्णवी भोयर, रिंकू भोयर यांनी गायलेल्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.प्रा. देशमुख म्हणाले, युद्धप्रसंगी कुराण, बायबल अथवा कुठलाही धर्मग्रंथ सापडल्यास सन्मानपूर्वक जतन करण्याचे महाराजांचे आदेश होते. मात्र, आज देशात महाराजांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध काम सुरू असून धर्म आणि जातीत फूट पाडण्याचे काम सुरू आहे. शिवराय हे पर स्त्रीला मातेसमान मानत असत, याचा संदर्भ संत तुकाराम महाराजांच्या अभंगात असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी विश्व हिंदी विद्यापीठाचे जीवन कोडापे, प्रकाश वानखेडे, भूषण तुरणकर यांनी महाराजांच्या जीवनकार्यावर पोवाडा सादर केला. तर ‘शिवरायांची शौर्यगाथा’ ही नाटिका लखोटिया भुतडा विद्यालय कोंढाळीच्या विद्यार्थ्यांनी सादर केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर गिºहे तर संचालन अनिता येवले व अनिकेत जाधव यांनी केले. आभार किशोर जगताप यांनी मानले. कार्यक्रमास मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला वर्धेकर नागरिकांची मोठी उपस्थिती उपस्थिती होती. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज