शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

वाळूघाटावर लागणार चेकनाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 5:00 AM

वाळू घाटांच्या लिलावानंतरही नियमबाह्यपणे वाळू उपसा केल्या जातो. मात्र आता वाळू निर्गतीच्या सुधारित धोरणामुळे अनेक अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता प्रशासनाने वाळूघाटाच्या परिसरातील मोक्याच्या ठिकाणी चेकनाके निश्चित करावे. तसेच शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करुन वजनकाटा बसवावा, अशाही सूचना केल्या आहे. त्यामुळे आता या नवीन धोरणानुसारच प्रशासनाला अंमलबजावणी करावी लागणार आहे.

ठळक मुद्देसुधारित धोरण : नवीन नियमांनुसार करावी लागणार अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाळू घाटांच्या लिलावानंतरही नियमबाह्यपणे वाळू उपसा केल्या जातो. मात्र आता वाळू निर्गतीच्या सुधारित धोरणामुळे अनेक अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहे. त्यामुळे आता प्रशासनाने वाळूघाटाच्या परिसरातील मोक्याच्या ठिकाणी चेकनाके निश्चित करावे. तसेच शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करुन वजनकाटा बसवावा, अशाही सूचना केल्या आहे. त्यामुळे आता या नवीन धोरणानुसारच प्रशासनाला अंमलबजावणी करावी लागणार आहे.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने महाराष्ट्राती वाळूघाट लिलावाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती वर्षभर कायम राहिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने नवीन वाळू निर्गती धोरण जाहीर करण्याचे न्यायालयाला आश्वासन दिले होते. त्यामुळे २०१८-१९ मध्ये वाळू घाट लिलावाला मंजुरी दिली होती. पण, त्यानंतरही ठराविक कालावधीत नवीन धोरण जाहीर न करुन शकल्याने ३७ दिवस बंदी लादण्यात आली होती. ती नंतर उठविण्यातही आली. यामध्ये घाटधारकांनाही नुकसानीचा सामना करावा लागला. तसेच वाळू अभावी शासकीय कामेही खोळबंली होती. परिणामी ही बंदी उठविण्यात आली. त्यानंतर शासनाने गांभीर्याने विचार करुन भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. काही प्रमुख राज्याच्या वाळूधोरणाचा अभ्यास केला.त्यानंतर नवीन वाळू निर्गत धोरण जाहीर केले असून या धोरणानुसार वाळूघाटाचे क्षेत्रफळ, उपशाचा कालावधी आणि कार्यपद्धतीमध्येही सुधारणा केली आहे. या धारेणानुसार वाळूघाटाचे क्षेत्रफळ पाच हेक्टरपर्यंत असावे आणि पाच वर्षाकरिता घाट दिल्या जावा, असे नमुद केले आहे. परंतू वर्धा जिल्ह्यात या अटीमध्ये बसणारा एकही घाट नसल्याने स्थानिक वाळूघाटांची स्थिती, त्यामधील वाळूचे परिमाण यानुसार शासनाने त्यामध्ये शिथिलता आणल्याचेही सांगितले आहे.काय आहे सुधारित वाळू निर्गत धोरणातसुधारित धोरणानुसार वाळूघाटाचे क्षेत्रफळ सर्वसाधारणपणे ५ हेक्टर असावे तसेच वाळूघाट उत्खनन व वाहतूक यांचा कालावधी पाच वर्षांपर्यंत असू शकेल. १० जून ते ३० सप्टेंंबर हा पावसाळ्याचा कालावधी असल्याने या काळात उपसा करता येणार नाही.एक वाळूघाट दोन जिल्ह्यामध्ये येत असेल तर दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त घाट निश्चिती करून विभागीय आयुक्तांकडे अहवाल सादर करावा. विभागीय आयुक्तांकडून एकाच जिल्हाधिकाऱ्यांना लिलावाचे निर्देश दिले जाईल.वाळू उत्खनन व वाहतुकीच्या अंमलबजावणीकरिता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय वाळू सनियंत्रण समिती गठित केली जाणार असून यामध्ये महसूल विभाग, पोलीस प्रशासन, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे.कोणत्याही कारणास्तव लिलाव रद्द झाल्यास नव्याने लिलाव करावा. फेरलिलाव केल्यास पूर्वीच्या लिलावाच्या किमतीपेक्षा कमी किंमत आल्यास फरकाची रक्कम पूर्वीच्या लिलावधारकाकडून जमीन महसुलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात यावी.

टॅग्स :Taxकर