शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

नगरपालिका झालीय बेघरांच्या आयुष्यांची ‘सारथी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:58 IST

कधी काळी जे कुणाच्या तरी आयुष्याचे शिल्पकार ठरले; तेच आज परिस्थितीच्या नियतीने आयुष्याचा उत्तरार्धात उघड्यावर जीवन जगत आहे. त्यांच्याही डोक्यावर हक्काचे छत मिळावे आणि पोटभर जेवन मिळावे, अशा सामाजिक दायित्वातून नगर पालिकेने ‘बेघरांसाठी निवारा’ सुरु करुन त्यांना जगण्याचा आधार दिला आहे.

ठळक मुद्देबेघरांच्या डोक्यावर छत आणि पोटाला मिळतोय आधार : पालिकेच्या दायित्वाला सामाजिक संघटनेची मिळाली साथ

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कधी काळी जे कुणाच्या तरी आयुष्याचे शिल्पकार ठरले; तेच आज परिस्थितीच्या नियतीने आयुष्याचा उत्तरार्धात उघड्यावर जीवन जगत आहे. त्यांच्याही डोक्यावर हक्काचे छत मिळावे आणि पोटभर जेवन मिळावे, अशा सामाजिक दायित्वातून नगर पालिकेने ‘बेघरांसाठी निवारा’ सुरु करुन त्यांना जगण्याचा आधार दिला आहे.वर्धा नगर पालिकेत शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा ठणठणाट असतानाही पालिकेने स्वत:च्या निधीतून शहरातील विकासकामांना चालना दिली आहे. विकास कामांंसोबतच वर्षानुवर्षे संसारापासून दूर लोटल्या गेल्याने रस्त्याच्या कडेला उघड्यावर जीवन जगणाºयांसाठी राहण्याची, जेवणाची आणि आरोग्यबाबतही सुविधा उपलब्ध करुन देत नवा आदर्श निर्माण केला आहे. शहरातील सामान्य रुग्णालयासमोरील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या जागेवर पालिकेने स्वनिधीतून ‘बेघरांचा निवारा’ उभारण्यात आला आहे. येथे चार मोठ्या खोल्या आहे. महिला व पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह व स्नानगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. शहरातील बेघर असलेले महिला व पुरुषांना या निवाऱ्यात आणण्याची व त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेच्यावतीने सारथी बहूउद्देशिय सामाजिक संस्थेकडे सोपविली आहे. या संस्थांचे सदस्य बेघरांना आणण्यासाठी प्रयत्नरत असल्याने दिवसेंदिवस निवाºयातील संख्या वाढत आहे. जर शहरातील बेघर असलेले सर्वच जण या निवाºयात दाखल झाले तर कुणीही रस्त्याच्या कडेला उपाशापोटी खितपत पडून राहणार नाही. यासाठी गरज आहे ती सर्वांच्याच सहकार्याची, हे विशेष.वृद्धांसह दिव्यांगांची विशेष काळजीशहरातील बेघर असलेल्यांना सारथी बहुउद्देशिय संस्थेच्या सदस्यांमार्फत या निवाऱ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. या निवाºयात राहणाऱ्यांना दररोज दोन वेळेचे जेवन, नास्ता व चहा दिला जातो. तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी करुन औषधोपचारही केल्या जातो. दिव्यांग आणि वृद्धांची विशेष काळजी घेतली जाते. जे काम करु शकतात त्यांना अर्ध्याकिंमतीत सेवा पुरविली जाते. तर जे कामच करु शकत नाही अशांना सर्व सेवा मोफत दिल्या जात आहेत.पंडीत दीनदयाल उपाध्याय अंतोदय योजनेंतर्गत बेघरांना निवारा हा उपक्रम सुुरु करण्यात आला आहे. याची देखभाल करण्याची जबाबदारी सारथी बहूउद्देशीय सामाजिक संंस्थेला देण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून पालिकेने रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष,वर्धा.जोपर्यंत शहरातील सर्व बेघर असलेले व्यक्ती निवाऱ्यात पोहचणार नाही, तो पर्यंत शोध मोहीम सुरुच राहील. ज्यांनाही बेघर व्यक्ती आढळून आला. त्यांंनी त्या व्यक्तील या निवाऱ्यापर्यंत पोहचवावे. सर्वांनी या उपक्रमाला सहकार्य केले तर कुणीही उघड्यावर उपाश्यापोटी झोपणार नाही.- मंगेश चांदुरकर, प्रशासकीय अधिकारी, सारथी संस्था, वर्धा.४७ बेघरांना मिळाला निवारावर्धा नगर पालिका व सारथी संस्थेव्दारा गुरुवारी शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, साई मंदिर,शास्त्री चौक, गोंड प्लॉट व ईतर भागातील बेघर लोकांना शोधून बेघरांच्या निवाऱ्यात पोहचविले. तेथे त्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली. सध्या या निवाºयात ४७ बेघरांना आधार मिळाला आहे. रात्री सुरु झालेली ही शोध मोहीम पहाटे २ वाजतापर्यंत सुरु राहिली. यासाठी नगर पालिकेचे पथक प्रमुख किशोर साखरकर, अक्षय बनगिरवार, विशाल सोमवंशी, सुजीत भोसले, गजनन पेटकर, निखील लोहवे, चित्रा चाफले, लिखिता ठाकरे, माधुरी चावरे, धर्मदास डोंगरे, सारथी संंस्थेचे चंद्रशेखर रुईकर, खुशाल नेहारे, नयन मगर, मिथुन मोतेवार, हिरामण रुईकर, चिन्मय देशपांडे, साजीत मालाधारी, मोरेश्वर गळहाट तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक बोरखेडे, इमरान खिल्ची व महेंद्र अढाऊ यांचे सहकार्य मिळाले.