शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

नगरपालिका झालीय बेघरांच्या आयुष्यांची ‘सारथी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:58 IST

कधी काळी जे कुणाच्या तरी आयुष्याचे शिल्पकार ठरले; तेच आज परिस्थितीच्या नियतीने आयुष्याचा उत्तरार्धात उघड्यावर जीवन जगत आहे. त्यांच्याही डोक्यावर हक्काचे छत मिळावे आणि पोटभर जेवन मिळावे, अशा सामाजिक दायित्वातून नगर पालिकेने ‘बेघरांसाठी निवारा’ सुरु करुन त्यांना जगण्याचा आधार दिला आहे.

ठळक मुद्देबेघरांच्या डोक्यावर छत आणि पोटाला मिळतोय आधार : पालिकेच्या दायित्वाला सामाजिक संघटनेची मिळाली साथ

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कधी काळी जे कुणाच्या तरी आयुष्याचे शिल्पकार ठरले; तेच आज परिस्थितीच्या नियतीने आयुष्याचा उत्तरार्धात उघड्यावर जीवन जगत आहे. त्यांच्याही डोक्यावर हक्काचे छत मिळावे आणि पोटभर जेवन मिळावे, अशा सामाजिक दायित्वातून नगर पालिकेने ‘बेघरांसाठी निवारा’ सुरु करुन त्यांना जगण्याचा आधार दिला आहे.वर्धा नगर पालिकेत शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा ठणठणाट असतानाही पालिकेने स्वत:च्या निधीतून शहरातील विकासकामांना चालना दिली आहे. विकास कामांंसोबतच वर्षानुवर्षे संसारापासून दूर लोटल्या गेल्याने रस्त्याच्या कडेला उघड्यावर जीवन जगणाºयांसाठी राहण्याची, जेवणाची आणि आरोग्यबाबतही सुविधा उपलब्ध करुन देत नवा आदर्श निर्माण केला आहे. शहरातील सामान्य रुग्णालयासमोरील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या जागेवर पालिकेने स्वनिधीतून ‘बेघरांचा निवारा’ उभारण्यात आला आहे. येथे चार मोठ्या खोल्या आहे. महिला व पुरुषांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच स्वयंपाकगृह, स्वच्छतागृह व स्नानगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. शहरातील बेघर असलेले महिला व पुरुषांना या निवाऱ्यात आणण्याची व त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेच्यावतीने सारथी बहूउद्देशिय सामाजिक संस्थेकडे सोपविली आहे. या संस्थांचे सदस्य बेघरांना आणण्यासाठी प्रयत्नरत असल्याने दिवसेंदिवस निवाºयातील संख्या वाढत आहे. जर शहरातील बेघर असलेले सर्वच जण या निवाºयात दाखल झाले तर कुणीही रस्त्याच्या कडेला उपाशापोटी खितपत पडून राहणार नाही. यासाठी गरज आहे ती सर्वांच्याच सहकार्याची, हे विशेष.वृद्धांसह दिव्यांगांची विशेष काळजीशहरातील बेघर असलेल्यांना सारथी बहुउद्देशिय संस्थेच्या सदस्यांमार्फत या निवाऱ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. या निवाºयात राहणाऱ्यांना दररोज दोन वेळेचे जेवन, नास्ता व चहा दिला जातो. तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी करुन औषधोपचारही केल्या जातो. दिव्यांग आणि वृद्धांची विशेष काळजी घेतली जाते. जे काम करु शकतात त्यांना अर्ध्याकिंमतीत सेवा पुरविली जाते. तर जे कामच करु शकत नाही अशांना सर्व सेवा मोफत दिल्या जात आहेत.पंडीत दीनदयाल उपाध्याय अंतोदय योजनेंतर्गत बेघरांना निवारा हा उपक्रम सुुरु करण्यात आला आहे. याची देखभाल करण्याची जबाबदारी सारथी बहूउद्देशीय सामाजिक संंस्थेला देण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून पालिकेने रंजल्या-गांजलेल्यांची सेवा करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष,वर्धा.जोपर्यंत शहरातील सर्व बेघर असलेले व्यक्ती निवाऱ्यात पोहचणार नाही, तो पर्यंत शोध मोहीम सुरुच राहील. ज्यांनाही बेघर व्यक्ती आढळून आला. त्यांंनी त्या व्यक्तील या निवाऱ्यापर्यंत पोहचवावे. सर्वांनी या उपक्रमाला सहकार्य केले तर कुणीही उघड्यावर उपाश्यापोटी झोपणार नाही.- मंगेश चांदुरकर, प्रशासकीय अधिकारी, सारथी संस्था, वर्धा.४७ बेघरांना मिळाला निवारावर्धा नगर पालिका व सारथी संस्थेव्दारा गुरुवारी शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, साई मंदिर,शास्त्री चौक, गोंड प्लॉट व ईतर भागातील बेघर लोकांना शोधून बेघरांच्या निवाऱ्यात पोहचविले. तेथे त्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली. सध्या या निवाºयात ४७ बेघरांना आधार मिळाला आहे. रात्री सुरु झालेली ही शोध मोहीम पहाटे २ वाजतापर्यंत सुरु राहिली. यासाठी नगर पालिकेचे पथक प्रमुख किशोर साखरकर, अक्षय बनगिरवार, विशाल सोमवंशी, सुजीत भोसले, गजनन पेटकर, निखील लोहवे, चित्रा चाफले, लिखिता ठाकरे, माधुरी चावरे, धर्मदास डोंगरे, सारथी संंस्थेचे चंद्रशेखर रुईकर, खुशाल नेहारे, नयन मगर, मिथुन मोतेवार, हिरामण रुईकर, चिन्मय देशपांडे, साजीत मालाधारी, मोरेश्वर गळहाट तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक बोरखेडे, इमरान खिल्ची व महेंद्र अढाऊ यांचे सहकार्य मिळाले.