शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

शिक्षण मंडळाच्या १०, १२ वी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत होणार बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 2:22 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याचा एक भाग म्हणून १० वी व १२ वीच्या प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देराज्य शिक्षण मंडळाचा निर्णयभाषा विषयाच्या शिक्षकांचे झाले प्रशिक्षण

सुधीर खडसे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमाची गुणवत्ता सुधारण्याचा एक भाग म्हणून १० वी व १२ वीच्या प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या स्वरूपामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दहावीचा बदललेला अभ्यासक्रम व १२ वीच्या भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये बदल करण्यात येणार आहे.राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत बालभारतीच्या विविध विषयाच्या अभ्यासमंडळाद्वारे यंदा १० वीचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. तसेच विषयतज्ज्ञ मार्गदर्शकांनी कृतीपर मुल्यमापन पद्धतीचा आराखडा तयार केला असून प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलण्यात आलेले आहे. याच महिन्यात पुणे येथे राज्यभरातील ठराविक शिक्षकांची विविध विषयाची कार्यशाळा राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणार आहे.बदल झालेल्या अभ्यासक्रमातील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची नवीन पद्धत वर्तमान, प्रश्नपत्रिकेपेक्षा पूर्णपणे भिन्न राहणार असून यात कृतीवर मुल्यमापनला विशेष महत्व दिल्या जाणार आहे. तसेच उपाययोजनात्मक प्रश्नांवर भर दिल्या जाणार असून त्यातून विद्यार्थ्यांमधील अभ्यासक कृतीवर लेखन कौशल्याचे आकलन केले जाणार आहे.सीबीएसइ अभ्यासक्रमाचास्तर गाठण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने हे पाऊल उचलले आहे. या माध्यमातून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळच्या स्तरावर राज्यशिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना नेण्याचा प्रयत्न करणार आहे. परिणामत: विद्यार्थ्यांना जेईई व नीट सारख्या स्पर्धा परीक्षांची वेगळी तयारी करण्याची गरज भासणार आहे.सदर बदलेला अभ्यासक्रमांच्या प्रारूपानुसार कृतीपत्रिकांवर आधारीत प्रश्नपत्रिका राहणार आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना विद्या प्राधीकरणकडून देण्यात आलेले आहे. तसेच वर्ग १२ वी च्या भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा कृतीपत्रिका लागू करण्यात आलेली आहे.

टॅग्स :examपरीक्षा