शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

किरायेदार म्हणून आले; घरावर हक्क गाजवू लागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST

काही किरायेदारांनी घरमालकांच्या नाकीनऊ आणले आहे. बऱ्याच दिवसांपासून किराया न देता राहत आहे. किराया द्या किंवा घर खाली करा, म्हटले तर घरमालकालाच दमदाटी करून घरावर ताबा मिळवून बसले आहे. कोणतेही कष्ट न करता किंवा मोबदला न देता फुकटात घरावर वेटोळे मारून बसल्याने घरमालकाच्या घामाची कमाई अडचणीत आली आहे. हक्काचे घर ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे दार ठोठावले तर ते न्यायालयाकडे बोट दाखवितात.

ठळक मुद्देआयुष्यभराच्या कमाईवर टाच : मालमत्ता खाली करून घेण्यासाठी कसरत, न्यायालयाचे दार ठोठावण्यास अनेकांची ना

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नियमित जीवन जगताना पैशांची बचत करून भविष्याची पुंजी म्हणून घर खरेदी केले. राहत्या घरात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्याने चार पैसे मिळावे म्हणून दुसरे घर किरायाने दिले. आता किरायाने दिलेल्या घराचे नव्याने बांधकाम करावे किंवा ते विकावे म्हटले तर किरायेदार घर खाली करायला तयार नाही. पोलिसांत तक्रार दिली तर पोलीस न्यायालयाचा मार्ग दाखवतात. याच परिस्थितीचा फायदा घेत किरायेदार म्हणून आलेले आता घरावर मालकी हक्क गाजवायला लागल्याने घरमालकाची आर्थिक कोंडी झाली आहे. मुला-बाळांसह परिवाराचं आयुष्य सुखकर व्हावं, याकरिता भविष्याची तरतूद म्हणून अनेकांनी घर, भूखंड खरेदी करण्यावर भर दिला आहे. यात घर घेणाऱ्यांनी ते रिकामे राहण्यापेक्षा किरायाने दिले. यातून काही घरमालकांना नियमित किराया मिळत असून किरायेदारही त्यांना साथ देत आहे. मात्र, काही किरायेदारांनी घरमालकांच्या नाकीनऊ आणले आहे. बऱ्याच दिवसांपासून किराया न देता राहत आहे. किराया द्या किंवा घर खाली करा, म्हटले तर घरमालकालाच दमदाटी करून घरावर ताबा मिळवून बसले आहे. कोणतेही कष्ट न करता किंवा मोबदला न देता फुकटात घरावर वेटोळे मारून बसल्याने घरमालकाच्या घामाची कमाई अडचणीत आली आहे. हक्काचे घर ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे दार ठोठावले तर ते न्यायालयाकडे बोट दाखवितात. न्यायालयात गेलो तर आयुष्य निघून जाईल; पण, निकाल लागणार नाही. या भीतीमुळे ते न्यायालयातही जाणे टाळत असल्याचे याच संधीचा फायदा काही किरायेदार घेत आहे. त्यामुळे हक्काचे घर परत मिळविण्यासाठी घरमालकांची दाहीदिशा भटकंती सुरू आहे. 

म्हणून या गोष्टींची खबरदारी आवश्यक...सध्या मालमत्तेचे भाव चांगलेच कडाडल्याने कोण, कशापद्धतीने ती बळकावेल, याचा नेम नाही. म्हणून घरमालकाने किरायेदारावर विश्वास टाकणे सध्या धोक्याचे आहे.किरायेदार ठेवताना त्याची पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. त्याचे संपूर्ण नाव, गाव, कुठे काम करतो आदी माहिती घेऊन त्याच्याकडून शंभर रुपयांच्या मुद्रांकावर करारनामा करून घेणे बंधनकारक आहे.दरवर्षी अकरा महिन्यांचा करारनामा करून घ्यावा. त्यामध्ये ठरलेला किराया, दरवर्षी किरायामध्ये किती वाढ होणार, अग्रीम भाडे आदींचा समावेश करून किरायेदाराची स्वाक्षरी करावी. तसेच त्याची किरायेदाराला एक प्रत देऊन यासंदर्भात पालिकेलाही माहिती देणे गरजेचे आहे. पण, असे कुठेही होताना दिसत नसल्याचे अडचणी वाढत आहे.

 गावगुंडांसह राजाश्रय...

- शहरात बऱ्याच व्यक्तींनी किरायावर घर किंवा गाळे दिले आहेत. पण, त्याची रितसर नोंद केलेली नसल्याने आता त्या किरायाच्या मालमत्तेवर मालकी हक्क गाजविला जात आहे. ‘लोकमत’कडे तीन प्रकरणांसंदर्भात माहिती आली असून शहरात अशी अनेक प्रकरणे आहेत. काही व्यक्ती घरमालकावर गावगुंडांकडून दबाव आणत घर ताब्यात ठेवत आहे. तर काही किरायेदार राजकीय वलयात वावरणारे असून त्याचाही दबाव घरमालकावर टाकून किरायावर घेतलेली मालमत्ता हडपण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

पोलिसांचे न्यायालयाकडे बोटकिरायेदार घर खाली न करता घरमालकावरच दबाव टाकायला लागले की, घरमालक पोलीस ठाण्यात धाव घेतो. परंतु, सदर प्रकरणात गुन्हा दाखल करून न घेता न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा सल्ला दिला जातो. न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यानंतर ‘तारीख पे तारीख’ सुरू होत असल्याने न्याय मिळण्यास बराच उशीर लागतो. म्हणून न्यायालयाची पायरी चढण्यास घरमालक तयार होत नाही. याचाच फायदा सध्या काही किरायेदार उचलताना दिसत आहे.

प्रकरण क्र. : १

रामनगर परिसरात मुख्य मार्गालगत एक मालमत्ता आहे. त्या ठिकाणी असलेल्या इमारतीमध्ये किरायेदार ठेवण्यात आले होते. काही दिवसांनी ही इमारत जीर्ण झाल्याने किरायेदार निघून गेले पण, एका किरायेदाराने घर खाली करून देण्यास नकार दिला. त्यामुळे त्रस्त झालेल्या मालमत्ताधारकाने त्या सर्व जागेचा सौदा केला. ज्याने ती जागा घेण्याचा सौदा केला होता, त्याने त्या किरायेदाराची भेट घेऊन घर खाली करण्याची विनंती केली. परंतु, त्याने घर खाली करण्याच्या मोबदल्यात ६ लाख रुपयांची मागणी केली. परिणामी, हा सौदा फिसकटला आणि मालमत्तामालकाला घेतलेला इसार परत करावा लागला. नाईलाजास्तव मालमत्ताधारकाने किरायेदाराकडून काही पैसे घेऊन काही जागा त्याचे नावे करून दिली. त्यानंतर उर्वरित जागा इतरांना विकण्याचा मार्ग मोकळा झाल्याने पुढील व्यवहार करण्यात आला.

प्रकरण क्र. : २

शहरातील महादेवपुरास्थित मुख्य बाजारपेठेत दोन मजली इमारत आहे. घरमालक वयोवृद्ध असून ते मुलांसह बाहेरगावी राहतात. त्यामुळे त्यांनी येथील किरायेदार ठेवले होते. इमारतही आता जीर्ण झाली असून पालिकेकडूनही नोटीस बजावण्यात आला. त्यामुळे घरमालकाच्या विनंतीवरुन वरच्या माळ्यावर राहणाऱ्यांनी घर खाली केले परंतु, तळमजल्यावर किरायेदार घर खाली करून देण्यास तयार नाहीत. त्यांना वारंवार विनंती करूनही त्यांचा डोळा आता मालमत्तेवर असल्याने मोठ्या मेहनतीने कमावलेली मालमत्ताही आता किरायेदार दडपून बसल्याने अडचणी वाढल्या आहे. वृद्ध घरमालकासह त्यांची मुलेही वर्ध्यात येत घर खाली करण्यास सांगत आहे. मात्र, किरायेदारच मालकाप्रमाणे वर्तन करीत आहे.

प्रकरण क्र. : ३

शहरातील साईनगरस्थित एका परिवाराने भविष्याची पुंजी म्हणून म्हाडा कॉलनीमध्ये घर विकत घेतले. ते घर काही दिवसांपूर्वी एका कुटुंबाला किरायाने दिले. आता त्या घराची दुरुस्ती व बांधकाम करायचे असल्याने किरायेदाराला घर खाली करून देण्याची मागणी केली. परंतु, किरायेदाराने घर खाली करून देण्यास मनाई करीत घरमालकालाच धमकाविणे सुरू केले. त्यामुळे घरमालकाने किरायेदाराचे साहित्य बाहेर काढून आपले कुलूप लावले.मात्र, किरायेदाराने पुन्हा त्या घरावर ताबा मिळवित मजुरी कायम ठेवली. याकरिता राजकीय दबावतंत्राचाही वापर केला जात आहे. त्यामुळे घरमालकाने पोलिसांत धाव घेतली. पण, न्याय मिळाला नाही. अखेर गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून घर खाली करून घेण्यासाठी घरमालक धडपडत आहे.

 

 

टॅग्स :Homeघर