शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दिवाळीत बळीराजाचे व्यापाऱ्यांकडून दिवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 22:12 IST

या हंगामात प्रारंभी पावसाने चांगलीच दडी मारली. मात्र त्यानंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची अद्यापही पाठ सोडलेली नाही. परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे ५० टक्के नुकसान झाले आहे. कापणी झाल्यावर शेतात सोयाबीनचे ढिग लावून ठेवले. त्यातही रविवारी झालेल्या पावसाने ते सर्व सोयाबीन ओले झाले. काहींना जागेवर कोंब आलीत. डोळ्या देखत होणारे नुकसान शेतकऱ्यांने जड अंत: करणाने सहन केले.

ठळक मुद्देहजार २०० रुपयात सोयाबीनची खरेदी

सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी वरुणराजाच्या अवकृपेमुळे सोयाबीनची आराजी बुडाली. हाती आलेल्या अत्यल्प पिकाला दिवाळीच्या दिवसात चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु बळीराज्याच्या गरजेचा फायदा उचलत व्यापाऱ्यांनी केवळ २ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीनची खरेदी करुन शेतकऱ्यांचे चांगलेच दिवाळे काढले. मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या पिकाला कवडीमोल भावात विकताना शेतकऱ्यांच्या पापण्याआड पाणी डबडबले होते.या हंगामात प्रारंभी पावसाने चांगलीच दडी मारली. मात्र त्यानंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची अद्यापही पाठ सोडलेली नाही. परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे ५० टक्के नुकसान झाले आहे. कापणी झाल्यावर शेतात सोयाबीनचे ढिग लावून ठेवले. त्यातही रविवारी झालेल्या पावसाने ते सर्व सोयाबीन ओले झाले. काहींना जागेवर कोंब आलीत. डोळ्या देखत होणारे नुकसान शेतकऱ्यांने जड अंत: करणाने सहन केले. सोयाबीन ओले झाल्यामुळे ते काळपट आले. मळणी केल्यानंतर काळे पडलेले सोयाबीन अत्यल्प दरात खरेदी करण्यासाठी व्यापारी डाव साधूनच होते. एकीकडे दिवाळीची धामधूम त्याकरिता शेतकऱ्यांना लागणारा पैसा या अडणीला हेरुन बसलेल्या गावागावातील लहान दलालांनी तुमच्या सोयाबीनचे ग्रेडेशन घटले, तुम्हाला आता योग्य भाव मिळणार नाही, अशी सोयाबीन उत्पादकांची खिल्ली उडवायला सुरुवात केली. सणामुळे घरी किराणा, मुलाबाळांचे कपडे आदी चिंता शेतकऱ्यांना सतावत असल्याने त्यांनी नाईलाजास्तव मिळेल त्या दरात सोयाबीन विकून आपली दिवाळी साजरी केली. सोयाबीनला ३ हजार रुपयापासून ३ हजार ४०० रुपयापर्यंत दर असल्याचे सर्वश्रृत असतानाही लोभापोटी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना चांगलेच लुबाडले.सोयाबीनचा कापणी खर्च एकरी २ हजार २०० आला आहे. मळणीकरिता मशीन वाल्याने २०० रुपये क्विंटलने काढणीचा खर्च घेतला. पिकाची आराजी सरासरी ३ ते ५ क्विंटल आली. पेरणीपासून काढणीपर्यंतचा खर्च एकरी १२ हजार रुपये आहे. अशा स्थितीत शेतकºयांपुढे जगावे की मरावे, असा प्रश्न उभा ठाकत आहे.तालुक्यात ८ हजार ७५० हेक्टरवर पेरणीआष्टी तालुक्यात ८ हजार ७५० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली होती. पावसामुळे ४ हजार हेक्टरवरील सोयाबीनची वाट लागली आहे. उर्वरीत ४ हजार ७५० हेक्टरवरील सोयाबीन पिकाला सिंचनाची व्यवस्था होती. मात्र, भरपूर पाऊस झाल्यामुळे सर्व पीक निसर्गाच्या पाण्यावरच झाले. सततच्या पावसामुळे सरासरी ३ ते ५ क्विंटल एकरी उत्पन्न झाले आहे. तर आता परितीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीच भर घातल्याने आता शेतकरी चिंतातूर आहे.शासनाकडून मदतीची मागणीशेतकºयांनी शासनाला वारंवार मागणी करून हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अद्यापही नुकसानग्रस्त भागाचा सर्व्हे झालेला नाही. शासकीय पातळीवरून आदेश नाही. अधिकारी बघ्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे तीव्र असंतोष खदखदत आहे.यावर्षी सोयाबीन व कपाशी पिकाची अवस्था गंभीर आहे. शेतकºयांना आता आधार देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे शपथविधी झाल्यावर पहिली मागणी हीच लावून धरून शेतकºयांना अनुदान मिळेपर्यंत शासनदरबारी प्रयत्नशील राहणार आहे.दादाराव केचे, आमदार, आर्वी.

टॅग्स :agricultureशेती