शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर बोंडअळीचा ‘अटॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात यंदा एकूण २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड झाली. यात कोरडवाहू शेतजमिनीचाही समावेश आहे. सुरूवातीला बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर थोड्या प्रमाणात दिसून आला. त्यावेळी कृषी विभागाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने काही प्रमाणात बोंडअळीला अटकाव घालता आला.

ठळक मुद्देकृषी विभागाच्या दुर्लक्षित धोरणांचा कपाशी उत्पादकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी सोयाबीनला बगल देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करण्यास पसंती दर्शविली. परंतु, सध्या गुलाबी बोंडअळी पुन्हा नव्या जोमाने डोकेवर काढू पाहत आहे. या प्रकाराकडे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असलेला कृषी विभागच दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याने कपाशी उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. जिल्ह्यातील काही भागात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असून यंदा पांढºया सोन्यापेक्षा बोंडअळीचेच जास्त उत्पन्न होईल काय, असा प्रश्न शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात यंदा एकूण २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड झाली. यात कोरडवाहू शेतजमिनीचाही समावेश आहे. सुरूवातीला बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर थोड्या प्रमाणात दिसून आला. त्यावेळी कृषी विभागाने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याने काही प्रमाणात बोंडअळीला अटकाव घालता आला.मात्र, त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी सूस्त झाले. शिवाय त्यांनी उंटावरूनच शेळ्या हाकण्यात धन्यता मानल्याने सध्या बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कपाशी पिकावर दिसून येत आहे. शासकीय आकडेवारीनुसार आर्वी तालुक्यातील बाजारवाडा व रसुलाबाद, देवळी तालुक्यातील एकपाळा, समुद्रपूर तालुक्यातील वायगाव येथे बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे सांगण्यात येते.असे असले तरी हिंगणघाट, वर्धा, समुद्रपूर, देवळी, आर्वी, आष्टी, कारंजा, सेलू तालुक्यांमधील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे शेतकरी सांगतात; पण शासनदरबारी याची नोंदच घेण्यात आलेली नाही. कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारीही कार्यालयातच बसून गाढा हाकत असल्याने ही विदारक परिस्थिती ओढावल्याची खंत शेतकºयांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. एकूणच कृषी विभागाच्या दुर्लक्षित धोरणाचा आर्थिक फटकाच यंदा कपाशी उत्पादक शेतकºयांना सहन करावा लागत आहे.जनजागृतीचा अभाव, तज्ज्ञ उंटावरून हाकताहेत शेळ्यादोन वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा उद्रेकच झाला होता. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत जिनिंग प्रेसिंग व्यावसायिकांची कानउघाडणीच केली होती. त्यानंतर राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेनंतर बोंडअळीला अटकाव घालण्यात बऱ्यापैकी यश आले होते; पण त्यानतर जनजागृतीकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याचे दिसून येते.जनावरांना दिला जातोय चाराबोंडअळीच्या प्रादुर्भावाला कंटाळून शेतकरी थेट कपाशीचे पीक कापत आहेत. इतकेच नव्हे, तर कापलेले पीक किंवा कपाशी पीक असलेल्या शेतात शेतकरी आपली जनावरे चरण्यासाठी सोडत आहेत.शेतकरी कापताय झाडंशेतकऱ्यांनी योग्य निगा घेतल्याने कपाशी पिकाची समाधानकारक वाढ झाली. बहरलेली कपाशी पाहून यंदा विक्रमी उत्पन्न होईल, असा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तविला जात होता. सद्यस्थितीत कपाशीच्या एका झाडाला सुमारे ४० ते ५० बोंड असल्याचे बघावयास मिळत असून या बोंडामध्ये गुलाबी बोंडअळी आढळून येत आहे. त्यामुळे काही शेतकरी कपाशीचे झाडच कापण्यात धन्यता मानत आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावाला कंटाळून आर्वी तालुक्यातील रसुलाबाद येथील शेतकरी अजय आसोले यांनी कपाशी पीक थेट कापले आहे. तर याच गावातील प्रमोद गुल्हाणे, गजानन सावरकर, किशोर टाके हे शेतकरी कपाशीचे पीक कापण्याच्या तयारीत आहेत. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील आठही तालुक्यात असल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :agricultureशेती