शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

दादासाहेबांच्या आरोग्य शिबिराकडे भाजप नेत्यांचीच पाठ; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 1:37 PM

मतदार संघातील गोतावळाही होतोय कमी

वर्धा : आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भाजपातच दोन गट पडल्याचे उघडपणे दिसायला लागले आहे. कधीकाळी आमदार दादाराव केचे यांच्या निमंत्रणावरून कार्यक्रमाला उपस्थित राहणारे भाजपचे पदाधिकारी आणि त्यांचा आदेश प्रमाण मानून सावलीसारखे सोबत राहणारे मतदार संघातील कार्यकर्तेही त्यांच्यापासून दूर चालले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नुकताच आर्वी येथील सहकार मंगल कार्यालयात त्यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराकडे भाजपच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनीही पाठ फिरवली. त्यामुळे दादासाहेब एकाकी पडलेय काय? अशी चर्चा मतदार संघात रंगायला लागली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यासन अधिकारी आर्वीपुत्र सुमित वानखेडे यांनी मतदार संघातील भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता धडपड चालविली. त्यामुळे आपसूकच नागरिक आणि कार्यकर्तेही त्यांच्याशी जुळू लागल्याने मतदार संघात दादासाहेबांपेक्षा त्यांचे वजन वाढायला लागले. बरेच वर्ष रेंगाळत राहिलेली कामे वानखेडे यांनी झटपट मार्गी लावण्याचा सपाटा लावला. परिणामी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर वर्धा लोकसभाप्रमुखांची जबाबदारी सोपवून त्यांच्या पंखात आणखीच बळ भरले. यामुळे विधानसभेकरिता भाजपानेदादाराव केचे यांना पर्याय शोधल्याची चर्चा जोर धरू लागली. त्यामुळेच दादासाहेबांच्या सोबत राहणारे पदाधिकारी व कार्यकर्तेही सुमित वानखेडे यांच्या पाठीशी असल्याचे विविध कार्यक्रमातून दिसायला लागले.

दादासाहेबांनी ज्यांना पंचायत समिती, जिल्हा परिषद यासह नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली होती. त्यांनीही आता साथ सोडल्याचे दिसायला लागले. एरवी आर्वीतील आमदारांचा कार्यक्रम म्हटला की, जिल्ह्यातील भाजपचे नेते, पदाधिकारी व मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा गोतावळा उपस्थित राहायचा. मात्र, महाआरोग्य शिबिराला भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षाशिवाय कोणताही जिल्ह्यातील पक्षाचा नेता किंवा पदाधिकारी दिसला नसल्याने याबाबत ‘पक्षादेश’ तर झाला नसावा ना? अशीही चर्चा आता रंगायला लागली असून यावरून आगामी निवडणुकीकरिता आमदार दादाराव केचे यांची वाटचाल खडतर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अजूनही आर्वीतील दहीहंडीचीच चर्चा

आमदार दादाराव केचे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आर्वीत गोकुळाष्टमीला दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व लोकसभाप्रमुखांना कल्पना व निमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे अनेकांमध्ये नाराजीचा सूर होता.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाDadarao Kecheदादाराव केचेwardha-acवर्धा