शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

टोकनद्वारे शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

आर्वी बाजार समितीच्या अडत्यामार्फत शेतकऱ्यांना मालाचे टोकन देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी होऊ नये, त्यांची आर्थिक अडचण दूर व्हावी, यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने उपविभागीय अधिकारी, बाजार समिती सभापतींच्या सूचनेनुसार शेतमाल खरेदी सुरू केली आहे. मार्केट यार्डमध्ये पाच ठिकाणी हात धुण्यासाठी सुविधा केली आहे. सकाळी ७ ते ९ या कालावधीत मालाची आवक घेतल्या जाईल.

ठळक मुद्देआर्वी कृउबासकडून दिलासा । दररोज १ हजार क्विंटल शेतमालाची आवक

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून आर्वी येथील बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमाल खरेदीला सुरूवात झाली असून दररोज ९०० ते एक हजार क्विंटल शेतमालाची आवक बाजार समितीत सुरू आहे. अडत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकावा लागणार आहे. शेतकºयांना बाजार समितीच्या अडत्यांकडे आपल्या मालाची नोंद करणे बंधनकारक असून नोंदणीनंतर टोकन संबंधीत शेतकऱ्यास देऊन त्यांचा माल खरेदी करणार आहे.आर्वी बाजार समितीच्या अडत्यामार्फत शेतकऱ्यांना मालाचे टोकन देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी होऊ नये, त्यांची आर्थिक अडचण दूर व्हावी, यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने उपविभागीय अधिकारी, बाजार समिती सभापतींच्या सूचनेनुसार शेतमाल खरेदी सुरू केली आहे. मार्केट यार्डमध्ये पाच ठिकाणी हात धुण्यासाठी सुविधा केली आहे. सकाळी ७ ते ९ या कालावधीत मालाची आवक घेतल्या जाईल. सकाळी ११ वाजता शेतमालाचा लिलाव करण्यात येतो व दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व माल भरून लिलाव प्रक्रिया पूर्ण केल्या जाते. सध्या तूर ५४०० तर चण्याला ३८०० रुपये क्विंटल भाव शेतकºयांना देण्यात येत आहे. मार्केट यार्डवर आलेल्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. गरीब व गरजूंना बाजार समितीच्यावतीने जेवण देण्यात येत आहे. शुक्रवारी बाजार समिती परिसरात विषाणू बाधीत औषधाची फवारणी करण्यात आली. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आर्वी बाजार समितीचे सभापती महादेव भाकरे, दिलीप भुसारी यांच्यासह बाजार समितीचे सर्व कर्मचारी सहकार्य करीत आहे.आठवड्यातून दोनदा होणार निर्जंतुकीकरण फवारणीआर्वी बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आर्वी बाजार समितीच्या संचालक मंडळाने आठवड्यातून दोन दिवस बाजार समिती परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.आर्वी बाजार समितीत अडत्यामार्फत शेतकºयांना टोकन देऊन शेतमाल खरेदी करणे सुरू झाले आहे. दररोज ९०० ते १००० क्विंटल शेतमालाची आवक सुरू आहे. शेतकºयांनी अडत्यांशी संपर्क करून शेतमालाची नोंदणी करून घ्यावी.विनोद कोटेवार, प्रभारी सचिव, कृउबास, आर्वी

टॅग्स :Farmerशेतकरी